शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

ठराव सापडला नियमांच्या कचाट्यात

By admin | Updated: July 12, 2014 23:56 IST

येथे तालुक्याच्या ठिकाणी सुरू असलेले परवानाधारक देशी दारू दुकान कायमचे बंद करण्यात यावे, यासाठी येथील ग्रामसभेने मंजूर केलेला ठराव नियमाच्या कचाट्यात सापडला आहे़

महिलांचा भ्रमनिरास : परवानाधारक दारू विक्री दुकानाचे प्रकरणझरीजामणी : येथे तालुक्याच्या ठिकाणी सुरू असलेले परवानाधारक देशी दारू दुकान कायमचे बंद करण्यात यावे, यासाठी येथील ग्रामसभेने मंजूर केलेला ठराव नियमाच्या कचाट्यात सापडला आहे़ त्यामुळे देशी दारूच्या दुकानवरील कारवाई तूर्त टळली असून तशा आशयाचे पत्र नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्याने महिलांचा भ्रमनिरास झाला आहे़येथे परवानाधारक देशी दारूचे एक दुकान आहे़ सदर दुकान हे अगदी मुख्य मार्गावर आहे. या दुकानामुळे येथील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचत असल्याची महिला व ग्रामस्थांची तक्रार आहे़ वारंवार तहसील कार्यालयावर महिलांनी मोर्चा नेऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने येथील ग्रामस्थांनी अखेर नियमांचे शस्त्र उपसले़ त्याचाच एक भाग म्हणून येथील ग्रामपंचायतीतर्फे गेल्या ३ मार्च २०१४ रोजी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत सदर देशी दारूचे दुकान बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता.या ग्रामसभेचा ठराव गणपत मरापे व सारिका चिंतामण किनाके यांच्या तक्रारीनिशी पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. त्यातून देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या ५ जुलैला झरी ग्रामपंचायतीला एक पत्र पाठविल्याने महिलांचा चांगलाच भ्रमनिरास झाला़ जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रानुसार ग्रामसभेने मंजूर केलेला ठराव १८ नियमांना धरून नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.मद्य विक्रीची परवानाधारक दुकाने बंद करण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधरण भाग चार-ब आदेश क्रमांक एम़आय़एऩएस़-११०८/सी़आऱ-७/ईएफसाठी मार्च २००८ नुसार तरतूद करण्यात आली आहे़ त्यानुसार ग्रामसभेत किमान ५० टक्के एकूण मतदार किंवा एकूण महिला मतदारांच्या उपस्थितीने साध्या बहुमताने विधीवत ठराव पारीत केल्यास, त्या ठरावानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ती अनुज्ञप्ती बंद करावी, असा कोणताही ठराव मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ आणि त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमातील तरतुदीनुसार विधीवत झालेला असला पाहिजे़ ग्रामसभेपूर्वी मतदारांनी त्याच गावचे रहिवासी असल्याची ओळख पटविणे आवश्यक असल्याचे नमूद आहे. ही पडताळणी गटविकास अधिकारी, तसेच त्या विभागाचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांनी करणे आवश्यक आहे़ संबंधित दोन्ही अधिकारी व अनुज्ञप्तीधारकाचा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ग्रामसभा होईल, तसेच पुरावा म्हणून ग्रामसभेची चित्रफित तयार करण्यात येईल, नियमात नमूद आहे. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र १२ फेब्रुवारी २००९ नुसार, जर ग्रामीण भागातील २५ टक्केपेक्षा कमी नसलेल्या महिला मतदार किंवा एकूण मतदारांनी लेखी निवेदन देऊन मागणी केल्यास निवेदनाची पडताळणी करून योग्य आढळल्यास प्रसंगी गुप्त मतदान घेण्याची तरतूद कायद्यात आहे़ (तालुका प्रतिनिधी)