शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

रेल्वेने अडविला शेतकऱ्यांचा रस्ता

By admin | Updated: March 10, 2017 01:16 IST

इंग्रज राजवटीपासून असलेले वडगाव रस्त्यावरील गेट बंद करून शेकडो शेतकऱ्यांचाव मार्गच रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे.

इंग्रजकालीन गेट बंद : शेती करणे झाले कठीण, रस्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणीवणी : इंग्रज राजवटीपासून असलेले वडगाव रस्त्यावरील गेट बंद करून शेकडो शेतकऱ्यांचाव मार्गच रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेती करणे कष्टप्राय बनले आहे. रेल्वे प्रशासनाने बंद केलेले गेट पूर्ववत सुरू करून शेतकऱ्यांना त्रासमुक्त करावे, अशी मागणी होत आहे.नागपूर-वणी-राजूर (कॉलरी) हा रेल्वेमार्ग इंग्रज राजवटीत सुरू झाला. कोळसा व चुना या खनिजांची वाहतूक या मार्गाने केली जात होती. या रेल्वे मार्गावर वरोरा रस्ता, नांदेपेरा रस्ता व वडगाव रस्ता या ठिकाणी मानवरहित रेल्वेगेट होते. वडगाव रस्त्यावर किमी ८५६/३-४ याठिकाणी गेट क्रमांक ७ सी. होते. वणी शहरातील शेकडो शेतकऱ्यांची शेती वडगाव व रांगणा शिवारात आहे. हे सर्व शेतकरी वडगाव रस्त्यानेच रहदारी करून शेती करीत होते. त्यानंतर वणी-आदिलाबाद हा रेल्वे मार्ग बनविण्यात आला. या रेल्वे मार्गावरून प्रवासी गाड्या सुरू झाल्या. रेल्वे प्रशासनाने मानवरहित रेल्वे गेटची संख्या कमी करण्याचे धोरण अवलंबले. यामध्ये वडगाव रस्त्यावरील गेट क्रमांक ७ सी. बंद करण्यात आले. शहरातील जनतेसाठी पर्यायी रस्ता म्हणून नांदेपेरा गेटजवळ मिळणारा उपरस्ता तयार करून दिला. मात्र हा रस्ता जनतेसाठी सात किलोमीटरचा फेरा देणारा आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांना हा रस्ता अडचणीचा ठरत आहे. शेतकऱ्यांना जनावरे घेऊन जाणे कटकटीचे बनले आहे. शेतमजुरांना शेतात नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जनावरे जुन्याच वडगाव रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जनावरांचे अपघात घडत आहे. वणी-यवतमाळ बायपास रस्त्यावर प्रचंड रहदारी असल्याने हा मार्ग धोक्याचा बनला आहे. म्हणूनच वडगाव रस्त्यावरील फाटक पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी करणारे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, रेल्वेचे प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिले. यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती संगीता भंडारी, आरोग्य सभापती संतोष डंभारे, नगरसेवक राकेश बुग्गेवार, विवेक कोकणे, नरेंद्र भंडारी, सुधाकर मत्ते, आदी उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)