शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी पाच लाखांच्या मदतीचा ठराव

By admin | Updated: September 25, 2015 03:07 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंंबाना लगतच्या तेलंगणा, आंध ्रप्रदेशप्रमाणे पाच लाख रुपयांची मदत करावी,

स्थायी समिती सभा : तेलंगणा, आंध्रप्रमाणे मदतीची मागणी यवतमाळ : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंंबाना लगतच्या तेलंगणा, आंध ्रप्रदेशप्रमाणे पाच लाख रुपयांची मदत करावी, असा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना एक लाखांची मदत दिली जाते.स्थायी समिती सभा उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. समितीने कृषी विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचा रबी हंगामापूर्वी शेतकऱ्यांना साहित्य वाटपाचा निर्णय घेतला. इलेक्ट्रीक कृषीपंप, पाईप याचे वितरण करण्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर कृषी समितीचे सभापती त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला. यापुढे जिल्हा परिषद स्वीय निधीच्या खर्चाचे विवरण प्रत्येक बैठकीत ठेवण्याचे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. सदस्य देवानंद पवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला. शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत वाढ केली आहे. आता चार लाख रूपये मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दिले जाते. आता ही रक्कम पाच लाख करण्याची मागणी शासनाकडे करावी, असा प्रस्ताव पवार यांनी ठेवला. याला समितीने मंजुरी दिली. शिवाय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना विहिरीचे वाटप केले जाते. याची प्रतीक्षा यादी प्रत्येक ग्रामपंचायतीने ३० सप्टेंबरपर्यंत प्रसिध्द करावी, त्यानंतर २ आॅक्टोबरच्या सभेत मंजुरी दिला जावी, असे निर्देश देण्याचा निर्णय झाला. घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका कंपनीच्या कपाशीला फलधारणाच होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)