शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

चेतना अभियानाला मदतीस नकार

By admin | Updated: March 12, 2016 02:54 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे.

सीईओकडे तक्रार : मनोरंजनावर उधळपट्टी, २००९ च्या वर्गणीचा हिशेबच नाहीयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी दहा कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. चेतना अभियानाच्या नावावर मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात आहेत. अशा स्थितीत जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक संघटनांनी चेतना अभियानाला आर्थिक मदत देण्यास विरोध केला आहे. अभियानासाठी कोणालाही सक्ती केली जाऊ नये, अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. बळीराजा चेतना अभियान समितीकडून जनजागृतीचे कार्यक्रम, त्रस्त कुटुंबांना शोधून आर्थिक मदत, मुलामुलींचे शिक्षण, आरोग्यावरील खर्चास मदत यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून निधी संकलित करून अभियानाच्या ट्रस्टच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या संदर्भात विभागप्रमुखांना कोणतेही आदेश नाहीत. हा मदतनिधी स्वेच्छेने असल्यास निधी कपात करताना कर्मचाऱ्यांची संमती आवश्यक असते, मात्र येथे अशी कुठलीही प्रक्रिया होताना दिसत नाही. एकंदर संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वीसुद्धा २००९ मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून शेतकरी व शेतमजूर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या नावाखाली १०० ते पाचशे रुपये असा निधी जमा करण्यात आला होता. या निधीचा धनाकर्ष कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण समिती, यवतमाळ यांना देण्याचे निर्देश तत्कालिन सीईओंनी दिले होते. त्यानंतर मात्र निधीचा विनियोग कशाप्रकारे झाला, त्याचा हिशेब देणगीदारांना अद्याप देण्यात आलेला नाही, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार चौकशीची मागणी केली होती. नियमबाह्य पद्धतीने संघटनांना विश्वासात न घेता निधी संकलनाला विरोध असल्याची तक्रार सीईओ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, प्राथमिक शिक्षक संघाचे सुभाष धवसे, महाराष्ट्र शिक्षक भारतीचे गजानन पवार, उर्दू शिक्षक संघटनेचे हयातखान नूरखाँ, अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शहाजी घुले, केंद्रप्रमुख संघाचे अध्यक्ष चंद्रमणी वानखडे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण मानकर आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बळीराजा चेतना अभियानातील वास्तवच पुढे आले आहे. किमान यापुढे तरी झालेल्या चुका सुधारून शेतकऱ्यांसाठी काही रचनात्मक कार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)