शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

रेल्वेने अडविला शेतकऱ्यांचा रस्ता

By admin | Updated: March 10, 2017 01:16 IST

इंग्रज राजवटीपासून असलेले वडगाव रस्त्यावरील गेट बंद करून शेकडो शेतकऱ्यांचाव मार्गच रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे.

इंग्रजकालीन गेट बंद : शेती करणे झाले कठीण, रस्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणीवणी : इंग्रज राजवटीपासून असलेले वडगाव रस्त्यावरील गेट बंद करून शेकडो शेतकऱ्यांचाव मार्गच रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेती करणे कष्टप्राय बनले आहे. रेल्वे प्रशासनाने बंद केलेले गेट पूर्ववत सुरू करून शेतकऱ्यांना त्रासमुक्त करावे, अशी मागणी होत आहे.नागपूर-वणी-राजूर (कॉलरी) हा रेल्वेमार्ग इंग्रज राजवटीत सुरू झाला. कोळसा व चुना या खनिजांची वाहतूक या मार्गाने केली जात होती. या रेल्वे मार्गावर वरोरा रस्ता, नांदेपेरा रस्ता व वडगाव रस्ता या ठिकाणी मानवरहित रेल्वेगेट होते. वडगाव रस्त्यावर किमी ८५६/३-४ याठिकाणी गेट क्रमांक ७ सी. होते. वणी शहरातील शेकडो शेतकऱ्यांची शेती वडगाव व रांगणा शिवारात आहे. हे सर्व शेतकरी वडगाव रस्त्यानेच रहदारी करून शेती करीत होते. त्यानंतर वणी-आदिलाबाद हा रेल्वे मार्ग बनविण्यात आला. या रेल्वे मार्गावरून प्रवासी गाड्या सुरू झाल्या. रेल्वे प्रशासनाने मानवरहित रेल्वे गेटची संख्या कमी करण्याचे धोरण अवलंबले. यामध्ये वडगाव रस्त्यावरील गेट क्रमांक ७ सी. बंद करण्यात आले. शहरातील जनतेसाठी पर्यायी रस्ता म्हणून नांदेपेरा गेटजवळ मिळणारा उपरस्ता तयार करून दिला. मात्र हा रस्ता जनतेसाठी सात किलोमीटरचा फेरा देणारा आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांना हा रस्ता अडचणीचा ठरत आहे. शेतकऱ्यांना जनावरे घेऊन जाणे कटकटीचे बनले आहे. शेतमजुरांना शेतात नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जनावरे जुन्याच वडगाव रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जनावरांचे अपघात घडत आहे. वणी-यवतमाळ बायपास रस्त्यावर प्रचंड रहदारी असल्याने हा मार्ग धोक्याचा बनला आहे. म्हणूनच वडगाव रस्त्यावरील फाटक पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी करणारे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, रेल्वेचे प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिले. यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती संगीता भंडारी, आरोग्य सभापती संतोष डंभारे, नगरसेवक राकेश बुग्गेवार, विवेक कोकणे, नरेंद्र भंडारी, सुधाकर मत्ते, आदी उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)