शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

मारेगाव तालुक्यात जुलै महिन्याचे रेशन वाटप ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 18:31 IST

साठा उपलब्ध : मशीनच्या तांत्रिक अडचणीत शिधावाटप थांबले

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : रेशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शिधावाटप दुकानात धान्य असूनही ते मिळत नसल्याचे समोर आले आहे. रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या नागरिकांना कामाचे खाडे पाडून रेशन दुकानासमोर घालवावे लागत असल्याने मारेगाव तालुक्यातील नागरिक चांगलेच वैतागलेले आहेत. प्रसंगी नागरिक धान्य दुकानदार यांच्यावर ताशेरे ओढून शिवीगाळ करू लागले आहेत. यामुळे धान्य दुकानदारांना परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे.

ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने वैतागलेल्या तालुक्यातील रेशन दुकानदारांनी जुलै महिन्याचे अजूनही धान्य वाटप व्हायचे असून, जुलै महिन्यातील धान्याला मुदत वाढवून देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. नागरिक भांडणे करून मारण्याची धमकी देत असल्याने संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानांमार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, या हेतूने राज्यभरात ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे.

परंतु, ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत. अनेक गावांतील नागरिक रेशन दुकानासमोर नारे देत शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आवाज उठवत असल्याचे चित्र गावागावांत पाहायला मिळत आहे.

गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात अथवा मोफत रेशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली. रोजंदारीवर कामाला जाणारे कार्डधारक सकाळी ७ वाजेपासून दुकानांसमोर ताटकळत उभे असतात. दुकानात धान्य साठा शिल्लक असून सुद्धा मशीनवर धान्य उपलब्ध होत नसल्यामुळे धान्य देता येत नाही. यामुळे दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे अनेक लाभार्थी हवालदिल झाले आहेत.

मुदत वाढविण्यासाठी पाठविले पत्रई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येण्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचे धान्य वाटप पूर्ण होऊ शकले नाही. याबाबत जुलै महिन्यातील धान्यवाटपाची मुदत वाढवून देण्यासाठी वरिष्ठांना पत्र दिले असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल. कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळgovernment schemeसरकारी योजना