शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविले

By admin | Updated: July 30, 2014 00:04 IST

बैद्यनाथ समितच्या शिफारशीनुसार पुनर्गठन आणि २५ टक्के वसुलीत मागे असलेल्या तालुक्यातील २८ सोसायट्यांपैकी सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविण्यात आले. तर २१ सोसायट्यांचे

महागाव : बैद्यनाथ समितच्या शिफारशीनुसार पुनर्गठन आणि २५ टक्के वसुलीत मागे असलेल्या तालुक्यातील २८ सोसायट्यांपैकी सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविण्यात आले. तर २१ सोसायट्यांचे कामकाज कसेतरी संजीवनीवर सुरू आहे. तालुक्यातील सवना, मुडाणा, फुलसावंगी, साई हिवरा, पोहंडुळ, आणि शिरपूर सोसायटीचा समावेश आहे. यापैकी मुडाणा सोसायटीच्या ६० सभासदांना कर्ज वाटप करण्यात आले. अपात्र असलेल्या सोसायट्यांचे कर्ज मागणी करणारे शेतकरी बँकेकडे अद्यापही फिरकले नाही. या सात सोसायटीतल सभासदांना बँकेमार्फत थेट कर्ज वाटप करण्यात येणार आहे. सोसायट्यांची वसली तर नाही. काही सोसायट्याने एका सभासदाला दोन दोन ठिकाणावरून कर्जपुरवठा केला आहे. सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविण्यात आल्याने बराच गोंधळ बाहेर येऊ लागला आहे. नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने सहकार विभाग नेमला आहे. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे विभागून दिली गेली. परंतु तालुक्यातील सोसायट्या आणि सहकार विभागाच्या संस्थांची स्थिती पाहिली तर सहकार विभाग पांढरा हत्ती झाल्याचे दिसत आहे. तालुक्यातील सहकार विभागाने ज्या संस्थेला मार्गदर्शन आणि पतपुरवठा करुन देण्यासाठी मार्गदर्शन करावयाचे आहे, अशा सर्व संस्थांचे अवसान गळून पडले. ज्या सोसायट्यांची वसुली शून्यावर आली आहे. संस्थांमधील अनागोंदी, गैरव्यवहार शोधून काढणे, त्यांना मार्गदर्शन करणे त्यांची आर्थिक सुबत्ता आणण्यास मदत मार्गदर्शन करणे हे काम सहकार विभागाचे आहे. अपवाद वगळता बहुतांश संस्था डबघाईस आल्या. काही संस्थेने गैरव्यवहाराचे विक्रम मोडले तरी अशा काही संस्थेमधील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार शोधून काढला नाही. जिल्हा बँकेनेच वसुलीत माघारलेल्या संस्थेवर कार्यवाही केली आहे. संस्थेने अधिकार गोठविणे त्याचाच एक भाग असून बँकेने आपल्या अधिकारात कार्यवाही केली आहे. परंतु सहकार विभागाचे वरातीमागून घोडे सुरूच आहेत. सोसायट्यातील अनागोंदी सर्वांच्या नाकासमोर आहे. कार्यवाही मात्र होताना दिसत नाही. सहकारात गोतावळ्यातील माणसं गुंतलेली असल्यामुळे कोणावर कार्यवाही करावी, असा सवाल बँकेलासुद्धा पडत आहे. कर्जवाटप आणि वसुली आॅलवेल असताना कार्यवाही शून्य आहे. (शहर प्रतिनिधी)