शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

मुख्यमंत्र्यांपूर्वी पालकसचिवांकडून आढावा

By admin | Updated: November 18, 2014 23:03 IST

पश्चिम विदर्भातील खरीप पीक परिस्थितीचा आढावा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत घेणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी जिल्ह्याचे पालकसचिव व्ही.गिरीराज यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून

विकास योजनांवर चर्चा : जिल्हा परिषदेतही घेतली तब्बल दोन तास बैठक यवतमाळ : पश्चिम विदर्भातील खरीप पीक परिस्थितीचा आढावा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत घेणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी जिल्ह्याचे पालकसचिव व्ही.गिरीराज यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थिती जाणून घेतली. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असलेले व्ही. गिरीराज जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. रबी व उन्हाळी ओलितासाठी धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यास सांगितले.जिल्ह्यात भीषण पाणी आणि चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता या बैठकीत वर्तविण्यात आली. जिल्ह्यात ७ लाख ७८ हजार पशुधन आहे. त्यांना जुलै महिन्यापर्यंत १५ लाख १३ हजार मेट्रीक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. खरिप - रबी आणि पडिक, जंगल क्षेत्रातून चारा उपलब्ध झाल्यानंतरही तब्बल एक लाख ३१ हजार मेट्रीक टन चाऱ्याची तूट भासणार आहे. अशा स्थितीत प्रशासनाकडून व्यवस्था केली जावी असा प्रस्ताव पालक सचिवासमोर ठेवण्यात आला. त्यानंतर जिल्हा कृषी अधिक्षक आणि कृषी विस्तार अधिकाऱ्यांकडून पीक स्थिती जाणून घेतली. सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली. रबीच्या पेरणीसाठी बियाणे आणि पाण्याची उलब्धता याचीही आकडेवारी सचिवांनी घेतली. त्यानंतर नगरपरिषद, ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणी टंचाईचा आणि त्यावर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. धडक सिंचन योजनेतून मंजूर झालेल्या विहीर वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश दिले. ही योजना रोजगार हमी आणि जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येते. धडक सिंचनच्या विहीर बांधकामाला प्राधन्य देण्यास व्ही. गिरीराज यांनी सांगितले. शनिवारी खरीप आढावा बैठक होत आहे. विभागात बहुतांश गावात आणेवारी ५० टक्क्याच्या आत आहे. दुष्काळी परिस्थिीतीच्या उपाययोजना व बैठकीच्या तयारीच्या दृष्टीने अधिकारी अपडेट होत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)