शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

३१ हजार शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठण वांद्यात

By admin | Updated: August 12, 2015 03:09 IST

आवश्यक ११३ कोटी रुपयांचा संयुक्त निधी खेचून आणण्यात जिल्ह्यातील मंत्री, सत्ताधारी आमदार अपयशी ठरल्याने

राजकीय अपयश : हवे १७ कोटी, मिळाले १७ लाख यवतमाळ : आवश्यक ११३ कोटी रुपयांचा संयुक्त निधी खेचून आणण्यात जिल्ह्यातील मंत्री, सत्ताधारी आमदार अपयशी ठरल्याने तब्बल ३१ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठणाचा पेच निर्माण झाला आहे. पुनर्गठणासाठी कोटीत हवी असलेली रक्कम प्रत्यक्ष अवघी लाखात मिळाल्याने हे पुनर्गठण वांद्यात सापडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी न झालेली कर्ज वसुली ही अडचण ठरली आहे. गेल्या वर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११३ कोटी रुपयांच्या कर्जाची वसुलीच होऊ शकली नाही. असे असताना ११३ कोटी रुपये कर्ज न भरणाऱ्या ३१ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यावर ११३ कोटींचे काय असा प्रश्न बँकेने उपस्थित केला. नियमानुसार या ११३ कोटीतील ६५ कोटी रुपये नाबार्डकडून, १३ कोटी राज्य सहकारी बँकेकडून तर १७ कोटी शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. ही संपूर्ण रक्कम मिळाली तरच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले १७ कोटी रुपये त्यात जोडून संपूर्ण ११३ कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण करू शकणार आहे. मात्र अद्याप शासन, नाबार्ड व राज्य सहकारी बँकेने पूर्ण रकमेचा वाटा उचललेला नाही. वास्तविक शासन, नाबार्ड व राज्य बँकेकडून त्यांच्या वाट्याची कर्जाची रक्कम खेचून आणून जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी शासनातील मंत्री, सत्ताधारी भाजपा आमदारांची होती. मात्र ही सर्व राजकीय नेते मंडळी त्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. राज्यातील सहा जिल्हा बँकांच्या कर्ज पुनर्गठणाची कोंडी फोडण्यासाठी शासनाने या बँकांना ७६ कोटी रुपये वळते केले. मात्र यवतमाळ जिल्हा बँकेच्या वाट्याला यातून केवळ १७ लाख रुपये आले आहे. प्रत्यक्षात त्यातून १७ कोटी रुपये जिल्हा बँकेला हवे होते. यवतमाळला १७ लाख देऊन उर्वरित बहुतांश निधी अन्य जिल्हा बँकांनी पळविला. जिल्ह्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजपा नेत्यांच्या नाकावर टिच्चून हा निधी पळविला गेला, हे विशेष. ३१ हजार शेतकऱ्यांच्या वांद्यात सापडलेल्या कर्ज पुनर्गठणासाठी न मिळालेला १७ कोटींचा निधी हेच प्रमुख कारण ठरले आहे. हा निधी आणण्यात सत्ताधारी नेते मंडळी अपयशी ठरल्याने या ३१ हजार शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाचे खापरही सहकार क्षेत्रातून या नेत्यांवरच फोडले जात आहे. नेते पुरेसा निधी आणू न शकल्याने कर्जाचे पुनर्गठण होऊ शकले नाही, असे सहकारातून सांगितले जात आहे. (शहर वार्ताहर)