शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

शिक्षणाचा रस्ता अडला

By admin | Updated: August 28, 2016 00:16 IST

दळणवळणाची अत्याधुनिक साधने निर्माण झालेली असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता अडचण जात आहे

बस चालू करा : १५ गावांतील विद्यार्थ्यांचा टाहोउमरखेड : दळणवळणाची अत्याधुनिक साधने निर्माण झालेली असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता अडचण जात आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या तब्बल १५ गावातील विद्यार्थ्यांचा मार्गच बसफेरीविना बंद झाला आहे. त्यामुळे उमरखेड ते चातारी बसफेरी चालू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उमरखेड येथील महाविद्यालयामध्ये दररोज जाणे-येणे करावे लागते. मात्र उमरखेड ते चातारी ही बससेवा नसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमरखेड आगाराने तत्काळ ही बसफेरी सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. उमरखेडला येण्यासाठी तत्काळ बस सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ब्राह्मणगाव, चातारी, परजना, सिंदगी, मानकेश्वर, कोपरा, बोरी, हरदडा, सोईट आदी गावांतून शेकडो विद्यार्थी दररोज उमरखेडला शिक्षणासाठी जाणे-येणे करतात. उमरखेड ते चातारी ही बसफेरी सुरू झाल्यास त्यांच्या शिक्षणातील मोठा अडसर दूर होणार आहे. या बसफेरीसाठी विद्यार्थ्यांनी या पूर्वीही दोनवेळा लेखी निवेदन दिले. सोबतच परिसरातील सर्व गावांमधील ग्रामसभांनीही याबाबत ठराव दिले आहे. तरीही उमरखेड आगाराकडून बसफेरी सुरू करण्याबाबत दिरंगाई केली जात आहे. अखेर शनिवारी दुपारी ४ वाजता मोठ्या संख्येत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उमरखेड आगार प्रमुखांच्या कार्यालयात धडक दिली. आगार प्रमुख जयेश आठवले व सहायक वाहतूक अधीक्षक एस.डी. नाटकर यांची भेट घेवून आपली समस्या मांडली. बसफेरी सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा लेखी निवेदनही दिले. ब्राह्मणगाव येथे डीएड कॉलेज व कृषी विद्यालय आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी श्रीहरी मोरे, माधव मटके, नीलेश वाठोरे, शुभम गोरे, आकाश धोंगरकर, ओंकार साळेकर, अक्षय शिंदे, एकनाथ लांडे, ओंकार वानखेडे, संदीप राठोड, वैभव खडसे, वैष्णवी वंजारे, अश्विनी जगदेकर, वर्षा गाडेकर, पूजा वाघमारे, सूरज मोरे, जमीन खान पठाण, शैलेश विणकरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)गुणवत्तेला मार्ग मोकळा करागेल्या काही वर्षात उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात राज्यस्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. गरिबी आणि इतर अडचणींवर मात करीत स्पर्धा परीक्षांमध्येही या विद्यार्थ्यांची चुणूक दिसून आली. विशेषत: बंदीभागातील विद्यार्थ्यांनी तालुक्याचा मोठा नावलौकिक केला. रवींद्र राठोड या विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पद पटकावले, तर रेखा खडतकर या विद्यार्थिनीने कोणतेही आर्थिक स्थैर्य नसताना एमबीबीएसपर्यंत मजल मारली. या दोन्ही ताज्या उदाहरणांमुळे तालुक्याची मान उंचावली आहे. मात्र अशा अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या गावातून महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी साधी बससेवा सुरू करण्याचे सौजन्यही दाखवायला आगार प्रमुख तयार नाही. त्यामुळे रोष व्यक्त होत आहे.