शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निरक्षर लोकप्रतिनिधींमुळे विकासावर परिणाम

By admin | Updated: September 8, 2014 01:47 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. अशा स्थितीत पंचायतराज व्यवस्था मजबूत करण्यासाठी गावपातळीवरून योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

रूपेश उत्तरवार यवतमाळ माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. अशा स्थितीत पंचायतराज व्यवस्था मजबूत करण्यासाठी गावपातळीवरून योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. गावाच्या विकासासाठी हा निर्णय योग्य आहे. परंतु अनेक गावात लोकप्रतिनिधी निरक्षर असल्याने या योजनांची अंमलबजावणी करणे कठीण जाते. त्याचा परिणाम गावाच्या विकासावर होत असल्याचे दिसत आहे.ग्रामपंचायतीला गावाच्या विकासात महत्वपूर्ण स्थान असते. सरपंच, सचिव आणि गावकरी मिळून गावात विकासाची गंगा आणू शकतात, मात्र अलिकडे निरक्षर लोकप्रतिनिधींचा फायदा घेण्याचा प्रकार वाढत आहे. महिला पदाधिकाऱ्यांच्या पदाचा वापर तर चक्क त्यांचे पतीराज करीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील ५० टक्के ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिला आहे. त्यातील अनेक महिला निरक्षर आहे. तर काही गावातील पुरुष सरपंचही निरक्षर आहे. निरक्षर असल्यामुळे त्यांना प्रत्येक बाबीसाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार पुढे येत आहे. सध्या जिल्ह्यात ३०० महिला सरपंंच आहे. त्यातील काही महिला निरक्षर आहेत. या संधीचा फायदा गावातील राजकीय गटातील पदाधिकारी घेताना दिसतात. अनेक ठिकाणी महिला सरपंचाचे काम पतीराज घेतात. महत्वाच्या बैठकीलाही पतीराज उपस्थित राहतात. सरपंच केवळ शिकविलेली सही तेवढी मारतात. सही करता येते मात्र वाचताच येत नाही, अशाही महिला सरपंच जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात निरक्षर लोकप्रतिनिधींचा फायदा घेण्याची घटना नुकतीच उघडकीस आली. महिला सरपंचाकडून ग्रामसभा ठरावावर सचिवाने सही घेतली. ही सही ठरावावर नव्हे तर चक्क राजीनामा पत्रावर असल्याचे पुढे आले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सरपंचावर अविश्वास दाखल होणाऱ्या प्रस्तावात ७५ टक्के प्रस्ताव महिला सरपंचावरील आहे. अप्रत्यक्ष गावाच्या विकासाला खीळ बसते. परंतु काही सरपंच निरक्षर असले तरी आपल्या अनुभवाने मात्र ते गावाचा विकास साधत आहे.