शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निवडणुकीत दिसली बंडखोर नगरसेवकांची पत

By admin | Updated: October 25, 2014 01:47 IST

निवडणूक आली की, इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांची संख्या कमी नसते. ऐनवेळी पक्ष निष्ठा बाजूला सारुन अनेकांनी विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केली.

यवतमाळ : निवडणूक आली की, इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांची संख्या कमी नसते. ऐनवेळी पक्ष निष्ठा बाजूला सारुन अनेकांनी विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केली. मात्र या निवडणुकीतून बंडखोर नगरसेवकांची पत उमेदवारासह प्रभागातील मतदारांच्याही लक्षात आली. दखल घेण्याइतकीही मते बंडखोर नगरसेवक उमेदवाराला मिळवून देऊ शकले नाही. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या रणधुमाळीत अनेक नगरसेवकांनी ऐनवेळेवर अगदी सोईची भूमिका घेतली. कोणतीही सार्वत्रिक निवडणूक येताच दलबदलविणाऱ्यांचा एक गटच नगरपरिषदेत तयार झाला आहे. या गटामध्ये भाजपा, काँग्रेस, बसपा या प्रमुख पक्षातील नगरसेवकांसह इतरांचाही समावेश आहे. कुणाला विजयी करण्याऐवजी केवळ राजकीय उट्टे काढण्यासाठीच हा दलबदल केल्याची माहिती आहे. आपले उपद्रवमूल्य दाखविण्याचा खटाटोप करणाऱ्या या नगरसेवकांचा किती प्रभाव आहे, हे मात्र या निवडणुकीने दिसून आले. यवतमाळ शहरात बहुतांश पक्षाकडे सशक्त असे संघटन नाही. नगरपरिषदेत सर्वाधिक सत्ता असलेल्या भाजपालाही गटबाजीने पोखरले आहे. ही गटबाजी थांबविण्यात स्थानिक नेत्यांना आतापर्यंत यश आले नाही. अशीच स्थिती काँग्रेस आणि बसपाची आहे. सातत्याने पक्ष विरोधी कारवायांसाठी उघड भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांवर चाप लावण्यात पक्ष नेतृत्व अपयशी ठरल्याचे दिसत आहे. केवळ पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजपातील माजी नगराध्यक्षासह चार नगरसेवकांनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. काँग्रेसमध्ये असलेल्या माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी उघडउघड राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. बसपाच्या चार नगरसेवकांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलवित शेवटच्या दोन दिवसात काँग्रेसकडे जाणे पसंत केले. परंतु मतदारांनी या नगरसेवकांना आपली पत दाखवून दिली. यवतमाळ शहर हे सध्या भाजपाचा बालेकिल्ला आहे. या निवडणुकीत शहरात मतदान घेताना भाजपाला आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. तरीही अपेक्षित मते मिळाली नाही. शहरात झालेल्या एकूण मतदानापैकी सर्वाधिक २० हजार ७६१ मते भाजपाला मिळाली. भाजपाचे १६ नगरसेवक आणि सातत्याने नगरपरिषदेत असलेली सत्ता या तुलनेत ही मते अतिशय कमी असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. ऐनवेळी दलबदलून जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याचे या निवडणुकीवरून स्पष्ट झाले. पक्षनिष्ठा सोडून इतर पक्षाच्या उमेदवारासोबत उघडपणे फिरणाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर पक्षाच्या कारवाईनंतर नगरपरिषदेत नवीन समीकरण काय होणार यावरच सध्या शहरात चर्चा सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)