शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१२०० हेक्टरवरील आरक्षित जमीन शेरा शिथिल

By admin | Updated: January 18, 2015 22:48 IST

पाटबंधारे प्रकल्पांतर्गत आरक्षित करण्यात आलेल्या राखीव शेतजमिनीचे निर्बंध राज्य शासनाने उठविले आहे. त्यामुळे १२०० हेक्टरमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यवतमाळ : पाटबंधारे प्रकल्पांतर्गत आरक्षित करण्यात आलेल्या राखीव शेतजमिनीचे निर्बंध राज्य शासनाने उठविले आहे. त्यामुळे १२०० हेक्टरमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार असून खाते फोड करण्यासोबत विविध प्रश्नावर मात करता येणार आहे.पाटबंधारे प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १२०० हेक्टर जमीन आरक्षित करण्यात आली होती. १९७६ पासून या शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करताना बंधने येत होती. भविष्यात प्रकल्प क्षेत्रात वाढ झाल्यास या आरक्षित शेतजमिनीचा आधार घेतला जाणार होता. अशा ठिकाणी पुनर्वसनाच्या दृष्टीने शेतजमिनी आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील जमिनीवर खरेदी-विक्री व्यवहार पूर्णत: बंद होती. शेत जमिनीवर खाते फोड करण्यास मज्जावही करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर सिंचनासाठी अर्जही दाखल करता येत नव्हते. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या एका आदेशाने निर्बंध उठविण्यात आले आहे. या आदेशानुसार प्रकल्पांतर्गत बाधित व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी भविष्यात भूसंपादनाची आवश्यकता भासल्यास प्रकल्प यंत्रणेने योग्य मोबदला देण्याच्या सूचना दिल्या आहे. जिल्ह्यातील १२ हजार हेक्टर शेतजमीन प्रकल्पांतर्गत आरक्षित करण्यात आली होती. आता आरक्षित जमिनीचा शेरा शासन आदेशाने शिथिल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र यामध्ये काही अटी सूचविण्यात आल्या आहे. आतापर्यंत संपादनाची कार्यवाही पूर्ण करून शासनाने संपादित केलेल्या व शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे प्रकल्पग्रस्तांना प्रचलित पद्धतीनेनुसार वाटप करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सुरू ठेवावी, असेही या शासन आदेशात म्हटले आहे. एकंदरित या आदेशाने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (शहर वार्ताहर)