शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

घाटंजीवासीयांचा पाणीदार गावाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:30 IST

तालुक्यात सिनेअभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे पाणलोट विकास व उपचाराची भूमिका, यावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती कार्यालयात हे प्रदर्शन १८ डिसेंबरला घेण्यात आले.

ठळक मुद्देपंचायत समितीत प्रदर्शन : पाणलोट उपाययोजनांची ग्रामस्थांना दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यात सिनेअभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे पाणलोट विकास व उपचाराची भूमिका, यावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती कार्यालयात हे प्रदर्शन १८ डिसेंबरला घेण्यात आले.या प्रदर्शनाला तालुक्यातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. गावाला पाणीदार करण्याचा संकल्प घेऊनच ग्रामस्थ बाहेर पडले. बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, गटविकास अधिकारी माणिक चव्हाण उपस्थित होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून पाणलोट विकासाची भूमिका ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी पाणलोट विकासाचे छोटे-छोटे मॉडेल्स येथे ठेवण्यात आले. श्रमदानासाठी गावाने एकत्र आल्यानंतर जलसंधारणाच्या स्पर्धांमधून बक्षीस कसे मिळविता येते, याचीही माहिती दिली.‘सत्यमेव जयते वॉटर कप ३’मध्ये तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून आपली गावे पाणीदार करावी, यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक ती मदत केली जाईल, असे तहसीलदार हामंद यांनी सांगितले. गटविकास अधिकारी माणिक चव्हाण, तालुका कृषी अधिकारी माळोदे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, संचालन नारायण भोयर यांनी केले. सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, आयसीडीएस ज्योती लुंगटे, फाऊंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, परमेश्वर जोगदंडे, शिवाजी बळी, रवींद्र लोखंडे, स्वप्नील वारेकर, हरी वाघमारे, एफईएस संस्थेचे संतोष पवार, सरपंच, सचिव, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.प्रदर्शनाला जिल्हा परिषद सदस्य सरिता जाधव, पंचायत समिती सभापती कालिंदा आत्राम, उपसभापती नीता जाधव यांनी भेट दिली. प्रदर्शन पाहण्यासाठी समर्थ महाविद्यालय, कन्या शाळा, पाणलोट जलमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.