शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठन करा, नवीन सभासदांना कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:06 IST

संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे कर्जाची परतफेड न करता आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, वनटाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे आणि नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मंगळवारी बँकर्स कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्या.

ठळक मुद्देबँकर्स कमिटीला निर्देश : जिल्हा बँकेचे अर्धे सभासद राष्ट्रीयकृत बँकेकडे वळते करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे कर्जाची परतफेड न करता आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, वनटाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे आणि नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मंगळवारी बँकर्स कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्या.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी आणि रखडलेल्या याद्यांचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांच्याखेरीज राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींना उत्तर देताना चांगलीच कसरत करावी लागली.राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जवाटपाचे सर्वाधिक उद्दिष्ट आहे. यानंतरही बँकांच्या बाहेर कर्जवाटपासाठी फ्लेक्स लागले नाही. यामुळे शेतकºयांना अद्यापही कर्जवाटपाची माहिती मिळाली नाही. कर्जवाटपास पात्र शेतकºयांच्या याद्या दडविण्यात आल्या, असा गंभीर आरोप शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी केला.संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. तरी थकीत कर्जाचे पुनर्गठन झाले नाही. तसे पत्र बँकांना का गेले नाही, याचा जाब तिवारी आणि प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी विचारला. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाºया शेतकºयांना कर्ज भरताच नवीन कर्ज तत्काळ देण्यात यावे, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या.कर्ज वितरित करण्यासाठी जिल्हा बँकेला ८०० कोटींची गरज असताना ५०० कोटी रूपये वळते झाले. १०० कोटीची आणखी रक्कम वळती होईल. यानंतरही २०० कोटीचा तुटवडा भासणार आहे. यामुळे २०० कोटीच्या कर्ज वितरणासाठी सभासदांना राष्ट्रीयकृत बँकेकडे वळते करण्यात यावे, त्यासाठी त्यांना एनओसी देण्यात यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावर्षी ६० हजार नवीन सभासदांना कर्ज वितरित करण्यात यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.