शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

बौद्धिक गुलामगिरी नाकारणे म्हणजे आंबेडकरी असणे

By admin | Updated: February 27, 2017 00:50 IST

आंबेडकरी हा शब्द एका महान तत्वज्ञानापाशी येऊन थांबला आहे. हे तत्वज्ञान जगभरातल्या सर्वच पीडित, शोषित,

मंगेश बनसोड : यवतमाळात सातव्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन यवतमाळ : आंबेडकरी हा शब्द एका महान तत्वज्ञानापाशी येऊन थांबला आहे. हे तत्वज्ञान जगभरातल्या सर्वच पीडित, शोषित, वंचित घटकांसाठी मुक्तीचे महाव्दार बनले आहे. १४ आॅक्टोबर १९५६ च्या आधीची सर्व मानसिक अवस्था आणि बौद्धीक गुलामगिरी नाकारणे म्हणजे आंबेडकरी असणे होय, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. मंगेश बनसोड यांनी केले. सातव्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा नॅशनल आंबेडकराईट गार्डच्यावतीने आयोजित संमेलनाचे येथील संदीप मंगलममध्ये दुपारी १ वाजता प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रोहीत वेमुला परिसर, नामदेव ढसाळ नगरी आणि अरुण काळे विचार मंच अशा नामकरणातून संमेलनस्थळाची वैचारिक बांधिलकी स्पष्ट करण्यात आली. संमेलनाध्यक्ष डॉ. मंगेश बनसोड म्हणाले, दलितेतर विविध राजकीय पक्ष विविध विचारसरणी घेऊन काम करतात. बरेचदा एकाच घरातील वेगवेगळे सदस्य वेगवेगळ््या राजकीय पक्षाचे काम करतात. मात्र निवडणुकांमध्ये हे राजकीय पक्ष एकत्र येतात. विशेष म्हणजे दलित विचारधारा मानणारे आपले पक्षही सत्तेसाठी विविध राजकीय पक्षांसोबत ‘कॉमन मिनीमम प्रोग्राम’च्या नावावर युती करतात. परंतु दलित विचारधाराचे देशभरातील सर्व पक्ष असा ‘कॉमन मिनीमम प्रोग्राम’ करून एकत्र का येत नाही? या पुढील काळात आंबेडकरी युवकांनी या दृष्टीने काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ. बनसोड यांनी केले. प्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद शिंदे ओघवत्या शैलीत म्हणाले, भूमिका करणारे अनेक नट आहेत. मात्र मी ठराविक ‘भूमिका’ असणारा नट आहे. अशा संमेलनात आले म्हणजे आपण आणखी वाचन केले पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव होते. समाजात दंगल होऊ न देणे, ही प्रत्येक कलावंताची जबाबदारी आहे. आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष महेंद्र भवरे यांनी धर्माधिष्ठीत व्यवस्था आंबेडकरी चळवळ नाकारत असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय इतिहास जमा करणारे वातावरण सध्या दिसते. विचारवंतांना संपविण्याचा घाट घातला जात आहे. समूहाचे दु:ख ही संकल्पना आज बाद झाली, असे ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या, जगण्यातले सगळे संदर्भ साहित्यात रुजविले तरच भावी पिढी भक्कमपणे उभी राहील. प्रा. माधव सरकुंडे यांनी आदिवासी समाजाच्या उत्थानाकरिता आंबेडकरी विचार हाच पर्याय असल्याचे सांगितले. साहित्य हे लोकमनाला प्रशिक्षण देते. अनेक परदेशी सेवक आम्हाला ख्रिस्ती करतात, कुणी आम्हाला वनवासी करतात. त्यामुळे आता आंबेडकरी विचार स्वीकारून आमचा विकास झाला पाहिजे. प्रा. सतेश्वर मोरे म्हणाले की, आमच्या साहित्याचे प्रयोेजन धम्मासाठी आहे. आणि धम्माचे प्रयोजन जगपरिवर्तन आहे. विचारपीठावर स्वागताध्यक्ष निबंधक नंदकुमार रामटेके, सिद्धार्थ मोकळ उपस्थित होते. प्रास्ताविक आनंद गायकवाड, संचालन सुनील वासनिक यांनी केले. सुनील भेले यांनी संदेश वाचन केले. कवडू नगराळे यांनी पाहुण्याचा परिचय, तर बळी खैरे यांनी भूमिका विषद केली. यावेळी योगानंद टेंभूर्णे यांच्या युगांतराच्या उजेडवाटा पुस्तकाचे प्रकाशन झाले. तत्पूर्वी घनश्याम पाटील आणि संचाने क्रांतीगीते सादर केली. (स्थानिक प्रतिनिधी) कवितेने मन साफ होते - लोकनाथ यशवंत संमेलनाचे उद्घाटक लोकनाथ यशवंत म्हणाले, तथाकथीत भारतीय साहित्य जागतिक पातळीवर कधीच पोहोचू शकत नाही, कारण ते जातीच्या मर्यादेतच गुरफटलेले आहे. इतर कला प्रकार महागडे असले तरी कविता पैसे मागत नाही. कवितेतून मनातली भडास निघते. मन साफ होते आणि आरोग्य ठणठणीत राहते. आपल्या पोटातले मुल महान बनूनच जन्मास यावे, असे प्रत्येक आईला वाटते. कवीनेही स्वत:च्या कवितेबद्दल हिच भावना ठेवली तर दर्जेदार काव्यनिर्मिती होईल, असे यशवंत यांनी सांगितले.