शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

कोरोनाच्या भीतीने यवतमाळातील रस्ते सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

संचारबंदी असताना अनावश्यक कामे टाळण्याच्या सूचना आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना आहे. मात्र जिल्ह्यातील काही नागरिक या सूचना पाळत नाहीत. कुठलेही काम नसताना गावात वेगाने वाहन चालवितात. अनेक ठिकाणी गोंधळ करीत आहेत. अशा व्यक्तींना प्रथम समज दिल्यानंतरही त्या व्यक्तींनी दुरूस्ती केली नाही. अशा व्यक्तींवर दंडुके बरसविण्याचे काम पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्देनियम मोडणाऱ्या ५९ जणांवर कारवाईनियम मोडणाऱ्या नागरिकांना दंड्यांचा प्रसाददत्त चौकात भाजी विक्रेत्यांनी ठेवले अंतरमास्क खरेदीसाठी महिलांनीही केली गर्दी

चौकाचौकात फळ विक्रेत्यांची दुकानेकिराणा दुकानदाराने अंतरासाठी बांधली दोरीग्रामीण भागात काट्या टाकून रस्ते अडविलेबाहेरून येणाऱ्यांकडे संशयाची नजरभिक्षेकऱ्यांच्या भोजनासाठी सरसावले कार्यकर्तेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाली. रस्ते सामसूम व नागरिक घामाघूम झाले. मात्र काही व्यक्ती नियमांचे उल्लंघन करतात. अशा ५९ नागरिकांवर पोलीस प्रशासनाने फौजदारी कारवाई केली आहे.संचारबंदी असताना अनावश्यक कामे टाळण्याच्या सूचना आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना आहे. मात्र जिल्ह्यातील काही नागरिक या सूचना पाळत नाहीत. कुठलेही काम नसताना गावात वेगाने वाहन चालवितात. अनेक ठिकाणी गोंधळ करीत आहेत. अशा व्यक्तींना प्रथम समज दिल्यानंतरही त्या व्यक्तींनी दुरूस्ती केली नाही. अशा व्यक्तींवर दंडुके बरसविण्याचे काम पोलीस करीत आहेत. काही दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. या विक्रेत्यांनी नियम मोडून दुकाने उघडली. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना अंतर ठेवण्याच्या सूचना आहे. या नियमांचे पालन होत नाही म्हणून किराणा व्यावसायिकांनी दुकानात मुख्य काऊंटरच्या समोरच दोरी बांधली आहे. यामुळे आपसूकच अंतर वाढले आहे.दुकानातील किराणा संपत असल्याने काही व्यावसायिकांनी धान्य भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातून मु्ख्य बाजारपेठेत ठोक विक्रेत्यांकडे गर्दी पहायला मिळते.स्वत:च्या संरक्षणासाठी मास्क खरेदी वाढली आहे. मास्क विक्रीची दुकाने बुधवारी शहरात पहायला मिळाली. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होती. मात्र दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट होता. विविध ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पहायला मिळाला. गल्ली-बोळातून पोलिसांची वाहने फिरत होती. त्यावर सूचना प्रसारित केल्या जात होत्या. तरीही काही हवसे बाहेर फिरत होते.दूध आणि भाजीपाला गावातच विकणारसंचारबंदी असल्याने ग्रामस्थांनी गावातील दूध आणि भाजीपाला गावातच विकण्याचा निर्णय घेतला आहे. जामडोह गावाने हा निर्णय जाहीर केला आहे. तर जामवाडीमध्ये दूध विक्रेत्यांनी गावातच दूध विकण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. भाजीपाला उत्पादक गावात भाजीपाला नेण्यासाठी वाहने मिळत नाही, यामुळे शेतकºयांनी गावतच भाजीपाला विकणे सुरू केले आहे. यामुळे भाजीमंडीकडे येणारा भाजीपाला थांबला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस