शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पीक कर्जाचे पुनर्गठन वांद्यात

By admin | Updated: June 11, 2015 02:18 IST

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने कर्जाच्या पुनर्गठनाचा अध्यादेश काढला आहे.

तब्बल दोन लाख शेतकरी : केवळ नव्या कर्जदारांचेच पुनर्गठनयवतमाळ : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने कर्जाच्या पुनर्गठनाचा अध्यादेश काढला आहे. यात जुन्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा कुठलाही उल्लेख नाही. ज्या शेतकऱ्यांनी २०१४ मध्ये कर्जाची उचल केली, मात्र मार्चपर्यंत परफेड केली नाही अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे रूपांतरण करण्याच्या सूचना आहे. नियमित शेतकऱ्यांच्या तुलनेत थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. असे असले तरी, अध्यादेशामुळे जुन्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज मिळणारच नाही. परिणामी शेतकऱ्यांची शेती पडिक पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यात चार लाख ५० हजार शेतकरी सभासद आहेत. आठ लाख ४० हजार हेक्टरवर हे शेतकरी दरवर्षी खरिपाचे पीक घेतात. सलग तीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे यामधील दोन लाख शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळविण्यासाठी सातबारा कोरा करणे गरजेचे आहे. त्यांनतरच या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणार आहे. प्रत्यक्षात राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे भाष्य करण्यात आले होते. प्रत्यक्षात केवळ २०१४-१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची उचल केली. ठराविक कालावधीत कर्जाची परतफेड करता आला नाही. अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा अध्यादेशामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे बँकांनी २०१४-१५ मध्ये कर्ज उचल करणारे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यास प्रारंभ केला आहे. कर्ज पुनर्गठनामध्ये राष्ट्रीयकृत बँका पुढे आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जाचे पुनर्गठन करण्यास तयार आहे. परंतु त्यांच्याकडे कर्जवाटपासाठी लागणारी निधीच उपलब्ध नाही. यामुळे मध्यवर्ती सहकारी बँकेचे पुनर्गठन रखडले आहे. जिल्हा बँकेने ४० हजार ८८८ शेतकऱ्यांच्या कर्जाचे फेररूपांतर करण्याचा प्रस्ताव राज्य बँकेकडे ठेवला आहे. १५५ कोटी ६६ लाख रुपयांचा हा प्रस्ताव आहे. राज्य बँकेने यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. यामुळे कर्जाचे रूपांतरण थांबले आहे. सहकारी बँकेमध्ये कर्जरुपांतरण करताना ६० टक्के निधी नाबार्ड देते. १५ टक्के बँकेचा स्वत:चा हिस्सा असतो. १५ टक्के निधी राज्य शासनाकडून मिळतो, तर १० टक्के निधी राज्य बँक उपलब्ध करून देते. कर्ज रूपांतरणास लागणारा निधीच जिल्हा बँकेकडे सध्या उपलब्ध नाही. यामुळे जिल्हा बँकेला कर्ज वाटपासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट कमी करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा बँकेने बँकर्स कमिटीकडे केली आहे. (शहर वार्ताहर) नवीन सभासदांना आदेशानंतरही कर्ज वाटप नाहीजिल्हा बँकेचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकेकडे सोपविण्यात येणार आहे. यामुळे सभासदांना न मिळणाऱ्या कर्जाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा बँकने ३५ हजार ७९३ शेतकऱ्यांना २१६ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी सहा हजार ९०६ शेतकऱ्यांना ६५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. ग्रामीण बँकेने तीन हजार शेतकऱ्यांना २५ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. पुनर्गठनामुळे येत्या काही दिवसात कर्ज वाटपाचा आकडा वाढण्याची शक्यता बँकांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे व्यक्त केली आहे.