शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी पाच लाखांच्या मदतीचा ठराव

By admin | Updated: September 25, 2015 03:07 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंंबाना लगतच्या तेलंगणा, आंध ्रप्रदेशप्रमाणे पाच लाख रुपयांची मदत करावी,

स्थायी समिती सभा : तेलंगणा, आंध्रप्रमाणे मदतीची मागणी यवतमाळ : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंंबाना लगतच्या तेलंगणा, आंध ्रप्रदेशप्रमाणे पाच लाख रुपयांची मदत करावी, असा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना एक लाखांची मदत दिली जाते.स्थायी समिती सभा उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. समितीने कृषी विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचा रबी हंगामापूर्वी शेतकऱ्यांना साहित्य वाटपाचा निर्णय घेतला. इलेक्ट्रीक कृषीपंप, पाईप याचे वितरण करण्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर कृषी समितीचे सभापती त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला. यापुढे जिल्हा परिषद स्वीय निधीच्या खर्चाचे विवरण प्रत्येक बैठकीत ठेवण्याचे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. सदस्य देवानंद पवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला. शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत वाढ केली आहे. आता चार लाख रूपये मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दिले जाते. आता ही रक्कम पाच लाख करण्याची मागणी शासनाकडे करावी, असा प्रस्ताव पवार यांनी ठेवला. याला समितीने मंजुरी दिली. शिवाय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना विहिरीचे वाटप केले जाते. याची प्रतीक्षा यादी प्रत्येक ग्रामपंचायतीने ३० सप्टेंबरपर्यंत प्रसिध्द करावी, त्यानंतर २ आॅक्टोबरच्या सभेत मंजुरी दिला जावी, असे निर्देश देण्याचा निर्णय झाला. घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका कंपनीच्या कपाशीला फलधारणाच होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)