शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

दारव्हा तालुक्याच्या पाणीटंचाईचा आढावा

By admin | Updated: February 22, 2016 02:41 IST

सध्या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समाधानकारक स्थिती असली तरी काही दिवसांत जिल्हाभर पाणीटंचाई जाणवणार आहे.

पालकमंत्री : पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच उपाययोजना करा यवतमाळ : सध्या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समाधानकारक स्थिती असली तरी काही दिवसांत जिल्हाभर पाणीटंचाई जाणवणार आहे. संभाव्य पाणीटंचाई जाणविणाऱ्या गावांनी आतापासूनच तयारीला लागून याबाबतचा आराखडा सादर करणे, तो मंजूर करून घेणे आणि पाणीटंचाईपूर्वीच उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. पालकमंत्री राठोड यांनी दारव्हा तालुक्यातील पाणीटंचाई, जलयुक्त शिवार आणि रोजगार हमी योजनेचा बचत भवनात आढावा घेतला. ते म्हणाले, नळ योजनांची विशेष दुरूस्ती, टाकी बांधणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, विहीर खोलीकरण, विंधन विहिरी घेणे यासह तात्पुरत्या पूरक योजना वेळेत पूर्ण कराव्यात. अधिकाऱ्यांनीही पाणीटंचाईच्या योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. बैठकीला उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार प्रकाश राऊत, गटविकास अधिकारी संजय गुहे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी तालुक्यातील ९७ गावांच्या पाणीटंचाईबाबत गावनिहाय आढावा घेतला. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि नागरिकांकडून पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतली. पाणीटंचाईची शक्यता असलेल्या गावांचा समावेश टंचाई आराखड्यात करण्यात आला. मंजूर आराखड्यानुसार कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दिरंगाई केल्यास कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, गटविकास अधिकाऱ्यांनी कामाचा साप्ताहिक आढावा आणि अहवाल घ्यावा, असेही सांगितले. आढाव्या दरम्यान काही गावांमध्ये दूषित पाणी, नळ योजनेच्या वीज देयकांचा भरणा आदी प्रश्न समोर आले. याप्रमाणे सुधारीत आराखडा सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तांडा वस्ती सुधार योजनेतून यावर्षी केवळ पाणी पुरवठा आणि स्वच्छतागृहांसाठीच निधी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.पालकमंत्र्यांनी तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचाही आढावा घेतला. २०१६-१७ मध्ये ११ गावांत हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गावासाठी पालक अधिकारी नेमण्यात आला आहे. तसेच शिवार फेरीसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घ्यावीत, यातील कुशल आणि अकुशल कामांचा समतोल राखावा, असेही त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)