शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सौर ऊर्जेसाठी शेती भाड्याने द्या अन् मिळवा 30 हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 22:55 IST

आता शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. तसेच सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावापासून कायमचा सुटकारा मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनी संपूर्ण भार उचलणार आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना करार पद्धतीने शेतजमीन द्यावी लागणार आहे. त्याचा मोबदलाही मिळणार आहे.

ज्ञानेश्वर ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता शेतकऱ्यांची पडीक जमीन वाया जाणार नाही. कारण तुम्ही सौर ऊर्जेसाठी शेती भाड्याने देऊन वार्षिक ३० हजार रुपये कमवू शकता. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असा शासनाचा विचार आहे. या योजनेअंतर्गत सौर कृषिपंप बसविला जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. तसेच सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावापासून कायमचा सुटकारा मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनी संपूर्ण भार उचलणार आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना करार पद्धतीने शेतजमीन द्यावी लागणार आहे. त्याचा मोबदलाही मिळणार आहे.

काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना? महावितरणच्या उपकेंद्रापासून पाच किलोमीटर अंतरात शेतजमिनीवर सोलर प्लेट उभारून दरदिवशी दोन मेगावॅट निर्मितीचा हा प्रकल्प आहे. ही वीज शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यातून गावोगावी वीज पुरवठा होईल. यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

महागावात अद्याप लाभार्थी नाही- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेसंदर्भात महागाव तालुक्यातील शेतकरी अनभिज्ञ आहे. या तालुक्यातील एकाही शेतकऱ्याने लाभ घेतला नाही. - शेती रस्त्याला लागून असणे आणि उपकेंद्र त्या ठिकाणापासून जवळ असणे गरजेचे आहे. या प्रमुख अटीमुळे अनेकांना सहभाग नोंदविता आला नाही.

किमान तीन एकरापासून ५० एकरापर्यंत- आपली पडीक जमीन सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी तीन एकरापासून ते ५० एकरांपर्यंत भाडेतत्त्वावर देता येईल, अशी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी योजना तयार केलेली आहे. जमीन देणारे खासगी व्यक्ती अथवा संस्थांना वार्षिक भाडे देणार आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना