शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

रेशन दुकानासाठी सुकळीवासी तहसीलवर धडकले

By admin | Updated: July 30, 2015 02:18 IST

तालुक्यातील सुकळी (जा) येथील स्वस्त धान्याचे दुकान गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे.

धान्यच मिळेना : ५० रुपयांच्या धान्यासाठी बुडवावी लागते दिवसभराची अडीचशे रुपये मजुरी उमरखेड : तालुक्यातील सुकळी (जा) येथील स्वस्त धान्याचे दुकान गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. ते पूर्ववत सुरू करण्यात येऊन ग्रामस्थांना होणारा त्रास थांबवावा, या मागणीसाठी सुकळी येथील असंख्य नागरिकांनी बुधवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन आपली कैफियत तहसीलदारांसमोर मांडली.सुकळी जा. येथील राशन दुकानदार संगीता दशरथ वानखेडे यांच्याकडे धान्य वितरणाची जबाबदारी होती. त्या बीपीएल, अंत्योदय, अन्नसुरक्षा आदी सर्व योजनांमधील लाभार्थ्यांना नियमितपणे मालाचे वाटप करीत होत्या. तरीदेखील गावातील काही ठराविक लोकांनी विनाकारण त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्या. या तक्रारींची शहानिशा न करताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन येथील राशन दुकान बंद करण्यात आले. त्यामुळे आता सुकळी येथील नागरिकांना उमरखेड येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य न्यावे लागत आहे. सुकळीपासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या या नवीन दुकानात वयोवृद्ध महिला व पुरुषांना पायपीट करावी लागत आहे. अनेकांना तर स्वस्त धान्यासाठी आपली मजुरी बुडवून दिवसभर थांबावे लागत आहे. धान्य ५० रुपयाचे आणि त्यामागे २५० रुपयांची मजुरी जर बुडत असेल तर स्वस्त धान्य दुकानाचा गोरगरिबांना काय फायदा, असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे राशन दुकान सुकळी येथेच पूर्ववत सुरू ठेवावे. अन्यथा उमरखेड तहसील कार्यालयासमोर ४ आॅगस्ट रोजी महिलांसह ग्रामस्थ उपोषण आंदोलन करतील, असे निवेदन आज सुकळीवासीयांना तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले. या आंदोलनात चिन्नूमिया काजी, डॉ.अयूब पठाण, दादाराव पवार, शेषराव जाधव, हरिश्चंद्र राठोड, भीमराव वानखडे, संतोष वानखडे, अ‍ॅड.प्रफुल्ल वानखडे, वसंतराव बडेराव, सूर्यभान वानखेडे, प्रल्हाद जाधव, आत्माराम राठोड, पांडुरंग चव्हाण, शेख बशिर शेख भुसा, शेख सादिक, लक्ष्मीबाई वानखडे, परवीनबी अकबर, लक्ष्मीबाई काळे, रामी जाधव, रुक्माबाई चव्हाण, भागिरथा चव्हाण, ज्योती वानखडे, शोभाबाई वानखडे, मंदाबाई वानखडे आदींसह शेकडो नागरिकांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)सरपंचपदाचा दुरुपयोगसुकळी येथील महिला सरपंचांनी वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना तसेच महसूलची कोणतीही सूचना नसताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून जिल्हाधिकारी हे स्वत: दुकान व राशनकार्डधारकांची चौकशी करणार असल्याची दवंडी २९ जुलैला गावात दिली. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सरपंचपदाचा गैरवापर करणाऱ्या महिला सरपंचावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.