शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कर्ज पुनर्गठन करा, नवीन सभासदांना कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:06 IST

संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे कर्जाची परतफेड न करता आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, वनटाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे आणि नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मंगळवारी बँकर्स कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्या.

ठळक मुद्देबँकर्स कमिटीला निर्देश : जिल्हा बँकेचे अर्धे सभासद राष्ट्रीयकृत बँकेकडे वळते करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे कर्जाची परतफेड न करता आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, वनटाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे आणि नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मंगळवारी बँकर्स कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्या.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी आणि रखडलेल्या याद्यांचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांच्याखेरीज राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींना उत्तर देताना चांगलीच कसरत करावी लागली.राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जवाटपाचे सर्वाधिक उद्दिष्ट आहे. यानंतरही बँकांच्या बाहेर कर्जवाटपासाठी फ्लेक्स लागले नाही. यामुळे शेतकºयांना अद्यापही कर्जवाटपाची माहिती मिळाली नाही. कर्जवाटपास पात्र शेतकºयांच्या याद्या दडविण्यात आल्या, असा गंभीर आरोप शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी केला.संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. तरी थकीत कर्जाचे पुनर्गठन झाले नाही. तसे पत्र बँकांना का गेले नाही, याचा जाब तिवारी आणि प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी विचारला. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाºया शेतकºयांना कर्ज भरताच नवीन कर्ज तत्काळ देण्यात यावे, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या.कर्ज वितरित करण्यासाठी जिल्हा बँकेला ८०० कोटींची गरज असताना ५०० कोटी रूपये वळते झाले. १०० कोटीची आणखी रक्कम वळती होईल. यानंतरही २०० कोटीचा तुटवडा भासणार आहे. यामुळे २०० कोटीच्या कर्ज वितरणासाठी सभासदांना राष्ट्रीयकृत बँकेकडे वळते करण्यात यावे, त्यासाठी त्यांना एनओसी देण्यात यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावर्षी ६० हजार नवीन सभासदांना कर्ज वितरित करण्यात यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.