शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

अध्यक्षांचा राजीनामा पडला लांबणीवर

By admin | Updated: May 5, 2017 02:15 IST

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय ११ मेपर्यंत लांबणीवर पडला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक : पुसदमधून ग्रीन सिग्नल, सर्व संचालकांची एकजूट यवतमाळ : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय ११ मेपर्यंत लांबणीवर पडला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळ सुमारे नऊ महिन्यांपासून कार्यरत आहे. या काळात बँकेतील नोकर भरती, साहित्य खरेदी, कंत्राट, कर्जप्रकरणे, अवाढव्य खर्च, नाममात्र नफा, पगारवाढ-बोनस आदी प्रकार गाजले. त्यातूनच विविध स्तरावर चौकशी समित्या गठित केल्या गेल्या. काही प्रकरणे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. त्यातून आतापर्यंत सुखरूप असलेल्या संचालकांना आता युती सरकारमध्ये मात्र अचानक कारवाईची कारवाईची आणि सर्वांनाच अपात्र ठरविल्यास सहकारातील राजकारण संपुष्टात येण्याची भीती वाटू लागली. या भीतीतूनच सर्व संचालकांनी एकजूट होऊन अध्यक्ष बदलविण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता अध्यक्षांमुळेच सर्व समस्या निर्माण होत आहे, शेतकरीही अध्यक्षांवरच नाराज आहेत अशा सबबी पुढे केल्या गेल्या. विशेष असे, गेल्या नऊ-दहा वर्षात बँकेत घेतल्या गेलेल्या बहुतांश निर्णयात ही संचालक मंडळी ‘वाटेकरी’ आहेत. सर्व संचालकांनी आपला निर्णय कळवून अध्यक्षांवर राजीनामा देण्यासाठी दबाव निर्माण केला आहे. अध्यक्षांनी राजीनाम्याचा चेंडू तूर्त आपल्या गॉडफादर नेत्यांच्या दरबारात टोलविला आहे. बुधवारी अध्यक्ष मनीष पाटील यांनी पुसदमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार मनोहरराव नाईक यांची भेट घेतली. अध्यक्षपद पाच वर्षांसाठी असताना दुप्पट कार्यकाळ मिळाल्याचे सांगत नाईक यांनी राजीनामा देण्याबाबत पाटील यांना सिग्नल दिल्याचे त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असलेले संचालक सांगत आहेत. आता मनीष पाटलांना प्रतीक्षा आहे ती विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या निर्णयाची. ते विदेशातून ११ मे रोजी परतणार आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यावरच पाटील राजीनाम्याचा निर्णय घेणार आहे. ( जिल्हा प्रतिनिधी) बँकेच्या नव्या अध्यक्षासाठी जिल्हा परिषद पॅटर्न मनीष पाटलांचे अध्यक्षपदावरून जाणे संचालक मंडळी जवळजवळ निश्चित माणत आहेत. त्यामुळे बँकेचा नवा अध्यक्ष कोण? याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. विविध निर्णयात वाटेकरी असलेल्या संचालकांना सरकारचे सुरक्षा कवच हवे असल्याने आगामी अध्यक्ष भाजपाच्या कोट्यातील होईल, असे मानले जात आहे. बँकेचा दीर्घ अनुभव असलेल्या एका संचालकाने ‘लोकमत’शी बोलताना, राजकारणात काहीही होऊ शकते, नेतेमंडळींच्या पोटात काय आहे, हे सांगता येत नाही, असे स्पष्ट करीत जिल्हा परिषदेतील भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या पॅटर्नचे स्मरण करून दिले.