शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा रस्ता अडला

By admin | Updated: August 28, 2016 00:16 IST

दळणवळणाची अत्याधुनिक साधने निर्माण झालेली असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता अडचण जात आहे

बस चालू करा : १५ गावांतील विद्यार्थ्यांचा टाहोउमरखेड : दळणवळणाची अत्याधुनिक साधने निर्माण झालेली असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता अडचण जात आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या तब्बल १५ गावातील विद्यार्थ्यांचा मार्गच बसफेरीविना बंद झाला आहे. त्यामुळे उमरखेड ते चातारी बसफेरी चालू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उमरखेड येथील महाविद्यालयामध्ये दररोज जाणे-येणे करावे लागते. मात्र उमरखेड ते चातारी ही बससेवा नसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमरखेड आगाराने तत्काळ ही बसफेरी सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. उमरखेडला येण्यासाठी तत्काळ बस सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ब्राह्मणगाव, चातारी, परजना, सिंदगी, मानकेश्वर, कोपरा, बोरी, हरदडा, सोईट आदी गावांतून शेकडो विद्यार्थी दररोज उमरखेडला शिक्षणासाठी जाणे-येणे करतात. उमरखेड ते चातारी ही बसफेरी सुरू झाल्यास त्यांच्या शिक्षणातील मोठा अडसर दूर होणार आहे. या बसफेरीसाठी विद्यार्थ्यांनी या पूर्वीही दोनवेळा लेखी निवेदन दिले. सोबतच परिसरातील सर्व गावांमधील ग्रामसभांनीही याबाबत ठराव दिले आहे. तरीही उमरखेड आगाराकडून बसफेरी सुरू करण्याबाबत दिरंगाई केली जात आहे. अखेर शनिवारी दुपारी ४ वाजता मोठ्या संख्येत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उमरखेड आगार प्रमुखांच्या कार्यालयात धडक दिली. आगार प्रमुख जयेश आठवले व सहायक वाहतूक अधीक्षक एस.डी. नाटकर यांची भेट घेवून आपली समस्या मांडली. बसफेरी सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा लेखी निवेदनही दिले. ब्राह्मणगाव येथे डीएड कॉलेज व कृषी विद्यालय आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी श्रीहरी मोरे, माधव मटके, नीलेश वाठोरे, शुभम गोरे, आकाश धोंगरकर, ओंकार साळेकर, अक्षय शिंदे, एकनाथ लांडे, ओंकार वानखेडे, संदीप राठोड, वैभव खडसे, वैष्णवी वंजारे, अश्विनी जगदेकर, वर्षा गाडेकर, पूजा वाघमारे, सूरज मोरे, जमीन खान पठाण, शैलेश विणकरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)गुणवत्तेला मार्ग मोकळा करागेल्या काही वर्षात उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात राज्यस्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. गरिबी आणि इतर अडचणींवर मात करीत स्पर्धा परीक्षांमध्येही या विद्यार्थ्यांची चुणूक दिसून आली. विशेषत: बंदीभागातील विद्यार्थ्यांनी तालुक्याचा मोठा नावलौकिक केला. रवींद्र राठोड या विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पद पटकावले, तर रेखा खडतकर या विद्यार्थिनीने कोणतेही आर्थिक स्थैर्य नसताना एमबीबीएसपर्यंत मजल मारली. या दोन्ही ताज्या उदाहरणांमुळे तालुक्याची मान उंचावली आहे. मात्र अशा अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या गावातून महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी साधी बससेवा सुरू करण्याचे सौजन्यही दाखवायला आगार प्रमुख तयार नाही. त्यामुळे रोष व्यक्त होत आहे.