शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

मजुरांना लुटण्यासाठी टोळके गावखेड्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:28 IST

राज्य सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या नावाखाली बांधकाम मजुरांची आर्थिक लूट होत आहे. गावखेड्यात पोहोचून निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यासाठी सुटाबुटातले टोळके सज्ज झाले आहे.

ठळक मुद्देदिशाभूल : अटल विश्वकर्मा सन्मान योजना, जादा रकमेची मागणी

सुरज नौकरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव(देवी) : राज्य सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या नावाखाली बांधकाम मजुरांची आर्थिक लूट होत आहे. गावखेड्यात पोहोचून निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यासाठी सुटाबुटातले टोळके सज्ज झाले आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयांचाही वापर केला जात आहे. मजुरांची दिशाभूल करून रक्कम वसूल केली जात असल्याचे सांगितले जाते.महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध २८ कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. याचा लाभ घेण्यासाठी १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगारांना मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ४ आॅगस्टपर्यंत विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. यासाठी नोंदणी फी २५ रुपये आणि पाच वर्षांकरिता दरमहा एक रुपया याप्रमाणे ६० रुपये असे एकूण ८५ रुपये शुल्क भरायचे आहे.नोंदणीसाठी आलेल्या काही लोकांकडून ग्रामपंचायतीशी संपर्क साधला जातो. दवंडी देऊन नोंदणीसाठी कागदपत्र घेऊन बोलाविले जाते. आसेगाव(देवी) येथे झालेल्या अभियान कार्यक्रमात लोकांना वेगळाच अनुभव आला. महामंडळाने एकूण ८५ रुपये शुल्क जाहीर केलेले असताना याठिकाणी आलेल्या लोकांनी ६०० रुपयांची मागणी केली. बाभूळगाव पंचायत समितीत ८५ रुपयात नोंदणी केली जाते. तुम्ही ६०० रुपये कसे घेता, असा प्रश्न केला असता अभियानातील लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय बाभूळगाव, यवतमाळ येथे कॅम्पमधून नोंदणी केल्यास योजनांचा लाभ मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.गावकऱ्यांनी याठिकाणी नोंदणी केली नाही. मात्र लगतच्या काही गावांमध्ये या प्रकाराचे काही लोक बळी ठरले असल्याची माहिती आहे. यावली, डेहणी या गावांमध्येही असा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. सरपंच, ग्रामसचिव यांच्याकडे सदर प्रकाराविषयी तक्रार करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात जागा तेवढी उपलब्ध करून देण्यात आली. इतर बाबींविषयी माहिती नाही, असे सांगण्यात आले. संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी यासंदर्भात लोकांना माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पंचायत समितीमध्येच नोंदणी करता येते. यासाठी निर्धारित केवळ ८५ रुपयांचाच भरणा करावा लागतो. याची पावतीसुद्धा दिली जाते. त्यामुळे बांधकाम मजुरांनी ही दक्षता घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना