शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 01:58 IST

महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर आकसबुध्दीने कारवाई केल्याचा आरोप करित जिल्हा महसूल कर्मचारी

यवतमाळ : महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर आकसबुध्दीने कारवाई केल्याचा आरोप करित जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून जिल्हाभर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनात जिल्ह्यातील एक हजार ६०८ पैकी ४७८ कर्मचारी सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक विभागात शुकशुकाट असल्याने कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसत आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून महसूल कर्मचारी संघटनेतील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय कर्मचारी कल्याण निधीचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान तीन कर्मचारी नेत्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे संघटनेने प्रशासनाविरोधात बंड पुकारले आहे. ही कारवाई मागे घेण्यासाठी सोमवारी कनिष्ठ लिपक आणि अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाऱ्यांनी रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन बेमुदत असल्याचे सांगण्यात येत आहे. याला जिल्हा परिषदेतील नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने पाठींबा दिला आहे. आंदोलनापूर्वी कर्मचारी संघटनेने येथील भावे मंगल कार्यालयात सभा घेतली. या सभेला संघटन प्रमुख रवींद्र देशमुख आणि सरचिटणीस नंदकुमार बुटे यांनी मार्गदर्शन केले. सुरूवातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा बेत होता. मात्र ऐन वेळेवर तो रद्द करण्यात आला. महसूल कर्मचारी आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संघटनेच्या हालचालीवर पोलीस पाळत ठेवून होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभाग, निवडणूक विभाग, नैसर्गिक आपत्ती विभाग, नगरपरिषद प्रशासन विभाग, अभिलेखा विभाग, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय, रोहयो विभाग, भुसंपादन विभाग येथील बहुतांश कर्मचारी गैरहजर होते. (कार्यालय प्रतिनिधी)नोकरी जाईपर्यंत आंदोलन - रवींंद्र देशमुख प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने संघटनेच्या नेत्यांचे निलंबन केले आहे. ही आकस पूर्ण कारवाई मागे घ्यावी अन्यथा आम्हा सर्वांची नोकरी जाईपर्यंत आंदोलन करून असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेचे संघटन प्रमुख तथा सेवानिवृत्त नायब तहसीलदार रवींद्र देशमुख यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जागेत अतिक्रमणप्रकरणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. शिवाय कर्मचारी कल्याण निधीचे पैसे समितीला विश्वासात न घेताच प्रशासनाने काढून आंध्रा बँकेत ठेवले आहे. त्यामुळे प्रशासनावरच कारवाई का करण्यात येऊ नये, असा ठराव कल्याण समिती बैठकीत घेतला जाईल. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या चिथावणीवरूनच कारवाई केली जात आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले.