शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

नदीकाठच्या शेतांना धोका

By admin | Updated: June 8, 2014 00:11 IST

तालुक्यातून वाहणार्‍या वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांतील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते. पुराचे पाणी शेतात शिरून शेती खरडून गेल्याने त्यांचे हिरवे स्वप्न कोमेजते.

वणी : तालुक्यातून वाहणार्‍या वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांतील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते. पुराचे पाणी शेतात शिरून शेती खरडून गेल्याने त्यांचे हिरवे स्वप्न कोमेजते. त्यामुळे बळीराजा देशोधडीला लागतो. त्या मोबदल्यात शासनाकडून तुटपुंजी मदत मिळत असल्याने त्यांची एकप्रकारे चेष्टाच होते.वर्धा, पैनगंगा नदीच्या खोर्‍यात मोठय़ा प्रमाणात खनिज साठा उपलब्ध आहे. त्यात दगडी कोळसा मोठय़ा प्रमाणात आहे. परिणामी तालुक्यात कोळशाच्या खुल्या व भूमिगत खाणी तयार झाल्या आहेत. या खाणीतील मातीचे ढिगारे नदी काठालगत टाकण्यात आल्याने ते पावसाळय़ात ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरतात. मातीच्या ढिगार्‍यांमुळे पुराचे पाणी गावात शिरते. ते शेतातही पसरते. त्यामुळे शेतातील पीक पूर्णत: पाण्याखाली येते. पाण्यामुळे ते पिवळे पडून जागीच सडते. त्यात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते. त्यांना आर्थिक फटका बसतो.  या पुरामुळे शेतकर्‍यांच्या हिरव्या स्वप्नावरच पाणी फेरले जाते. वर्धा, पैनंगगा नदी व निगरुडा नदी तसेच नाल्यांना पूर आल्यास या शेतपिकांचे नुकसान होते. नाल्यांचे पाणी पुढे सरकत नसल्याने ते शेतात शिरते. त्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होते. परिणामी रखरखत्या उन्हात घाम गाळून मशागत करून तयार केलेली शेतजमीन पुरामुळे खरडून जाते. पूर नैसर्गिक असतो. मात्र वेकोलिच्या मातीच्या ढिगार्‍यांनी आडकाठी आणून नदी व नाल्यांना वळण दिल्याने पुराचा धोका वाढतो. तथापि वेकोलि शेतकर्‍यांना मदत करण्यास पुढाकार घेत नाही. प्रदूषणामुळे शेत पिकांचे नुकसान झाले, तरी वेकोलि पुरेशी मदत करीत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)