शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

शिक्षणाचा रस्ता अडला

By admin | Updated: August 28, 2016 00:16 IST

दळणवळणाची अत्याधुनिक साधने निर्माण झालेली असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता अडचण जात आहे

बस चालू करा : १५ गावांतील विद्यार्थ्यांचा टाहोउमरखेड : दळणवळणाची अत्याधुनिक साधने निर्माण झालेली असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता अडचण जात आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या तब्बल १५ गावातील विद्यार्थ्यांचा मार्गच बसफेरीविना बंद झाला आहे. त्यामुळे उमरखेड ते चातारी बसफेरी चालू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उमरखेड येथील महाविद्यालयामध्ये दररोज जाणे-येणे करावे लागते. मात्र उमरखेड ते चातारी ही बससेवा नसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमरखेड आगाराने तत्काळ ही बसफेरी सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. उमरखेडला येण्यासाठी तत्काळ बस सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ब्राह्मणगाव, चातारी, परजना, सिंदगी, मानकेश्वर, कोपरा, बोरी, हरदडा, सोईट आदी गावांतून शेकडो विद्यार्थी दररोज उमरखेडला शिक्षणासाठी जाणे-येणे करतात. उमरखेड ते चातारी ही बसफेरी सुरू झाल्यास त्यांच्या शिक्षणातील मोठा अडसर दूर होणार आहे. या बसफेरीसाठी विद्यार्थ्यांनी या पूर्वीही दोनवेळा लेखी निवेदन दिले. सोबतच परिसरातील सर्व गावांमधील ग्रामसभांनीही याबाबत ठराव दिले आहे. तरीही उमरखेड आगाराकडून बसफेरी सुरू करण्याबाबत दिरंगाई केली जात आहे. अखेर शनिवारी दुपारी ४ वाजता मोठ्या संख्येत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उमरखेड आगार प्रमुखांच्या कार्यालयात धडक दिली. आगार प्रमुख जयेश आठवले व सहायक वाहतूक अधीक्षक एस.डी. नाटकर यांची भेट घेवून आपली समस्या मांडली. बसफेरी सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा लेखी निवेदनही दिले. ब्राह्मणगाव येथे डीएड कॉलेज व कृषी विद्यालय आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी श्रीहरी मोरे, माधव मटके, नीलेश वाठोरे, शुभम गोरे, आकाश धोंगरकर, ओंकार साळेकर, अक्षय शिंदे, एकनाथ लांडे, ओंकार वानखेडे, संदीप राठोड, वैभव खडसे, वैष्णवी वंजारे, अश्विनी जगदेकर, वर्षा गाडेकर, पूजा वाघमारे, सूरज मोरे, जमीन खान पठाण, शैलेश विणकरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)गुणवत्तेला मार्ग मोकळा करागेल्या काही वर्षात उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात राज्यस्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. गरिबी आणि इतर अडचणींवर मात करीत स्पर्धा परीक्षांमध्येही या विद्यार्थ्यांची चुणूक दिसून आली. विशेषत: बंदीभागातील विद्यार्थ्यांनी तालुक्याचा मोठा नावलौकिक केला. रवींद्र राठोड या विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पद पटकावले, तर रेखा खडतकर या विद्यार्थिनीने कोणतेही आर्थिक स्थैर्य नसताना एमबीबीएसपर्यंत मजल मारली. या दोन्ही ताज्या उदाहरणांमुळे तालुक्याची मान उंचावली आहे. मात्र अशा अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या गावातून महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी साधी बससेवा सुरू करण्याचे सौजन्यही दाखवायला आगार प्रमुख तयार नाही. त्यामुळे रोष व्यक्त होत आहे.