शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

बिटरगाव येथे ५९ विकास कामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:48 IST

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला.

ठळक मुद्दे३0 कामांचे भूमिपूजन : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानतर्फे विकास, सात कोटींची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला.अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश पेंधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष उत्तमराव इंगळे, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने उपस्थित होते. यावेळी उत्तमराव इंगळे यांनी गावाच्या विकासासाठी एकता महत्वाची असल्याचे सांगितले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यातील ७६ गावांमध्ये विकास कामे करीत असून ३९ मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. आदिवासी विकास विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.आमदार नजरधने यांनी जोपर्यंत शासन आणि प्रशासन एकत्र येत नाही, तोपर्यंत विकास होणार नाही, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जिल्ह्यात विविध गावात अनेक कामे हाती घेण्यात आली असून शासनाच्या विकास योजना निरंतर चालल्या पाहिजे, असे सांगितले. या अभियानातून येथील तीन जिल्हा परिषद शाळा डीजिटल करण्यात आल्या. शुद्ध पाण्यासाठी आरो फिल्टर मशीन व एटीएम बसविले. शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. समाज मंदिर व शाळेची रंगरंगोटी केली. गावात अभ्यासिका तयार करून फर्निचर व पुस्तके खरेदी केली. बचत गट प्रशिक्षणासाठी साहित्य खरेदी केले. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक प्रल्हाद पवार व गावकऱ्यांच्या मदतीने गावात गेल्या दोन वर्षात ही विकास कामे करण्यात आली. संचालन गजानन नरसलवाड, तर आभार प्रकाश भेदेकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रेखा आडे, रमेश आडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे व्यवस्थापक युवराज सासवडे व गावकरी उपस्थित होते.