शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद बांधकाममध्ये निविदेची अनामत नियमबाह्य

By admin | Updated: August 14, 2014 23:57 IST

ग्राम विकास विभागाने ई निविदा कार्यप्रणातील अंतर्गत फेरबदल केला आहे. निविदा शुल्क आणि इसारा रक्कम थेट खात्यात जमा करण्यासाठी आरटीजीएस, नेफ्ट प्रमाणाली स्वीकारली आहे.

यवतमाळ : ग्राम विकास विभागाने ई निविदा कार्यप्रणातील अंतर्गत फेरबदल केला आहे. निविदा शुल्क आणि इसारा रक्कम थेट खात्यात जमा करण्यासाठी आरटीजीएस, नेफ्ट प्रमाणाली स्वीकारली आहे. बांधकाम विभागाने याच पध्दतीने निविदा प्रक्रिया राबवावी असे निर्देशही १५ जुलैच्या शासनान आदेशात दिले आहे. त्यानंतरही जिल्हा परिषद बांधकाम विभाग दोन मध्ये जुन्याच पध्दतीने काम सुरू आहे. उलट बांधकाम विभाग एक मध्ये नविन आरटीजीएस पध्दत सुरू करण्यात आली आहे. यामुळे गोंधळाची स्थिती आहे. एका कार्यालयातील दोन विभागात विसंगती दिसून येत आहे. निविदा शुल्क आणि इसारा रक्कम स्वीकारण्यासाठी थेट बँक खाते उघडण्यात आले. मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या नावाने स्टेट बँकेत उघडण्यात आले आहे. यापूर्वी निविदा शुल्क आणि इसारा रक्कम ही डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून सबंधित कार्यकारी अभियंता स्वीकारत होता. ही पध्दती ३१ जुलै पासून तात्काळ बंद करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शहापूरकर यांनी स्टेट बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडले. बांधकाम विभाग क्रमांक एक मधून राबविण्यात आलेल्या सर्वच निविदेची रक्कत थेट खात्यात जमा करण्यात आली. मात्र बांधकाम विभाग क्रमांक दोनकडून या नियमाला छेद देण्यात आला आहे. आचार संहितेपूर्वी कामे निकाली लावण्यासाठी धडाका सुरू आहे. याकरिताच मोठ्या प्रमाणात निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र हे करत असताना बांधकाम दोन मधील अभियंत्याकडून नियमांचे उल्लघन केले जात आहे. शासनाच्या आदेशाकडेच दुर्लक्ष केल्यामुळे ही प्रक्रिया अडचणी सापडण्याची शक्यता आहे. अनेक कंत्राटदाराना निविदा शुल्क आणि इसार रक्कम ही डीडीच्या माध्यमातूनच मागण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियाच ३१ जुलै नंतरची आहे. कंत्राटदाराचा नाईलाज असल्याने त्यांनी अभियंत्याचे म्हणणे ऐकून डीडी दिले आहेत. मात्र प्रत्यक्ष बिलांना मंजूर घेताना अथवा वित्त विभागाकडून यावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. एका जिल्हा परिषदेत दोन विभागात दोन वेगळ््या पध्दीतने होत असलेले काम पाहून अनेक जण बुचकळ््या पडले आहे. शासनाचा स्पष्ट आदेश असूनही जुन्या पध्दतीने प्रक्रिया करण्याचा अट्टाहास का, केला जात आहे, असा प्रश्न सर्वांकडूनच उपस्थित केला जात आहे. आचार संहितेपूर्वी कामे सुरू करण्यासाठी चोहोकडून दबाव असला तरी निमयांना डावलून काम केल्यास अडचणीच उद्भवण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. बांधकाम विभागाने दोन मधून तब्बल ११ कोटी ५० लाखांच्या कामांची ई - निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. यात रस्ते, पुुल निर्मिती आणि पुल दुुरूस्तीची कामे आहेत. ८९ कामांच्या कंत्राटाची अनामत ही डीडीद्बारेच स्वीकारण्यात आली आहे. अशा स्थितीत मुख्य लेखा वित्त अधिकारी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुधारीत आदेशामध्ये कंत्राटदाराची अनामत रक्कम ही एक महिन्याच्या आत परत करण्याची जबाबदारीसुध्दा कॉफोवरच सोपविण्यात आली आहे. अशा स्थितीत नव्याने निविदा प्रक्रिया बोलावणेही कठीण आहे. त्यामुुळे ही घोडचूक सुधारण्यासाठी काय केले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)