शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वादळग्रस्तांच्या मदतीसाठी एसडीओंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:15 IST

तालुक्यात गत आठवड्यात प्रचंड वादळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली असून वीज खांबही उन्मळून पडली. यासोबतच आंबा, ऊस, केळी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी एका निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमदतीची मागणी : उमरखेड तालुक्यात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात गत आठवड्यात प्रचंड वादळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली असून वीज खांबही उन्मळून पडली. यासोबतच आंबा, ऊस, केळी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी एका निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.उमरखेड तालुक्यात २७ मे रोजी प्रचंड वादळ आले. या वादळात करोडी, आमला, रांगोळी या गावात प्रचंड नुकसान झाले. आता आठवडा झाला तरी महसूल प्रशासनाने अद्यापपर्यंत सर्वेक्षणाला प्रारंभ केला नाही. काही ठिकाणी कोसळलेले वीज खांब जैसे थे आहे. अनेक शेतकºयांची टीनपत्रे उडाल्याने ते उघड्यावर आले आहे. या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठाही खंडित असल्याने अनेक गावे अंधारात आहेत. वीज वितरणसह शासनाने शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुकेश फाटे, नंदकुमार जयस्वाल, सुनील देवसरकर, श्रीराम शिंदे, मारोती कदम, पंडित शिंदे, बाबूराव शिंदे, माधव शिंदे, संभाजी शिंदे, संतोष शिंदे, दिगंबर शिंदे, ज्ञानेश्वर येळूतवार, शिवनाथ शिंदे, गजानन जाधव, पांडुरंग शिंदे, श्रीराम गणपत, लक्ष्मीबाई शिंदे, सुरेश शिंदे यांनी केली आहे. या वादळाने होत्याचे नव्हते झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. खरिपाच्या तोंडावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल दिसत आहे.