शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

मजुरांना लुटण्यासाठी टोळके गावखेड्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:28 IST

राज्य सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या नावाखाली बांधकाम मजुरांची आर्थिक लूट होत आहे. गावखेड्यात पोहोचून निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यासाठी सुटाबुटातले टोळके सज्ज झाले आहे.

ठळक मुद्देदिशाभूल : अटल विश्वकर्मा सन्मान योजना, जादा रकमेची मागणी

सुरज नौकरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव(देवी) : राज्य सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या नावाखाली बांधकाम मजुरांची आर्थिक लूट होत आहे. गावखेड्यात पोहोचून निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यासाठी सुटाबुटातले टोळके सज्ज झाले आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयांचाही वापर केला जात आहे. मजुरांची दिशाभूल करून रक्कम वसूल केली जात असल्याचे सांगितले जाते.महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध २८ कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. याचा लाभ घेण्यासाठी १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगारांना मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ४ आॅगस्टपर्यंत विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. यासाठी नोंदणी फी २५ रुपये आणि पाच वर्षांकरिता दरमहा एक रुपया याप्रमाणे ६० रुपये असे एकूण ८५ रुपये शुल्क भरायचे आहे.नोंदणीसाठी आलेल्या काही लोकांकडून ग्रामपंचायतीशी संपर्क साधला जातो. दवंडी देऊन नोंदणीसाठी कागदपत्र घेऊन बोलाविले जाते. आसेगाव(देवी) येथे झालेल्या अभियान कार्यक्रमात लोकांना वेगळाच अनुभव आला. महामंडळाने एकूण ८५ रुपये शुल्क जाहीर केलेले असताना याठिकाणी आलेल्या लोकांनी ६०० रुपयांची मागणी केली. बाभूळगाव पंचायत समितीत ८५ रुपयात नोंदणी केली जाते. तुम्ही ६०० रुपये कसे घेता, असा प्रश्न केला असता अभियानातील लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय बाभूळगाव, यवतमाळ येथे कॅम्पमधून नोंदणी केल्यास योजनांचा लाभ मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.गावकऱ्यांनी याठिकाणी नोंदणी केली नाही. मात्र लगतच्या काही गावांमध्ये या प्रकाराचे काही लोक बळी ठरले असल्याची माहिती आहे. यावली, डेहणी या गावांमध्येही असा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. सरपंच, ग्रामसचिव यांच्याकडे सदर प्रकाराविषयी तक्रार करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात जागा तेवढी उपलब्ध करून देण्यात आली. इतर बाबींविषयी माहिती नाही, असे सांगण्यात आले. संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी यासंदर्भात लोकांना माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पंचायत समितीमध्येच नोंदणी करता येते. यासाठी निर्धारित केवळ ८५ रुपयांचाच भरणा करावा लागतो. याची पावतीसुद्धा दिली जाते. त्यामुळे बांधकाम मजुरांनी ही दक्षता घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना