शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बिटरगाव येथे ५९ विकास कामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:48 IST

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला.

ठळक मुद्दे३0 कामांचे भूमिपूजन : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानतर्फे विकास, सात कोटींची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला.अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश पेंधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष उत्तमराव इंगळे, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने उपस्थित होते. यावेळी उत्तमराव इंगळे यांनी गावाच्या विकासासाठी एकता महत्वाची असल्याचे सांगितले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यातील ७६ गावांमध्ये विकास कामे करीत असून ३९ मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. आदिवासी विकास विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.आमदार नजरधने यांनी जोपर्यंत शासन आणि प्रशासन एकत्र येत नाही, तोपर्यंत विकास होणार नाही, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जिल्ह्यात विविध गावात अनेक कामे हाती घेण्यात आली असून शासनाच्या विकास योजना निरंतर चालल्या पाहिजे, असे सांगितले. या अभियानातून येथील तीन जिल्हा परिषद शाळा डीजिटल करण्यात आल्या. शुद्ध पाण्यासाठी आरो फिल्टर मशीन व एटीएम बसविले. शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. समाज मंदिर व शाळेची रंगरंगोटी केली. गावात अभ्यासिका तयार करून फर्निचर व पुस्तके खरेदी केली. बचत गट प्रशिक्षणासाठी साहित्य खरेदी केले. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक प्रल्हाद पवार व गावकऱ्यांच्या मदतीने गावात गेल्या दोन वर्षात ही विकास कामे करण्यात आली. संचालन गजानन नरसलवाड, तर आभार प्रकाश भेदेकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रेखा आडे, रमेश आडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे व्यवस्थापक युवराज सासवडे व गावकरी उपस्थित होते.