शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

चेतना अभियानाला मदतीस नकार

By admin | Updated: March 12, 2016 02:54 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे.

सीईओकडे तक्रार : मनोरंजनावर उधळपट्टी, २००९ च्या वर्गणीचा हिशेबच नाहीयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी दहा कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. चेतना अभियानाच्या नावावर मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात आहेत. अशा स्थितीत जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक संघटनांनी चेतना अभियानाला आर्थिक मदत देण्यास विरोध केला आहे. अभियानासाठी कोणालाही सक्ती केली जाऊ नये, अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. बळीराजा चेतना अभियान समितीकडून जनजागृतीचे कार्यक्रम, त्रस्त कुटुंबांना शोधून आर्थिक मदत, मुलामुलींचे शिक्षण, आरोग्यावरील खर्चास मदत यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून निधी संकलित करून अभियानाच्या ट्रस्टच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या संदर्भात विभागप्रमुखांना कोणतेही आदेश नाहीत. हा मदतनिधी स्वेच्छेने असल्यास निधी कपात करताना कर्मचाऱ्यांची संमती आवश्यक असते, मात्र येथे अशी कुठलीही प्रक्रिया होताना दिसत नाही. एकंदर संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वीसुद्धा २००९ मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून शेतकरी व शेतमजूर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या नावाखाली १०० ते पाचशे रुपये असा निधी जमा करण्यात आला होता. या निधीचा धनाकर्ष कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण समिती, यवतमाळ यांना देण्याचे निर्देश तत्कालिन सीईओंनी दिले होते. त्यानंतर मात्र निधीचा विनियोग कशाप्रकारे झाला, त्याचा हिशेब देणगीदारांना अद्याप देण्यात आलेला नाही, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार चौकशीची मागणी केली होती. नियमबाह्य पद्धतीने संघटनांना विश्वासात न घेता निधी संकलनाला विरोध असल्याची तक्रार सीईओ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, प्राथमिक शिक्षक संघाचे सुभाष धवसे, महाराष्ट्र शिक्षक भारतीचे गजानन पवार, उर्दू शिक्षक संघटनेचे हयातखान नूरखाँ, अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शहाजी घुले, केंद्रप्रमुख संघाचे अध्यक्ष चंद्रमणी वानखडे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण मानकर आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बळीराजा चेतना अभियानातील वास्तवच पुढे आले आहे. किमान यापुढे तरी झालेल्या चुका सुधारून शेतकऱ्यांसाठी काही रचनात्मक कार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)