शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

आरएफओंकडील अडीच कोटींची वसुली थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत २०११-१२ मध्ये झरी तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे केली गेली होती. मात्र मातीकाम, अनगड दगडी बांध या कामांमध्ये अनियमितता, गैरव्यवहार झाला. या प्रकरणात ३५ पैकी ३४ अधिकारी-कर्मचाºयांवर ठपका ठेवला गेला. झरीच्या तत्कालीन तहसीलदारांनी ३२७ कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. ३४ पैकी चार वनरक्षक व एक वनपाल यांना बडतर्फ केले गेले होते.

ठळक मुद्देझरी तालुक्यातील रोहयो घोटाळा : ठपका असूनही २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : झरी तालुक्यात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाला. चौकशीअंती वन व महसूल अधिकाऱ्यांवर दोन कोटी ५७ लाख ४२ हजार १३६ रुपयांची वसुली निश्चित करण्यात आली. परंतु गेल्या दीड वर्षांपासून ही वसुली थंडबस्त्यात ठेवण्यात संबंधित अधिकाºयांनी यश मिळविले.पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत २०११-१२ मध्ये झरी तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे केली गेली होती. मात्र मातीकाम, अनगड दगडी बांध या कामांमध्ये अनियमितता, गैरव्यवहार झाला. या प्रकरणात ३५ पैकी ३४ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला गेला. झरीच्या तत्कालीन तहसीलदारांनी ३२७ कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. ३४ पैकी चार वनरक्षक व एक वनपाल यांना बडतर्फ केले गेले होते. अपिलानंतर शासनाने त्यांना पुन्हा सेवेत घेतले. मात्र उर्वरित २९ जणांवर कोणतीही कारवाई केली गेली नाही.या रकमेची वसुली गेल्या काही वर्षांपासून थंडबस्त्यात आहे. ही वसुली थंडबस्त्यात ठेवण्यामागे यातील अधिकाऱ्यांच्या मुंबईतील येरझारा महत्वपूर्ण ठरल्याचे सांगितले जाते. शासन कोरोनामुळे आर्थिक टंचाईचा सामना करीत असताना अडीच कोटींच्या या रकमेची वसुली करण्यात मंत्रालयातील नियोजन विभागाचा (रोहयो-२) इन्टरेस्ट का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरएफओ मळघणे सध्या उमरखेडला कार्यरत आहे.उमरखेड ‘आरएफओ’कडे सर्वाधिक एक कोटीया प्रकरणी तत्कालीन तीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर वसुलीची रक्कम निश्चित करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक एक कोटी १७ लाख ७४ हजार रुपये उमरखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी विठ्ठल मळघणे यांच्याकडे आहे. आरएफओ ए.ओ. मेत्रे (सेवानिवृत्त) ९० लाख ७१ हजार ४६४ रुपये तर ए.ए. शेख यांच्याकडे ४८ लाख ९६ हजार ४७९ रुपयांची रिकव्हरी आहे. एकूण दोन कोटी ५७ लाख ४२ हजार १३६ रुपयांची ही वसुली प्रलंबित आहे. त्यामागेसुद्धा ‘अर्थ’कारण असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :forest departmentवनविभाग