शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

नदीकाठच्या शेतांना धोका

By admin | Updated: June 8, 2014 00:11 IST

तालुक्यातून वाहणार्‍या वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांतील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते. पुराचे पाणी शेतात शिरून शेती खरडून गेल्याने त्यांचे हिरवे स्वप्न कोमेजते.

वणी : तालुक्यातून वाहणार्‍या वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांतील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते. पुराचे पाणी शेतात शिरून शेती खरडून गेल्याने त्यांचे हिरवे स्वप्न कोमेजते. त्यामुळे बळीराजा देशोधडीला लागतो. त्या मोबदल्यात शासनाकडून तुटपुंजी मदत मिळत असल्याने त्यांची एकप्रकारे चेष्टाच होते.वर्धा, पैनगंगा नदीच्या खोर्‍यात मोठय़ा प्रमाणात खनिज साठा उपलब्ध आहे. त्यात दगडी कोळसा मोठय़ा प्रमाणात आहे. परिणामी तालुक्यात कोळशाच्या खुल्या व भूमिगत खाणी तयार झाल्या आहेत. या खाणीतील मातीचे ढिगारे नदी काठालगत टाकण्यात आल्याने ते पावसाळय़ात ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरतात. मातीच्या ढिगार्‍यांमुळे पुराचे पाणी गावात शिरते. ते शेतातही पसरते. त्यामुळे शेतातील पीक पूर्णत: पाण्याखाली येते. पाण्यामुळे ते पिवळे पडून जागीच सडते. त्यात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते. त्यांना आर्थिक फटका बसतो.  या पुरामुळे शेतकर्‍यांच्या हिरव्या स्वप्नावरच पाणी फेरले जाते. वर्धा, पैनंगगा नदी व निगरुडा नदी तसेच नाल्यांना पूर आल्यास या शेतपिकांचे नुकसान होते. नाल्यांचे पाणी पुढे सरकत नसल्याने ते शेतात शिरते. त्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होते. परिणामी रखरखत्या उन्हात घाम गाळून मशागत करून तयार केलेली शेतजमीन पुरामुळे खरडून जाते. पूर नैसर्गिक असतो. मात्र वेकोलिच्या मातीच्या ढिगार्‍यांनी आडकाठी आणून नदी व नाल्यांना वळण दिल्याने पुराचा धोका वाढतो. तथापि वेकोलि शेतकर्‍यांना मदत करण्यास पुढाकार घेत नाही. प्रदूषणामुळे शेत पिकांचे नुकसान झाले, तरी वेकोलि पुरेशी मदत करीत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)