शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

बदली झालेले कर्मचारी ठाण मांडून

By admin | Updated: August 3, 2016 01:29 IST

जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात बदली होऊनही काही मातब्बर कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत.

जिल्हा परिषद : कार्यमुक्तीस टाळाटाळ यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात बदली होऊनही काही मातब्बर कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. त्यांना कार्यमुक्त करण्यास चालढकल केली जात असल्याने बदली होऊन गेलेले कर्मचारी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत दरवर्षी उन्हाळ्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. सेवाज्येष्ठता, एकच ठिकाण, एकच पंचायत समिती, एकच विभाग आदी निकषानुसार बदल्यांची यादी प्रसिद्ध होते. त्याप्रमाणे याहीवर्षी उन्हाळ्यात अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांवर समुपदेशनाचा भर होता. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या पसंतीची पंचायत समिती निवडून आपली वर्णी लावून घेतली. मात्र काही मातब्बर कर्मचाऱ्यांच्या अडचणीच्या ठिकाणी बदल्या झाल्याने त्यांनी बदलीच्या जागी रूजू होण्यास टाळाटाळ केली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम, पंचायत, सामान्य प्रशासन आदी विभागात सध्या बदली झालेले काही मातब्बर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना कार्यमुक्तच करण्यात आले नाही. परिणामी बदली होऊनही अनेक कर्मचारी जुन्याच ठिकाणी ठिय्या मांडून बसले आहेत. यामुळे बदलून गेलेले कर्मचारी संतप्त झाले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एकच न्याय का नाही, असा त्यांचा सवाल आहे. अनेक कर्मचारी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर रूजू झाले. मातब्बर कर्मचारी मात्र कुणाच्या तरी आशीर्वादामुळे अद्याप जुन्याच ठिकाणी कार्यरत आहे. याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी) पंचायतमध्ये प्रतिनियुक्ती पंचायत विभागामधील काही कर्मचाऱ्यांची बदली झाली होती. त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. ते बदलीच्या ठिकाणी रूजू झाले नाही. अद्यापही ते तेथेच कार्यरत आहे. विशेष म्हणजे त्यातील काहींनी लगेच आपली जुन्याच पदावर प्रतिनियुक्ती करवून घेतली. अधिकाऱ्यांनीही त्यांना लगेच प्रतिनियुक्ती दिली. त्यांना प्रतिनियुक्तीच द्यायची होती, तर आधी बदलीच का करण्यात आली, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.