शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

जलाशये अद्याप तहानलेलीच

By admin | Updated: August 26, 2014 23:45 IST

हवामान खात्याने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आज जिल्हयाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

यवतमाळ : हवामान खात्याने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आज जिल्हयाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही स्थिती दमदार पाऊस न आल्यास यापुढे आणखी भयावह होण्याची स्थिती आहे. पावसाचे तीन मुख्य महिने संपत आले. मात्र नदी पात्रात पूर आलाच नाही. परिणामी जलाशयात तोकडा पाणीसाठा शिल्लक राहला आहे. यामध्ये फारशी वाढ झाली नाही. परिणामी जिल्ह्याला भीषण टंचाईचा सामना करावा लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. अल निनोच्या प्रभावाने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. या इशाऱ्याला गांभीर्याने घेतले गेले नाही. आता पावसाचे तीन मुख्य महिने संपल्यानंतरही पाऊस बरसला नाही. यामुळे प्रशासन पाणीटंचाई निवारण्याच्या कामाला लागले आहे. युध्दपातळीवर पाणी टंचाई निवारण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी पाणी बचतीची तसदी घेतली असती तर पाणी टंचाई निवारण्यास खऱ्या अर्थाने सहकार्य लाभले असते.जिल्ह्यातील सर्व मुख्य प्रकल्पात १२ ते ४० टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी यावेळी सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो अवस्थेत होते. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प गतवर्षी आॅगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाला होता. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पात ३८ टक्के जलसाठा होता. गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे हा जलसाठा ४८ टक्केच्या घरात पोहचला आहे. चापडोह प्रकल्पाची स्थिती जैसे थे अशीच आहे. या प्रकल्पात ४५.७७ टक्के पाणी शिल्लक राहले आहे. पुस प्रकल्पात २०.८१ टक्के जलसाठा आहे. तर अरूणावती प्रकल्पात कुठलीही वाढ नोंदविली गेली नाही. हा प्रकल्प १५.३८ टक्क्यावर स्थिर आहे. बेंबळा प्रकल्पाच्या जलसाठ्यात ५ टक्के वाढ झाली आहे. या ठिकाणी ३९.९२ टक्के पाणी शिल्लक आहे. सायखेड प्रकल्पाचा जलसाठा ४३ टक्क्यांवर पोहचला आहे. गोकी प्रकल्प क्षेत्रात १० टक्के वाढ झाली आहे. यामध्ये ४५ टक्के जलसाठा कायम आहे. वाघाडी प्रकल्पात ३४ टक्के पाणी आहे. तर सर्वाधिक ७५ टक्के जलसाठा बोरगाव प्रकल्पात आहे. लोअर पुस प्रकल्पाच्या पात्रात ४९ टक्के जलसाठा आहे. अडाण प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणी शिल्लक आहे. नवरगाव प्रकल्पात ३९.५० टक्के पाणी शिल्लक आहे. (शहर वार्ताहर)