शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

परतीचा पाऊस ठरला कापसाचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. सोयाबीनच्या पिकाला सप्टेंबरमधील पावसाने झोडपून काढले. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र, दसऱ्याच्या सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. एकीकडे कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस घरात कसा आणावा, याची चिंता असतानाच पावसाने हा लाखमोलाचा कापूस भिजविला. आता दोन दिवस उघाड पडल्याशिवाय हा कापूस वेचता येणेही शक्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :   जिल्ह्याला यंदा पाऊस पावला. मात्र, आता दोन दिवसांपासून बरसणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. मध्यंतरीच्या कडक उन्हाने फुटलेली कापसाची बोंडे पावसात भिजल्याने कपाशीची विक्री करताना शेतकऱ्यांना भाव पाडून दिला जाण्याचा धोका आहे. दरम्यान, पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य एका घटनेत एकजण बेपत्ता आहे.जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. सोयाबीनच्या पिकाला सप्टेंबरमधील पावसाने झोडपून काढले. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र, दसऱ्याच्या सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. एकीकडे कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस घरात कसा आणावा, याची चिंता असतानाच पावसाने हा लाखमोलाचा कापूस भिजविला. आता दोन दिवस उघाड पडल्याशिवाय हा कापूस वेचता येणेही शक्य नाही. शिवाय कपाशी वेचून विक्रीसाठी नेल्यावर आर्द्रतेच्या बहाण्यावरून व्यापारी भाव पाडण्याची भीती निर्माण झाली आहे.  शुक्रवारी  रात्री पांढरकवडा, घाटंजी, मारेगाव, झरी जामणी, वणी तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. तर शनिवारी  उमरखेड, आर्णी तालुक्यांतही  पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात शनिवारी सकाळी ११ वाजता संपलेल्या २४ तासांत १३.८ मिलिमीटर पाऊस बरसला. तर शनिवारी दिवसभरही यवतमाळ शहरासह, घाटंजी, महागाव, पांढरकवडा, नेर, आर्णी, वणी, पुसद आदी तालुक्यांमध्ये पाऊस कोसळत होता. 

जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू, एक जण बेपत्ता

पांढरकवडा/घोन्सा/रुंझा : एकीकडे सण-उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच पावसादरम्यान नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. यातील एक घटना वणी तालुक्यातील घोन्सा येथे तर दुसरी घटना पांढरकवडानजीक रुंझा येथे, तिसरी घटना साखरा येथे घडली. राजू श्रीहरी बोरकुटे रा.घोन्सा आणि रफीक हारून सैयद (३०) रा.रूंझा अशी मृतांची नावे आहेत. राजू बोरकुटे शनिवारी दुपारी घट विसर्जनासाठी विदर्भा नदीवर गेला होता. राजूचा पाय घसरून नागरिकांच्या डोळ्यादेखत तो पुरात वाहात गेला. पोलीस पाटील सचिन उपरे, तलाठी गणेश सहाने, मंडळ अधिकारी ए.बी. मडावी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार आदी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र शनिवारी रात्रीपर्यंत शोध लागला नव्हता. यवतमाळ येथून बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले. रफीक हारून सैयद (३०) रा.रूंझा हा गुराखी आहे. शनिवारी नदी पार करण्यासाठी त्याची जनावरे पाण्यात उतरली. त्यासोबतच रफीकही पाण्यातून निघाला. मध्ये भोवरा तयार झाल्याने तो बुडाला. त्याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ आहे. पांढरकवडा तालुक्यातील साखरा येथे देवी विसर्जनासाठी गेलेला श्रमिक निर्दोष तुराणकार रा. धारणा हा युवक नाल्याच्या डोहात बुडून दगावला. 

 

टॅग्स :Rainपाऊस