शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जलाशये अद्याप तहानलेलीच

By admin | Updated: August 26, 2014 23:45 IST

हवामान खात्याने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आज जिल्हयाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

यवतमाळ : हवामान खात्याने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आज जिल्हयाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही स्थिती दमदार पाऊस न आल्यास यापुढे आणखी भयावह होण्याची स्थिती आहे. पावसाचे तीन मुख्य महिने संपत आले. मात्र नदी पात्रात पूर आलाच नाही. परिणामी जलाशयात तोकडा पाणीसाठा शिल्लक राहला आहे. यामध्ये फारशी वाढ झाली नाही. परिणामी जिल्ह्याला भीषण टंचाईचा सामना करावा लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. अल निनोच्या प्रभावाने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. या इशाऱ्याला गांभीर्याने घेतले गेले नाही. आता पावसाचे तीन मुख्य महिने संपल्यानंतरही पाऊस बरसला नाही. यामुळे प्रशासन पाणीटंचाई निवारण्याच्या कामाला लागले आहे. युध्दपातळीवर पाणी टंचाई निवारण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी पाणी बचतीची तसदी घेतली असती तर पाणी टंचाई निवारण्यास खऱ्या अर्थाने सहकार्य लाभले असते.जिल्ह्यातील सर्व मुख्य प्रकल्पात १२ ते ४० टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी यावेळी सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो अवस्थेत होते. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प गतवर्षी आॅगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाला होता. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पात ३८ टक्के जलसाठा होता. गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे हा जलसाठा ४८ टक्केच्या घरात पोहचला आहे. चापडोह प्रकल्पाची स्थिती जैसे थे अशीच आहे. या प्रकल्पात ४५.७७ टक्के पाणी शिल्लक राहले आहे. पुस प्रकल्पात २०.८१ टक्के जलसाठा आहे. तर अरूणावती प्रकल्पात कुठलीही वाढ नोंदविली गेली नाही. हा प्रकल्प १५.३८ टक्क्यावर स्थिर आहे. बेंबळा प्रकल्पाच्या जलसाठ्यात ५ टक्के वाढ झाली आहे. या ठिकाणी ३९.९२ टक्के पाणी शिल्लक आहे. सायखेड प्रकल्पाचा जलसाठा ४३ टक्क्यांवर पोहचला आहे. गोकी प्रकल्प क्षेत्रात १० टक्के वाढ झाली आहे. यामध्ये ४५ टक्के जलसाठा कायम आहे. वाघाडी प्रकल्पात ३४ टक्के पाणी आहे. तर सर्वाधिक ७५ टक्के जलसाठा बोरगाव प्रकल्पात आहे. लोअर पुस प्रकल्पाच्या पात्रात ४९ टक्के जलसाठा आहे. अडाण प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणी शिल्लक आहे. नवरगाव प्रकल्पात ३९.५० टक्के पाणी शिल्लक आहे. (शहर वार्ताहर)