शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कोरोनाच्या भीतीने यवतमाळातील रस्ते सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

संचारबंदी असताना अनावश्यक कामे टाळण्याच्या सूचना आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना आहे. मात्र जिल्ह्यातील काही नागरिक या सूचना पाळत नाहीत. कुठलेही काम नसताना गावात वेगाने वाहन चालवितात. अनेक ठिकाणी गोंधळ करीत आहेत. अशा व्यक्तींना प्रथम समज दिल्यानंतरही त्या व्यक्तींनी दुरूस्ती केली नाही. अशा व्यक्तींवर दंडुके बरसविण्याचे काम पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्देनियम मोडणाऱ्या ५९ जणांवर कारवाईनियम मोडणाऱ्या नागरिकांना दंड्यांचा प्रसाददत्त चौकात भाजी विक्रेत्यांनी ठेवले अंतरमास्क खरेदीसाठी महिलांनीही केली गर्दी

चौकाचौकात फळ विक्रेत्यांची दुकानेकिराणा दुकानदाराने अंतरासाठी बांधली दोरीग्रामीण भागात काट्या टाकून रस्ते अडविलेबाहेरून येणाऱ्यांकडे संशयाची नजरभिक्षेकऱ्यांच्या भोजनासाठी सरसावले कार्यकर्तेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाली. रस्ते सामसूम व नागरिक घामाघूम झाले. मात्र काही व्यक्ती नियमांचे उल्लंघन करतात. अशा ५९ नागरिकांवर पोलीस प्रशासनाने फौजदारी कारवाई केली आहे.संचारबंदी असताना अनावश्यक कामे टाळण्याच्या सूचना आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना आहे. मात्र जिल्ह्यातील काही नागरिक या सूचना पाळत नाहीत. कुठलेही काम नसताना गावात वेगाने वाहन चालवितात. अनेक ठिकाणी गोंधळ करीत आहेत. अशा व्यक्तींना प्रथम समज दिल्यानंतरही त्या व्यक्तींनी दुरूस्ती केली नाही. अशा व्यक्तींवर दंडुके बरसविण्याचे काम पोलीस करीत आहेत. काही दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. या विक्रेत्यांनी नियम मोडून दुकाने उघडली. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना अंतर ठेवण्याच्या सूचना आहे. या नियमांचे पालन होत नाही म्हणून किराणा व्यावसायिकांनी दुकानात मुख्य काऊंटरच्या समोरच दोरी बांधली आहे. यामुळे आपसूकच अंतर वाढले आहे.दुकानातील किराणा संपत असल्याने काही व्यावसायिकांनी धान्य भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातून मु्ख्य बाजारपेठेत ठोक विक्रेत्यांकडे गर्दी पहायला मिळते.स्वत:च्या संरक्षणासाठी मास्क खरेदी वाढली आहे. मास्क विक्रीची दुकाने बुधवारी शहरात पहायला मिळाली. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होती. मात्र दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट होता. विविध ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पहायला मिळाला. गल्ली-बोळातून पोलिसांची वाहने फिरत होती. त्यावर सूचना प्रसारित केल्या जात होत्या. तरीही काही हवसे बाहेर फिरत होते.दूध आणि भाजीपाला गावातच विकणारसंचारबंदी असल्याने ग्रामस्थांनी गावातील दूध आणि भाजीपाला गावातच विकण्याचा निर्णय घेतला आहे. जामडोह गावाने हा निर्णय जाहीर केला आहे. तर जामवाडीमध्ये दूध विक्रेत्यांनी गावातच दूध विकण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. भाजीपाला उत्पादक गावात भाजीपाला नेण्यासाठी वाहने मिळत नाही, यामुळे शेतकºयांनी गावतच भाजीपाला विकणे सुरू केले आहे. यामुळे भाजीमंडीकडे येणारा भाजीपाला थांबला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस