शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

चेतना अभियानाला मदतीस नकार

By admin | Updated: March 12, 2016 02:54 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे.

सीईओकडे तक्रार : मनोरंजनावर उधळपट्टी, २००९ च्या वर्गणीचा हिशेबच नाहीयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी दहा कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. चेतना अभियानाच्या नावावर मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात आहेत. अशा स्थितीत जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक संघटनांनी चेतना अभियानाला आर्थिक मदत देण्यास विरोध केला आहे. अभियानासाठी कोणालाही सक्ती केली जाऊ नये, अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. बळीराजा चेतना अभियान समितीकडून जनजागृतीचे कार्यक्रम, त्रस्त कुटुंबांना शोधून आर्थिक मदत, मुलामुलींचे शिक्षण, आरोग्यावरील खर्चास मदत यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून निधी संकलित करून अभियानाच्या ट्रस्टच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या संदर्भात विभागप्रमुखांना कोणतेही आदेश नाहीत. हा मदतनिधी स्वेच्छेने असल्यास निधी कपात करताना कर्मचाऱ्यांची संमती आवश्यक असते, मात्र येथे अशी कुठलीही प्रक्रिया होताना दिसत नाही. एकंदर संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वीसुद्धा २००९ मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून शेतकरी व शेतमजूर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या नावाखाली १०० ते पाचशे रुपये असा निधी जमा करण्यात आला होता. या निधीचा धनाकर्ष कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण समिती, यवतमाळ यांना देण्याचे निर्देश तत्कालिन सीईओंनी दिले होते. त्यानंतर मात्र निधीचा विनियोग कशाप्रकारे झाला, त्याचा हिशेब देणगीदारांना अद्याप देण्यात आलेला नाही, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार चौकशीची मागणी केली होती. नियमबाह्य पद्धतीने संघटनांना विश्वासात न घेता निधी संकलनाला विरोध असल्याची तक्रार सीईओ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, प्राथमिक शिक्षक संघाचे सुभाष धवसे, महाराष्ट्र शिक्षक भारतीचे गजानन पवार, उर्दू शिक्षक संघटनेचे हयातखान नूरखाँ, अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शहाजी घुले, केंद्रप्रमुख संघाचे अध्यक्ष चंद्रमणी वानखडे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण मानकर आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बळीराजा चेतना अभियानातील वास्तवच पुढे आले आहे. किमान यापुढे तरी झालेल्या चुका सुधारून शेतकऱ्यांसाठी काही रचनात्मक कार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)