शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरएफओंकडील अडीच कोटींची वसुली थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत २०११-१२ मध्ये झरी तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे केली गेली होती. मात्र मातीकाम, अनगड दगडी बांध या कामांमध्ये अनियमितता, गैरव्यवहार झाला. या प्रकरणात ३५ पैकी ३४ अधिकारी-कर्मचाºयांवर ठपका ठेवला गेला. झरीच्या तत्कालीन तहसीलदारांनी ३२७ कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. ३४ पैकी चार वनरक्षक व एक वनपाल यांना बडतर्फ केले गेले होते.

ठळक मुद्देझरी तालुक्यातील रोहयो घोटाळा : ठपका असूनही २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : झरी तालुक्यात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाला. चौकशीअंती वन व महसूल अधिकाऱ्यांवर दोन कोटी ५७ लाख ४२ हजार १३६ रुपयांची वसुली निश्चित करण्यात आली. परंतु गेल्या दीड वर्षांपासून ही वसुली थंडबस्त्यात ठेवण्यात संबंधित अधिकाºयांनी यश मिळविले.पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत २०११-१२ मध्ये झरी तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे केली गेली होती. मात्र मातीकाम, अनगड दगडी बांध या कामांमध्ये अनियमितता, गैरव्यवहार झाला. या प्रकरणात ३५ पैकी ३४ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला गेला. झरीच्या तत्कालीन तहसीलदारांनी ३२७ कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. ३४ पैकी चार वनरक्षक व एक वनपाल यांना बडतर्फ केले गेले होते. अपिलानंतर शासनाने त्यांना पुन्हा सेवेत घेतले. मात्र उर्वरित २९ जणांवर कोणतीही कारवाई केली गेली नाही.या रकमेची वसुली गेल्या काही वर्षांपासून थंडबस्त्यात आहे. ही वसुली थंडबस्त्यात ठेवण्यामागे यातील अधिकाऱ्यांच्या मुंबईतील येरझारा महत्वपूर्ण ठरल्याचे सांगितले जाते. शासन कोरोनामुळे आर्थिक टंचाईचा सामना करीत असताना अडीच कोटींच्या या रकमेची वसुली करण्यात मंत्रालयातील नियोजन विभागाचा (रोहयो-२) इन्टरेस्ट का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरएफओ मळघणे सध्या उमरखेडला कार्यरत आहे.उमरखेड ‘आरएफओ’कडे सर्वाधिक एक कोटीया प्रकरणी तत्कालीन तीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर वसुलीची रक्कम निश्चित करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक एक कोटी १७ लाख ७४ हजार रुपये उमरखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी विठ्ठल मळघणे यांच्याकडे आहे. आरएफओ ए.ओ. मेत्रे (सेवानिवृत्त) ९० लाख ७१ हजार ४६४ रुपये तर ए.ए. शेख यांच्याकडे ४८ लाख ९६ हजार ४७९ रुपयांची रिकव्हरी आहे. एकूण दोन कोटी ५७ लाख ४२ हजार १३६ रुपयांची ही वसुली प्रलंबित आहे. त्यामागेसुद्धा ‘अर्थ’कारण असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :forest departmentवनविभाग