शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे निवासी संकूल खासगी संस्थेला

By admin | Updated: July 31, 2015 00:14 IST

जिल्हा परिषदेने १९७५ मध्ये ठराव घेऊन कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या सोयीसाठी निवासी संकूल आणि भवनाची निर्मिती केली.

संघटनेचा प्रताप : इमारत भाडे लाटणाऱ्यांच्या चौकशीचा प्रस्ताव यवतमाळ : जिल्हा परिषदेने १९७५ मध्ये ठराव घेऊन कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या सोयीसाठी निवासी संकूल आणि भवनाची निर्मिती केली. त्यानंतर १९९७ मध्ये देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कर्मचारी संघटनेकडे सोपविण्यात आली. या संघटनेने येथील मेडिकल चौकातील ही इमारत सरळ एका खासगी संस्थेला भाड्याने दिली. या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. जिल्हा परिषदेने उदात्त हेतूने रेल्वेकडून नऊ हजार ६०० चौरस फुुटाचा ‘मेडिकल’ चौकातील भूखंड मिळविला होता. त्यावर ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना राहता यावे म्हणून प्रशस्त इमारत आणि सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे. याची देखभाल जबाबदारी जिल्हा परिषद कर्मचारी संघटना रजीस्टर नंबर ४३४० यांच्याकडे सोपविण्यात आली. या संघटनेने परस्परच ही इमारत एका खासगी संस्थेला भाड्याने दिली. या संस्थेने येथे शाळा थाटली आहे. १९९७ पासून भाड्यापोटी मिळालेल्या रकमेचा एकही रुपया जिल्हा परिषदेला मिळालेला नाही. ही जागा कोणत्या अधिकारात संघटनेने भाड्याने दिली, असा सरसकट अधिकार आहे काय, असे अनेक प्रश्न गुरुवारी झालेल्या स्थायी समितीत देवानंद पवार यांनी उपस्थित केले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. यानंतर सभेत चौदाव्या वित्त आयोगाचा मुद्दा चर्चेला आला. वित्त आयोगातील पहिल्या टप्प्यात २९ कोटी ४५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी थेट ग्रामपंचायतींना जाणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेला निधी वितरणाचे १०० टक्के अधिकार होते, त्यानंतर ५० टक्क्यावर आले. १३ वित्त आयोगाच्या निधी वितरणात ३०, २० आणि १० टक्के निधी जिल्हा परिषद सदस्यांना दिला. आता मात्र यातील एकही रुपयाही मिळणार नाही. चौदाव्या वित्त आयोगाचा संपूर्ण निधी ग्रामपंचायत खात्यात जमा होत आहे. या विरोधात जिल्हा परिषद सदस्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय सभेत घेतला. याबाबत लवकरच शासनाच्या सर्व आदेशासह न्यायालयात जाणार असल्याचे देवानंद पवार यांनी सांगितले. यानंतर सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी) जिल्हा परिषदेकडून कधीही चौकशी नाही यवतमाळ जिल्हा परिषदेने इमारत आणि सांस्कृतिक भवनाची काय स्थिती आहे, याची तपासणी करण्याचे सौजन्य कधीही दाखविले नाही. सदर भवनाची देखभाल कशा पद्धतीने होत आहे, या इमारतीत जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या किती मुलांच्या शिक्षणाची सोय झाली, ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना खरंच या इमारतीचा उपयोग होतो आहे काय याची कधीही चौकशी झाली नाही.