शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अध्यक्षांचा राजीनामा पडला लांबणीवर

By admin | Updated: May 5, 2017 02:15 IST

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय ११ मेपर्यंत लांबणीवर पडला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक : पुसदमधून ग्रीन सिग्नल, सर्व संचालकांची एकजूट यवतमाळ : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय ११ मेपर्यंत लांबणीवर पडला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळ सुमारे नऊ महिन्यांपासून कार्यरत आहे. या काळात बँकेतील नोकर भरती, साहित्य खरेदी, कंत्राट, कर्जप्रकरणे, अवाढव्य खर्च, नाममात्र नफा, पगारवाढ-बोनस आदी प्रकार गाजले. त्यातूनच विविध स्तरावर चौकशी समित्या गठित केल्या गेल्या. काही प्रकरणे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. त्यातून आतापर्यंत सुखरूप असलेल्या संचालकांना आता युती सरकारमध्ये मात्र अचानक कारवाईची कारवाईची आणि सर्वांनाच अपात्र ठरविल्यास सहकारातील राजकारण संपुष्टात येण्याची भीती वाटू लागली. या भीतीतूनच सर्व संचालकांनी एकजूट होऊन अध्यक्ष बदलविण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता अध्यक्षांमुळेच सर्व समस्या निर्माण होत आहे, शेतकरीही अध्यक्षांवरच नाराज आहेत अशा सबबी पुढे केल्या गेल्या. विशेष असे, गेल्या नऊ-दहा वर्षात बँकेत घेतल्या गेलेल्या बहुतांश निर्णयात ही संचालक मंडळी ‘वाटेकरी’ आहेत. सर्व संचालकांनी आपला निर्णय कळवून अध्यक्षांवर राजीनामा देण्यासाठी दबाव निर्माण केला आहे. अध्यक्षांनी राजीनाम्याचा चेंडू तूर्त आपल्या गॉडफादर नेत्यांच्या दरबारात टोलविला आहे. बुधवारी अध्यक्ष मनीष पाटील यांनी पुसदमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार मनोहरराव नाईक यांची भेट घेतली. अध्यक्षपद पाच वर्षांसाठी असताना दुप्पट कार्यकाळ मिळाल्याचे सांगत नाईक यांनी राजीनामा देण्याबाबत पाटील यांना सिग्नल दिल्याचे त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असलेले संचालक सांगत आहेत. आता मनीष पाटलांना प्रतीक्षा आहे ती विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या निर्णयाची. ते विदेशातून ११ मे रोजी परतणार आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यावरच पाटील राजीनाम्याचा निर्णय घेणार आहे. ( जिल्हा प्रतिनिधी) बँकेच्या नव्या अध्यक्षासाठी जिल्हा परिषद पॅटर्न मनीष पाटलांचे अध्यक्षपदावरून जाणे संचालक मंडळी जवळजवळ निश्चित माणत आहेत. त्यामुळे बँकेचा नवा अध्यक्ष कोण? याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. विविध निर्णयात वाटेकरी असलेल्या संचालकांना सरकारचे सुरक्षा कवच हवे असल्याने आगामी अध्यक्ष भाजपाच्या कोट्यातील होईल, असे मानले जात आहे. बँकेचा दीर्घ अनुभव असलेल्या एका संचालकाने ‘लोकमत’शी बोलताना, राजकारणात काहीही होऊ शकते, नेतेमंडळींच्या पोटात काय आहे, हे सांगता येत नाही, असे स्पष्ट करीत जिल्हा परिषदेतील भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या पॅटर्नचे स्मरण करून दिले.