शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

रिलायन्स उठली ‘जीवना’वर

By admin | Updated: November 19, 2014 22:47 IST

शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरात सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या खोदकामाने उच्छाद मांडला आहे. सर्व अटीशर्थी पायदळी तुडवत खोदकम सुरू आहे.

जलवाहिनी फोडली : ‘ओएफसी’साठी भररस्त्यांवर खोदकामयवतमाळ : शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरात सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या खोदकामाने उच्छाद मांडला आहे. सर्व अटीशर्थी पायदळी तुडवत खोदकम सुरू आहे. दोन दिवसापूर्वी तर खोदकाम करताना पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनीच फोडली. अनेक रस्त्यांवर आॅप्टीकल फायबर केबलसाठी चर खोदले जात आहेत. यामुळे भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. जणू रिलायन्स कंपनी यवतमाळकरांच्या ‘जीवना’वर उठल्याचे दिसत आहे.या अतिरेकी खोदकामाचा सर्वाधिक फटका जीवन प्राधिकरण आणि दूरसंचार निगमला बसत आहे. प्रमुख बाजारपेठेसह वसाहतीमधील रस्त्यावरही खोदकाम केले जात आहे. काही ठिकाणी वीज वितरणच्या खांबांनाही धोका निर्माण झाला आहे. खोदकामाची परवानगी देताना रात्रीच खोदकाम करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र रस्त्यावर वर्दळ असतानासुध्दा खोदकाम केले जाते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कळंब चौकासारख्या वर्दळीच्या परिसरात अगदी मुख्य चौकालगत केबलसाठी चेंबर खोदले आहे. या चौकातून जड वाहतूक होते. चेंबरमुळे वाहनास अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नगरपरिषदेने ११ सप्टेंबर २०१३ रोजी रिलायन्स कंपनीला खोदकामाची परवानगी दिली. ७५ लाख ५५ हजार २९२ रुपये नुकसानभरपाई पोटी वसूल केले आहे. खोदकामासाठी विविध अटीशर्थी लादण्यात आल्या आहेत. मात्र या अटीचे राजरोस उल्लंघन केले जात आहे. विशेष म्हणजे रिलायन्सने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी, दूरसंचार निगम यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीच परवानगी घेतली नसल्याचे पुढे आले आहे.खोदकाम करताना रस्त्याच्या बाजुने कमीत कमी दोन मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून सव्वामीटर जागा सोडावी, भविष्यात रस्ता रुंदीकरणात केबल फुटपाथखाली येणार नाही, केबलमुळे भविष्यात रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही. केबल टाकण्यासाठी रिलायन्सनेच अतिक्रमण काढावे, डांबरी रस्त्यावर केबल टाकताना एक ते दीड मीटर खोल टाकावी. खोदाईचे काम पुर्ण केल्यानंतर जागा अथवा रस्ता पुर्ववत करून देण्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर आहे. प्रत्यक्षात मात्र कुठेच कंपनीकडून खोदकाम केल्यानंतर जागा पुर्ववत करण्यात आली नाही. अनेक ठिकाण खोदकामानंतर निघालेली माती तिथेच पसरविल्याने अपघात झाले आहेत. येथील तहसील चौकात मुख्य जलवाहीनी फुटल्याने अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला होता. अचानक मध्यरात्री प्रमुख मार्गावर पाणी साचल्याने अनेक दुचाकीस्वार स्लीप होऊन कोसळले. मात्र नगरपरिषदेकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. अशीच स्थिती वडगाव ग्रामपंचायत, लोहारा ग्रामपंचायतीमध्ये येत असलेल्या वसाहतीतील रस्त्यांची आहे. केबल टाकण्यासाठी कंपनीने चक्क सिंमेट रोडवरही खोदकाम केले आहे. कशीबशी माती टाकून केबल झाकल्याने ठिकठिकाणी खचके पडले आहेत. याला ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाकडून कोणताच विरोध केला जात नाही. त्यामुळे नागरिकांनी कितीही संताप व्यक्त केला तरी शहरातील रस्त्यांची चाळणी करण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. रिलायन्सचे स्थानिक इनचार्ज पांडा यांच्याशी संर्पक केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले. (कार्यालय प्रतिनिधी)