शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

शांततेची जबाबदारी मंडळांवर

By admin | Updated: August 20, 2014 23:46 IST

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांवरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची संपूर्ण जबाबदारी राहील, असे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक

सार्वजनिक गणेशोत्सव : विघ्नसंतोषींवर पोलिसांचा वॉच - बिपीन बिहारीयवतमाळ : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांवरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची संपूर्ण जबाबदारी राहील, असे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी स्पष्ट केले.आगामी गणेशोत्सव, दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी बिपीन बिहारी बुधवारी यवतमाळात आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची क्राईम मिटींग घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत बिपीन बिहारी म्हणाले, सण-उत्सव हे आपली परंपरा असून त्याद्वारे समाजात एकोपा निर्माण होणे आवश्यक आहे. सण-उत्सवासाठी सार्वजनिक मंडळे पुढाकार घेतात. मात्र अनेकदा ही मंडळे स्थिती बिघडल्यानंतर आपले अंग काढून घेतात आणि पोलिसांवर जबाबदारी लोटतात. परंतु आता हा प्रकार चालणार नाही. गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेशाचे आगमन, मुक्काम आणि प्रस्थानापर्यंत कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याची, शांततेला बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. शांततेची जबाबदारीच त्यांच्यावर सोपविली जाणार असून पोलीस त्यांच्या दिमतीला राहणार आहे. उत्सव काळात समाज विघातक कारवाया करणाऱ्या विघ्नसंतोषी घटकांवर पोलिसांची खास नजर राहणार आहे. त्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क निर्माण करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहे. सार्वजनिक मंडळ, संवेदनशील ठिकाणे, मिरवणुकीचे मार्ग, गणेशोत्सव स्थापनेची जागा, पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत वाद अशा कोणत्याही कारणावरून उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असल्याने या प्रत्येक बाबी तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आले. शांतता समिती, व्यापारी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, मंडळांचे पदाधिकारी यांचा सहभाग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शांततेला आव्हान देऊ पाहणाऱ्या रेकॉर्डवरील आणि नव्या घटकांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईसह आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यासाठी शासनाच्या अन्य विभागाची मदत घेण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि ठाणेदारांना दिलेले असल्याचे बिपीन बिहारी यांनी सांगितले. दरम्यान, क्राईम मिटींगमध्ये बिहारी यांनी काही ठाणेदारांची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात येते. (जिल्हा प्रतिनिधी)