शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

घाटंजी तालुक्यात रोही, रानडुकरांचा हैदोस

By admin | Updated: September 18, 2015 02:26 IST

आर्थिक अडचणीवर मात करूनही यावर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यांच्या हिंमतीचा परिपाक म्हणजे,

शेतकरी बेजार : ज्वारी, सोयाबीन, कापसाला फटका, वनविभागाने लक्ष देण्याची गरज घाटंजी : आर्थिक अडचणीवर मात करूनही यावर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यांच्या हिंमतीचा परिपाक म्हणजे, बेभरवशाच्या पावसातही यंदा पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र, वन्यप्राण्यांनी आता हाती आलेले पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे तालुकाभरातील शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहे.तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रोही आणि रानडुकरांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. प्रामुख्याने मानोली, पाटापांगरा, शिरोली, दहेगाव, उंदरणी, जुनोनी, आमडी, पंगडी आदी परिसरात वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात उपद्रव माजविला आहे. याबाबत शेतकऱ्यांची ओरड वाढलेली असूनही वनविभाग या समस्येकडे लक्ष पुरविण्यास मात्र तयार नाही. शिरोली येथील शेतकरी नंदकिशोर पायताडे यांच्या शेतातील संपूर्ण ज्वारीचे हाती आलेले पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त करून टाकले आहे. उधार उसनवारी करून पेरलेली ज्वारी आता बहरली होती. काही दिवसांतच हे पीक शेतकऱ्याच्या हाती येणार होते. मात्र, ऐनवेळी रानडुकरांनी त्यांच्या शेतात शिरकाव केला. त्यांच्या शेतातील संपूर्ण ज्वारीचे पीक आडवे पडले आहे. आता कर्जफेडीची चिंता या शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे वनविभागाने शेतपिकाच्या नुकसानीची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या परिसरात जंगल क्षेत्र असल्याने बिबट्यासह रोही, रानडुकर या वन्यप्राण्यांचा सदैव वावर असतो. वानरांमुळे या भागातील शेतपिके दरवर्षीच बाधीत होतात. (तालुका प्रतिनिधी)