शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

आदिवासींच्या समस्यांवर उपाययोजना व्हाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 21:51 IST

आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींनी आपल्या समाजाच्या समस्यांचा यथोचित अभ्यास करून त्यावर उपाययोजना कराव्या.

ठळक मुद्देमाधव सरकुंडे : आदिवासी मुक्ती दलाच्या संयोजनात व्याख्यान, आश्रमशाळांचे प्रश्न मांडले

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींनी आपल्या समाजाच्या समस्यांचा यथोचित अभ्यास करून त्यावर उपाययोजना कराव्या. उपाययोजना झाल्या तरच आदिवासींची प्रगती शक्य आहे, असे मत प्रा.डॉ. माधव सरकुंडे यांनी मांडले.आदिवासी मुक्ती दलाच्या संयोजनात रविवारी ‘भारतीय संविधान आणि लोकप्रतिनिधींचे दायित्व’ या विषयावर व्याख्यान झाले. यात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सरकुंडे बोलत होते. माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके अध्यक्षस्थानी होते.प्रा. सरकुंडे म्हणाले, आदिवासींच्या प्रगतीचा जाहीरनामाच भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. त्यांना स्वतंत्र स्वायत्तता देऊन आदिवासींच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त करून ठेवला. आदिवासी समाजातील विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी आश्रमशाळा काढल्या. मात्र या शाळांची अवस्था दयनीय आहे. कुठलेही शैक्षणिक वातावरण त्याठिकाणी नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.या देशाच्या प्रगतीत जात हा सर्वात मोठा अडसर आहे. जोपर्यंत जात हद्दपार होणार नाही तोपर्यंत भारत हे राष्ट्र म्हणून उभे राहू शकत नाही. म्हणून येणाºया काळात जाती निर्मूलनाचा कार्यक्रम आपणा सर्वांना हाती घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. प्रत्येक आदिवासींच्या घरात भारतीय घटनेची प्रत असणे आवश्यक आहे. आपण स्वत: दहा हजार रुपयांच्या प्रती उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले.प्रास्ताविक प्रमोद घोडाम यांनी केले. यावेळी भानुदास राजने, एम.के. कोडापे, बाळकृष्ण गेडाम, बाबाराव मडावी, संतोष पारधी, हनुमंत कुडमेथे, मनीषा तिरणकर, किरण कुंभरे, विनोद डवले, रेखा कन्नाके उपस्थित होते.आरक्षणावर व्याख्यानविमुक्त घुमंतू, बारा बलुतेदार, ओबीसी अतिपिछडा सेवा संघाच्या संयोजनात ‘आरक्षण, फुले-शाहू-आंबेडकर आणि एल.आर. नाईक पॅटर्न, केंद्रीय २७ टक्केचे विभाजन, सामाजिक न्यायाचे दुसरे पर्व’ या विषयावर व्याख्यान झाले. अखिल भारतीय तेली साहू महासभा (हैदराबाद)चे अध्यक्ष पी. रामकृष्णय्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नवलकिशोर राठोड, बाबूसिंग कडेल, प्रा. एकनाथ पवार, राजेश चव्हाण, ज्ञानेश्वर गोरे, कवडू नगराळे, आनंद गायकवाड, संजय बोरकर, सुनील वासनिक, सिद्धार्थ भवरे, अशोक वानखडे, माया गोबरे, सुनीता काळे आदींची उपस्थिती होती.मराठा सेवा संघातर्फे व्याख्यानस्मृती पर्वात मंगळवार, ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मराठा सेवा संघाच्या संयोजनात व्याख्यान होत आहे. ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आरक्षणाची गरज का?’ असा व्याख्यानाचा विषय आहे. प्रसिद्ध अभ्यासू वक्ते प्रवीण देशमुख हे प्रमुख वक्ते आहेत. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले अध्यक्षस्थानी राहतील.