शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानासाठी सुकळीवासी तहसीलवर धडकले

By admin | Updated: July 30, 2015 02:18 IST

तालुक्यातील सुकळी (जा) येथील स्वस्त धान्याचे दुकान गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे.

धान्यच मिळेना : ५० रुपयांच्या धान्यासाठी बुडवावी लागते दिवसभराची अडीचशे रुपये मजुरी उमरखेड : तालुक्यातील सुकळी (जा) येथील स्वस्त धान्याचे दुकान गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. ते पूर्ववत सुरू करण्यात येऊन ग्रामस्थांना होणारा त्रास थांबवावा, या मागणीसाठी सुकळी येथील असंख्य नागरिकांनी बुधवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन आपली कैफियत तहसीलदारांसमोर मांडली.सुकळी जा. येथील राशन दुकानदार संगीता दशरथ वानखेडे यांच्याकडे धान्य वितरणाची जबाबदारी होती. त्या बीपीएल, अंत्योदय, अन्नसुरक्षा आदी सर्व योजनांमधील लाभार्थ्यांना नियमितपणे मालाचे वाटप करीत होत्या. तरीदेखील गावातील काही ठराविक लोकांनी विनाकारण त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्या. या तक्रारींची शहानिशा न करताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन येथील राशन दुकान बंद करण्यात आले. त्यामुळे आता सुकळी येथील नागरिकांना उमरखेड येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य न्यावे लागत आहे. सुकळीपासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या या नवीन दुकानात वयोवृद्ध महिला व पुरुषांना पायपीट करावी लागत आहे. अनेकांना तर स्वस्त धान्यासाठी आपली मजुरी बुडवून दिवसभर थांबावे लागत आहे. धान्य ५० रुपयाचे आणि त्यामागे २५० रुपयांची मजुरी जर बुडत असेल तर स्वस्त धान्य दुकानाचा गोरगरिबांना काय फायदा, असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे राशन दुकान सुकळी येथेच पूर्ववत सुरू ठेवावे. अन्यथा उमरखेड तहसील कार्यालयासमोर ४ आॅगस्ट रोजी महिलांसह ग्रामस्थ उपोषण आंदोलन करतील, असे निवेदन आज सुकळीवासीयांना तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले. या आंदोलनात चिन्नूमिया काजी, डॉ.अयूब पठाण, दादाराव पवार, शेषराव जाधव, हरिश्चंद्र राठोड, भीमराव वानखडे, संतोष वानखडे, अ‍ॅड.प्रफुल्ल वानखडे, वसंतराव बडेराव, सूर्यभान वानखेडे, प्रल्हाद जाधव, आत्माराम राठोड, पांडुरंग चव्हाण, शेख बशिर शेख भुसा, शेख सादिक, लक्ष्मीबाई वानखडे, परवीनबी अकबर, लक्ष्मीबाई काळे, रामी जाधव, रुक्माबाई चव्हाण, भागिरथा चव्हाण, ज्योती वानखडे, शोभाबाई वानखडे, मंदाबाई वानखडे आदींसह शेकडो नागरिकांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)सरपंचपदाचा दुरुपयोगसुकळी येथील महिला सरपंचांनी वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना तसेच महसूलची कोणतीही सूचना नसताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून जिल्हाधिकारी हे स्वत: दुकान व राशनकार्डधारकांची चौकशी करणार असल्याची दवंडी २९ जुलैला गावात दिली. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सरपंचपदाचा गैरवापर करणाऱ्या महिला सरपंचावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.