शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

निरक्षर लोकप्रतिनिधींमुळे विकासावर परिणाम

By admin | Updated: September 8, 2014 01:47 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. अशा स्थितीत पंचायतराज व्यवस्था मजबूत करण्यासाठी गावपातळीवरून योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

रूपेश उत्तरवार यवतमाळ माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. अशा स्थितीत पंचायतराज व्यवस्था मजबूत करण्यासाठी गावपातळीवरून योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. गावाच्या विकासासाठी हा निर्णय योग्य आहे. परंतु अनेक गावात लोकप्रतिनिधी निरक्षर असल्याने या योजनांची अंमलबजावणी करणे कठीण जाते. त्याचा परिणाम गावाच्या विकासावर होत असल्याचे दिसत आहे.ग्रामपंचायतीला गावाच्या विकासात महत्वपूर्ण स्थान असते. सरपंच, सचिव आणि गावकरी मिळून गावात विकासाची गंगा आणू शकतात, मात्र अलिकडे निरक्षर लोकप्रतिनिधींचा फायदा घेण्याचा प्रकार वाढत आहे. महिला पदाधिकाऱ्यांच्या पदाचा वापर तर चक्क त्यांचे पतीराज करीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील ५० टक्के ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिला आहे. त्यातील अनेक महिला निरक्षर आहे. तर काही गावातील पुरुष सरपंचही निरक्षर आहे. निरक्षर असल्यामुळे त्यांना प्रत्येक बाबीसाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार पुढे येत आहे. सध्या जिल्ह्यात ३०० महिला सरपंंच आहे. त्यातील काही महिला निरक्षर आहेत. या संधीचा फायदा गावातील राजकीय गटातील पदाधिकारी घेताना दिसतात. अनेक ठिकाणी महिला सरपंचाचे काम पतीराज घेतात. महत्वाच्या बैठकीलाही पतीराज उपस्थित राहतात. सरपंच केवळ शिकविलेली सही तेवढी मारतात. सही करता येते मात्र वाचताच येत नाही, अशाही महिला सरपंच जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात निरक्षर लोकप्रतिनिधींचा फायदा घेण्याची घटना नुकतीच उघडकीस आली. महिला सरपंचाकडून ग्रामसभा ठरावावर सचिवाने सही घेतली. ही सही ठरावावर नव्हे तर चक्क राजीनामा पत्रावर असल्याचे पुढे आले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सरपंचावर अविश्वास दाखल होणाऱ्या प्रस्तावात ७५ टक्के प्रस्ताव महिला सरपंचावरील आहे. अप्रत्यक्ष गावाच्या विकासाला खीळ बसते. परंतु काही सरपंच निरक्षर असले तरी आपल्या अनुभवाने मात्र ते गावाचा विकास साधत आहे.