शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

३१ हजार शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठण वांद्यात

By admin | Updated: August 12, 2015 03:09 IST

आवश्यक ११३ कोटी रुपयांचा संयुक्त निधी खेचून आणण्यात जिल्ह्यातील मंत्री, सत्ताधारी आमदार अपयशी ठरल्याने

राजकीय अपयश : हवे १७ कोटी, मिळाले १७ लाख यवतमाळ : आवश्यक ११३ कोटी रुपयांचा संयुक्त निधी खेचून आणण्यात जिल्ह्यातील मंत्री, सत्ताधारी आमदार अपयशी ठरल्याने तब्बल ३१ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठणाचा पेच निर्माण झाला आहे. पुनर्गठणासाठी कोटीत हवी असलेली रक्कम प्रत्यक्ष अवघी लाखात मिळाल्याने हे पुनर्गठण वांद्यात सापडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी न झालेली कर्ज वसुली ही अडचण ठरली आहे. गेल्या वर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११३ कोटी रुपयांच्या कर्जाची वसुलीच होऊ शकली नाही. असे असताना ११३ कोटी रुपये कर्ज न भरणाऱ्या ३१ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यावर ११३ कोटींचे काय असा प्रश्न बँकेने उपस्थित केला. नियमानुसार या ११३ कोटीतील ६५ कोटी रुपये नाबार्डकडून, १३ कोटी राज्य सहकारी बँकेकडून तर १७ कोटी शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. ही संपूर्ण रक्कम मिळाली तरच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले १७ कोटी रुपये त्यात जोडून संपूर्ण ११३ कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण करू शकणार आहे. मात्र अद्याप शासन, नाबार्ड व राज्य सहकारी बँकेने पूर्ण रकमेचा वाटा उचललेला नाही. वास्तविक शासन, नाबार्ड व राज्य बँकेकडून त्यांच्या वाट्याची कर्जाची रक्कम खेचून आणून जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी शासनातील मंत्री, सत्ताधारी भाजपा आमदारांची होती. मात्र ही सर्व राजकीय नेते मंडळी त्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. राज्यातील सहा जिल्हा बँकांच्या कर्ज पुनर्गठणाची कोंडी फोडण्यासाठी शासनाने या बँकांना ७६ कोटी रुपये वळते केले. मात्र यवतमाळ जिल्हा बँकेच्या वाट्याला यातून केवळ १७ लाख रुपये आले आहे. प्रत्यक्षात त्यातून १७ कोटी रुपये जिल्हा बँकेला हवे होते. यवतमाळला १७ लाख देऊन उर्वरित बहुतांश निधी अन्य जिल्हा बँकांनी पळविला. जिल्ह्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजपा नेत्यांच्या नाकावर टिच्चून हा निधी पळविला गेला, हे विशेष. ३१ हजार शेतकऱ्यांच्या वांद्यात सापडलेल्या कर्ज पुनर्गठणासाठी न मिळालेला १७ कोटींचा निधी हेच प्रमुख कारण ठरले आहे. हा निधी आणण्यात सत्ताधारी नेते मंडळी अपयशी ठरल्याने या ३१ हजार शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाचे खापरही सहकार क्षेत्रातून या नेत्यांवरच फोडले जात आहे. नेते पुरेसा निधी आणू न शकल्याने कर्जाचे पुनर्गठण होऊ शकले नाही, असे सहकारातून सांगितले जात आहे. (शहर वार्ताहर)