शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव तालुक्यात जुलै महिन्याचे रेशन वाटप ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 18:31 IST

साठा उपलब्ध : मशीनच्या तांत्रिक अडचणीत शिधावाटप थांबले

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : रेशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शिधावाटप दुकानात धान्य असूनही ते मिळत नसल्याचे समोर आले आहे. रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या नागरिकांना कामाचे खाडे पाडून रेशन दुकानासमोर घालवावे लागत असल्याने मारेगाव तालुक्यातील नागरिक चांगलेच वैतागलेले आहेत. प्रसंगी नागरिक धान्य दुकानदार यांच्यावर ताशेरे ओढून शिवीगाळ करू लागले आहेत. यामुळे धान्य दुकानदारांना परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे.

ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने वैतागलेल्या तालुक्यातील रेशन दुकानदारांनी जुलै महिन्याचे अजूनही धान्य वाटप व्हायचे असून, जुलै महिन्यातील धान्याला मुदत वाढवून देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. नागरिक भांडणे करून मारण्याची धमकी देत असल्याने संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानांमार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, या हेतूने राज्यभरात ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे.

परंतु, ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत. अनेक गावांतील नागरिक रेशन दुकानासमोर नारे देत शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आवाज उठवत असल्याचे चित्र गावागावांत पाहायला मिळत आहे.

गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात अथवा मोफत रेशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली. रोजंदारीवर कामाला जाणारे कार्डधारक सकाळी ७ वाजेपासून दुकानांसमोर ताटकळत उभे असतात. दुकानात धान्य साठा शिल्लक असून सुद्धा मशीनवर धान्य उपलब्ध होत नसल्यामुळे धान्य देता येत नाही. यामुळे दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे अनेक लाभार्थी हवालदिल झाले आहेत.

मुदत वाढविण्यासाठी पाठविले पत्रई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येण्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचे धान्य वाटप पूर्ण होऊ शकले नाही. याबाबत जुलै महिन्यातील धान्यवाटपाची मुदत वाढवून देण्यासाठी वरिष्ठांना पत्र दिले असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल. कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळgovernment schemeसरकारी योजना