शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

बिटरगाव येथे ५९ विकास कामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:48 IST

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला.

ठळक मुद्दे३0 कामांचे भूमिपूजन : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानतर्फे विकास, सात कोटींची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला.अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश पेंधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष उत्तमराव इंगळे, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने उपस्थित होते. यावेळी उत्तमराव इंगळे यांनी गावाच्या विकासासाठी एकता महत्वाची असल्याचे सांगितले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यातील ७६ गावांमध्ये विकास कामे करीत असून ३९ मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. आदिवासी विकास विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.आमदार नजरधने यांनी जोपर्यंत शासन आणि प्रशासन एकत्र येत नाही, तोपर्यंत विकास होणार नाही, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जिल्ह्यात विविध गावात अनेक कामे हाती घेण्यात आली असून शासनाच्या विकास योजना निरंतर चालल्या पाहिजे, असे सांगितले. या अभियानातून येथील तीन जिल्हा परिषद शाळा डीजिटल करण्यात आल्या. शुद्ध पाण्यासाठी आरो फिल्टर मशीन व एटीएम बसविले. शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. समाज मंदिर व शाळेची रंगरंगोटी केली. गावात अभ्यासिका तयार करून फर्निचर व पुस्तके खरेदी केली. बचत गट प्रशिक्षणासाठी साहित्य खरेदी केले. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक प्रल्हाद पवार व गावकऱ्यांच्या मदतीने गावात गेल्या दोन वर्षात ही विकास कामे करण्यात आली. संचालन गजानन नरसलवाड, तर आभार प्रकाश भेदेकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रेखा आडे, रमेश आडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे व्यवस्थापक युवराज सासवडे व गावकरी उपस्थित होते.