शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

बौद्धिक गुलामगिरी नाकारणे म्हणजे आंबेडकरी असणे

By admin | Updated: February 27, 2017 00:50 IST

आंबेडकरी हा शब्द एका महान तत्वज्ञानापाशी येऊन थांबला आहे. हे तत्वज्ञान जगभरातल्या सर्वच पीडित, शोषित,

मंगेश बनसोड : यवतमाळात सातव्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन यवतमाळ : आंबेडकरी हा शब्द एका महान तत्वज्ञानापाशी येऊन थांबला आहे. हे तत्वज्ञान जगभरातल्या सर्वच पीडित, शोषित, वंचित घटकांसाठी मुक्तीचे महाव्दार बनले आहे. १४ आॅक्टोबर १९५६ च्या आधीची सर्व मानसिक अवस्था आणि बौद्धीक गुलामगिरी नाकारणे म्हणजे आंबेडकरी असणे होय, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. मंगेश बनसोड यांनी केले. सातव्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा नॅशनल आंबेडकराईट गार्डच्यावतीने आयोजित संमेलनाचे येथील संदीप मंगलममध्ये दुपारी १ वाजता प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रोहीत वेमुला परिसर, नामदेव ढसाळ नगरी आणि अरुण काळे विचार मंच अशा नामकरणातून संमेलनस्थळाची वैचारिक बांधिलकी स्पष्ट करण्यात आली. संमेलनाध्यक्ष डॉ. मंगेश बनसोड म्हणाले, दलितेतर विविध राजकीय पक्ष विविध विचारसरणी घेऊन काम करतात. बरेचदा एकाच घरातील वेगवेगळे सदस्य वेगवेगळ््या राजकीय पक्षाचे काम करतात. मात्र निवडणुकांमध्ये हे राजकीय पक्ष एकत्र येतात. विशेष म्हणजे दलित विचारधारा मानणारे आपले पक्षही सत्तेसाठी विविध राजकीय पक्षांसोबत ‘कॉमन मिनीमम प्रोग्राम’च्या नावावर युती करतात. परंतु दलित विचारधाराचे देशभरातील सर्व पक्ष असा ‘कॉमन मिनीमम प्रोग्राम’ करून एकत्र का येत नाही? या पुढील काळात आंबेडकरी युवकांनी या दृष्टीने काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ. बनसोड यांनी केले. प्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद शिंदे ओघवत्या शैलीत म्हणाले, भूमिका करणारे अनेक नट आहेत. मात्र मी ठराविक ‘भूमिका’ असणारा नट आहे. अशा संमेलनात आले म्हणजे आपण आणखी वाचन केले पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव होते. समाजात दंगल होऊ न देणे, ही प्रत्येक कलावंताची जबाबदारी आहे. आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष महेंद्र भवरे यांनी धर्माधिष्ठीत व्यवस्था आंबेडकरी चळवळ नाकारत असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय इतिहास जमा करणारे वातावरण सध्या दिसते. विचारवंतांना संपविण्याचा घाट घातला जात आहे. समूहाचे दु:ख ही संकल्पना आज बाद झाली, असे ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या, जगण्यातले सगळे संदर्भ साहित्यात रुजविले तरच भावी पिढी भक्कमपणे उभी राहील. प्रा. माधव सरकुंडे यांनी आदिवासी समाजाच्या उत्थानाकरिता आंबेडकरी विचार हाच पर्याय असल्याचे सांगितले. साहित्य हे लोकमनाला प्रशिक्षण देते. अनेक परदेशी सेवक आम्हाला ख्रिस्ती करतात, कुणी आम्हाला वनवासी करतात. त्यामुळे आता आंबेडकरी विचार स्वीकारून आमचा विकास झाला पाहिजे. प्रा. सतेश्वर मोरे म्हणाले की, आमच्या साहित्याचे प्रयोेजन धम्मासाठी आहे. आणि धम्माचे प्रयोजन जगपरिवर्तन आहे. विचारपीठावर स्वागताध्यक्ष निबंधक नंदकुमार रामटेके, सिद्धार्थ मोकळ उपस्थित होते. प्रास्ताविक आनंद गायकवाड, संचालन सुनील वासनिक यांनी केले. सुनील भेले यांनी संदेश वाचन केले. कवडू नगराळे यांनी पाहुण्याचा परिचय, तर बळी खैरे यांनी भूमिका विषद केली. यावेळी योगानंद टेंभूर्णे यांच्या युगांतराच्या उजेडवाटा पुस्तकाचे प्रकाशन झाले. तत्पूर्वी घनश्याम पाटील आणि संचाने क्रांतीगीते सादर केली. (स्थानिक प्रतिनिधी) कवितेने मन साफ होते - लोकनाथ यशवंत संमेलनाचे उद्घाटक लोकनाथ यशवंत म्हणाले, तथाकथीत भारतीय साहित्य जागतिक पातळीवर कधीच पोहोचू शकत नाही, कारण ते जातीच्या मर्यादेतच गुरफटलेले आहे. इतर कला प्रकार महागडे असले तरी कविता पैसे मागत नाही. कवितेतून मनातली भडास निघते. मन साफ होते आणि आरोग्य ठणठणीत राहते. आपल्या पोटातले मुल महान बनूनच जन्मास यावे, असे प्रत्येक आईला वाटते. कवीनेही स्वत:च्या कवितेबद्दल हिच भावना ठेवली तर दर्जेदार काव्यनिर्मिती होईल, असे यशवंत यांनी सांगितले.