शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

पालकमंत्र्यांची जबाबदारी वाढली

By admin | Updated: June 10, 2017 00:53 IST

जिल्हा परिषदेपाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसुद्धा भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने ताब्यात घेतल्याने

आधी जिल्हा परिषद, आता जिल्हा बँक : ग्रामीण नेटवर्क वाढविण्याचे आव्हान लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेपाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसुद्धा भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने ताब्यात घेतल्याने पालकमंत्र्यांची आता ग्रामीण भागात सर्वदूर पक्षाचे नेटवर्क वाढविण्याची जबाबदारी वाढली आहे. भाजपा हा पक्ष शहरीभागापुरता मर्यादित मानला जातो. ग्रामीणमध्ये या पक्षाचे तेवढे नेटवर्क नाही. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीवरील जनतेच्या संतापाचा भाजपाला फायदा झाल्याचे मानले जाते. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे आहेत. जिल्हा परिषदेलाही भाजपाचे १८ उमेदवार निवडून आले. तरीही ग्रामीण भागात पक्षबांधणीत भाजपाची उणीव कायम आहे. ती उणीव आता भरुन निघण्याची चिन्हे आहेत. शिवसेना सर्वात मोठा पक्ष असताना त्याला विरोधी बाकावर बसवून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या साथीने भाजपाने जिल्हा परिषदेचा गड सर केला. तेथील उपाध्यक्षपद पदरी पाडून घेतले. त्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यातच आता जिल्हा बँकेचे प्रभारी अध्यक्ष पदही भाजपाला मिळाले आहे. त्यामुळे भाजपाची आणि पर्यायाने पालकमंत्री मदन येरावार यांची जबाबदारी आणखी वाढल्याचे दिसून येते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बहुतांश संबंध हा ग्रामीण भागाशी येतो. त्यामुळे बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात भाजपाचे संघटनात्मक जाळे उभे करण्याची आयतीच संधी पालकमंत्र्यांना चालून आली आहे. सोबतीला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद व सभापतीपद आहेच. भाजपा सरकारने राज्यात ३१ आॅक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. या कर्जमाफीची वाट ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतूनच ग्रामीण भागापर्यंत जाणार आहे. या कर्जमाफीच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे, शासनाच्या योजना गावागावात पोहोचविणे, भाजपा सरकारने सर्वात मोठी कर्जमाफी दिली, त्यासाठी किती हजार कोटींचा बोझा उचलला हे प्रत्येक ग्रामीण नागरिकाला पटवून देण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणार आहे. दिग्रस, पुसद या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते मंडळी पक्षात दाखल झाल्याने तशीही भाजपाची ताकद आधीच वाढली आहे. आता ती आणखी वाढणार आहे. जिल्हा परिषद व आता जिल्हा बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता काबीज करण्याची भाजपाची खेळी जिल्ह्याच्या राजकारणात भविष्यात दुरगामी परिणाम करणारी ठरणार आहे. काँग्रेसच्या नेते मंडळींना गटबाजी व एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या नादात आपण भाजपाला मोठे करीत आहो, त्यांना नेटवर्क वाढविण्याची आयतीच संधी उपलब्ध करून देत आहो, याचा कदाचित विसर पडल्याचे दिसते. २०१४ च्या पुनरावृत्तीची भीती भाजपा जिल्हा परिषद व जिल्हा बँकेत मिळालेली ही संधी नक्की मतपेटीतून कॅश करणार. त्यात पालकमंत्री मदन येरावार व त्यांच्या पक्षातील नेत्यांना खरोखरच यश आल्यास २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २०१४ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपवर दाखविला विश्वास मनीष पाटील यांना पायउतार करण्याच्या नादात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही संचालकांनी बँकेच्या तिजोरीची चाबी चक्क भाजपाच्या हातात सोपविली. या संचालकांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांऐवजी भाजपाच्या नेत्यांवर अधिक विश्वास दाखविल्याचे विदारक चित्र या निवडणुकीत पहायला मिळाले.