शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कोट्यवधी खर्चूनही रस्ते ‘जैसे थे’

By admin | Updated: December 18, 2014 23:02 IST

विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्त्यांसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देते. महागाव तालुक्यातील रस्त्यांच्या निर्मिती आणि देखभाल दुरुस्तीसाठी आतापर्यंत कोट्यवधीचा निधी आला.

महागाव : विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्त्यांसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देते. महागाव तालुक्यातील रस्त्यांच्या निर्मिती आणि देखभाल दुरुस्तीसाठी आतापर्यंत कोट्यवधीचा निधी आला. मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पाहता हा निधी गेला कोठे, असा प्रश्न निर्माण होतो. ग्रामीण भागातील रस्ते उखडलेले असून या रस्त्यांवरून धड चालताही येत नाही. मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची ओरड सातत्याने होत असताना गुणवत्ता तपासणीही कागदावरच झाल्याचे दिसत आहे. महागाव तालुका डोंगरदऱ्यात वसला आहे. अनेक गावे आडवळणावर आहे. या गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी आणि तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी आतापर्यंत दिला आहे. दरवर्षी देखभाल दुरुस्तीसाठीही निधी दिला जातो. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून हा निधी योग्यरित्या खर्चच केला जात नाही. तालुक्यातील अनेक रस्त्यांवर खर्च झालेला निधीचा कवडीचाही फायदा जनतेला होत नाही. तालुक्याच्या मानात शिरपेच खोवणारा नागपूर-बोरी-तुळजापूर हा राज्यमार्ग होय. या राज्य मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते. परंतु अनेक ठिकाणी दोन-दोन फुटाचे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे दोन महिलांना प्राणही गमवावे लागले. मुख्य रस्त्याचीच ही अवस्था असेल तर ग्रामीण भागातील रस्त्याबाबत न बोललेलेच बरे. सवना-वाकोडी, मुडाणा-गौळ, बिजोरा-दगडथर, वडद-बेलदरी, मुडाणा-वडद, पिंपळगाव-भांब, अनंतवाडी-कोंढा, हिवरा-बारभाईतांडा, पोखरी-कोणदरी, माळहिवरा - खडका-चिलगव्हाणसह तालुक्यातील अनेक रस्त्यांची खस्ता हालत आहे. रस्ते नूतनीकरणासाठी दरवर्षी शासनाकडून पैसा येतो. परंतु गैरप्रकारामुळे या रस्त्याचे भाग्यच उजळत नाही. नागरिकांनाही खाचखळग्यातून जावे लागते. आता तर खाचगळ्याची या भागातील नागरिकांना सवय झाली आहे. रस्त्या गुणवत्तेबाबत नेहमी ओरड असते. वरिष्ठांपर्यंत तक्रारी केल्या जातात. परंतु गुणवत्ता नियंत्रण विभाग केवळ थातूरमातूर दौरा करते. नमुना घेतात. नंतर मात्र काहीच होत नाही. जणू या पथकासोबत येथील कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचेच यातून दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)