शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

उदापूरचे पुनर्वसन आजंती रोडवरच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 21:46 IST

तालुक्याच्या टाकळी(डोल्हारी) येथे होऊ घातलेल्या मध्यम प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात आहे. यासाठी उदापूर गावाचे पुनर्वसन होणार आहे. शासनाने पुनर्वसनाकरिता नेर लगत आजंती रोडवर जागा निश्चित केली आहे. मात्र काही लोकांचा या जागेला विरोध आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महिलांसह नागरिकांची धडक, उपोषणाला बसण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्याच्या टाकळी(डोल्हारी) येथे होऊ घातलेल्या मध्यम प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात आहे. यासाठी उदापूर गावाचे पुनर्वसन होणार आहे. शासनाने पुनर्वसनाकरिता नेर लगत आजंती रोडवर जागा निश्चित केली आहे. मात्र काही लोकांचा या जागेला विरोध आहे. दरम्यान, आजंती रोडवरच पुनर्वसन करावे, अशी भूमिका काही लोकांनी घेतली आहे, तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.ग्रामसभेच्या ठरावानुसारच आजंती रोडवरील जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र काही लोकांकडून राजकीय द्वेषापोटी अडथळे आणले जात आहे. सदर जागा वस्तीसाठी योग्य असतानाही प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. नियोजित जागेवरच पुनर्वसन न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ज्ञानोबा गीते, शोभा गीते, सुलभा घुगे, गणेश खाडे, रमेश भोयर, चंद्रकला भोयर, शरद खडसे, विजय सांगळे, संजय सांगळे, कांता भेंडेकर यांच्यासह २०० नागरिकांच्या स्वाक्षºयांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. उदापूर गावाच्या पुनर्वसनासाठी यापूर्वी इतर ठिकाणच्याही जागा सुचविण्यात आल्या होत्या. प्रशासनाने आजंती रोडवरील जागा निश्चित केली आहे.भूसंपादन प्रस्तावाला स्थगितीची शिफारसउदापूरचे पुनर्वसन आजंती रोडवर होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाला माजी सरपंच अजय भोयर आदींच्या नेतृत्त्वात गावकऱ्यांनी निवेदन दिले होते. जमीन खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले होते. या निवेदनाचा विचार करत आजंती रोडवरील जागेचा भूसंपादन प्रस्ताव स्थगित ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसे पत्र यवतमाळ प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ग.ल. राठोड यांनी जिल्हाधिकारी (भूसंपादन) यांना दिले आहे.