शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धोका माहीत आहे, पण प्रश्न रोजीरोटीचा आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:15 IST

‘जीवाला धोका आहे, हे आम्हाला कळत नाही का? पण प्रश्न पोटाचा आहे. पाठीवर पंप घेऊन विषाची फवारणी करत मृत्यूच्या दारात उभे असतो’ हे वास्तव शेतशिवारात कीटकनाशकांची फवारणी करणाºया शेतमजुरांचे आहे.

ठळक मुद्देकुटुंब उघड्यावर : फवारणीत सहा शेतमजुरांचा बळी

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘जीवाला धोका आहे, हे आम्हाला कळत नाही का? पण प्रश्न पोटाचा आहे. पाठीवर पंप घेऊन विषाची फवारणी करत मृत्यूच्या दारात उभे असतो’ हे वास्तव शेतशिवारात कीटकनाशकांची फवारणी करणाºया शेतमजुरांचे आहे. जिल्ह्यात फवारणीमुळे १९ जणांचा बळी गेला असून त्यात सहा शेतमजुरांचा समावेश आहे. पोटासाठी जीव गमावलेल्या या शेतमजुरांचे कुटुंब मात्र उघड्यावर आले आहे.यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो. परंतु गत दोन महिन्यांत या जिल्ह्याची नवी ओळख कीटकनाशक फवारणीच्या बळींमुळे होत आहे. १९ जणांचा प्राण गेला असून शेकडो शेतकरी आणि शेतमजूर मृत्यूच्या उंबरठ्यातून परतले आहे. यवतमाळ जिल्ह्यात गत काही वर्षांपासून फवारणीने विषबाधा होण्याचे प्रकार वाढले आहे. परंतु यंदा या फवारणीने कहरच केला. विविध कारणांनी फवारणी शेतकºयांच्या जीवावर उलटली. यात शेतकºयाच्या कामाला गेलेल्या शेतमजुराचाही बळी गेला आहे. जिल्ह्यात सहा मजुरांचा फवारणीने बळी घेतला. त्यात कळंब येथील देवीदास रामाजी मडावी, घाटंजी तालुक्यातील कुर्लीचा रमेश येरन्ना चिल्लरवार व मानोलीचा बंडू चंद्रभान सोनुले, मारेगाव येथील वसंत केशव सिडाम, दारव्हा तालुक्यातील उचेगावचा रवी धन्नू राठोड यांचा समावेश आहे.फवारणीसाठी आता शासकीय पातळीवर मार्गदर्शन केले जाते. विविध माध्यमातून शेतकरी आणि शेतमजुरांना फवारणी कशी करावी, हे सांगितले जाते. परंतु शेतातील वास्तव वेगळेच आहे. अनेक शेतमजूर म्हणतात, आम्ही यंदाच फवारणी करत नाही. कित्येक वर्षांपासून हेच काम करतो. परंतु असा प्रकार कधीच झाला नाही. सुरक्षेच्या साधनांचे काय? शेतकºयाजवळच गॉगल आणि हातमोजे नसतात.मग आमच्या मजुराकडे येणार तरी कसे? जीवाला धोका आहे, पण प्रश्न पोटाचा आहे, असा थेट सवालच शेतमजूर करतात. शासनाने गांभीर्याने हा विषय घेतला. सर्वांना मदतही घोषित केली. परंतु या मदतीत त्यांचे होणार तरी काय? ज्यांच्याकडे शेतीचा थोडा तरी तुकडा आहे, ते कसेतरी जगतील.परंतु ज्या शेतमजुरांचा चरितार्थच कुटुंबप्रमुखावर होता, त्याचाच फवारणीने बळी घेतला. त्यामुळे अख्खे कुटुंब उघड्यावर आले. दोन लाख रुपये किती दिवस पुरतील? मुलांच्या व कुटुंबाच्या पुनर्वसनाचा कायमस्वरूपी तोडगा शासनाने काढावा, अशी विनंती आता बळी ठरलेल्या शेतमजुरांचे कुटुंबीय करीत आहे.पहिला मृत्यू कळंबमध्येकीटकनाशकाच्या फवारणीत पहिला बळी ठरला तो कळंब येथील शेतमजूर देवीदास रामाजी मडावी. शेतात फवारणी करताना विषबाधा झाली. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र १९ आॅगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. यानंतर जिल्ह्यात पाठोपाठ १९ शेतकरी-शेतमजुरांचे बळी गेले. या सर्वांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली. परंतु ही मदत अतिशय तुटपुंजी आहे.कीटकनाशकांचा शरीरावर दीर्घकालीन परिणामजिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीने ४०० च्या वर शेतकरी-शेतमजूर मृत्यूच्या दाढेतून परत आले. घामावाटे त्यांच्या शरीरात विष भिनले. उपचार करून ही मंडळी आता आपल्या गावी गेली आहे. परंतु या कीटकनाशकांचे काही अंश त्यांच्या शरीरात असण्याची शक्यता आहे. कीटकनाशकांचा दीर्घकालीन परिणाम या शेतकरी-शेतमजुरांवर होण्याची शक्यता आहे. शासकीय पातळीवर केवळ फवारणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. मात्र विषबाधा झाल्यानंतर बाधितांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत कुणी काहीच सांगत नाही. विषबाधित शेतकरी मानसिकदृष्ट्या खचले असून त्यांच्या समुपदेशनाचीही गरज आहे.