शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

राठोड बंधूंची भरारी : बोरगाव येथे ऑईल मिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. त्यांनी ठरवलं की, आपण नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोघांनाही शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विश्वजितने स्वत:चे शिक्षण बंद करून मोठ्या भावाच्या अर्थात रंजितच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यासाठी दुसऱ्याच्या चहा टपरीवर, रसवंतीवर, स्टेशनरी दुकानात कामे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : माणसाच्या मनात जिद्द व परिश्रम घेण्याची उर्मी असली की, कोणतीही गोष्ट साध्य करता येते. याची प्रचिती तालुक्यातील बोरगाव येथील राठोड बंधूनी दिली अहे. रंजित आणि विश्वजित या भावंडांनी स्वत: बरोबरच गावातील ३00 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. त्यांनी ठरवलं की, आपण नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोघांनाही शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विश्वजितने स्वत:चे शिक्षण बंद करून मोठ्या भावाच्या अर्थात रंजितच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यासाठी दुसऱ्याच्या चहा टपरीवर, रसवंतीवर, स्टेशनरी दुकानात कामे केली. या कामातून तुटपुंजी मिळकत होत असल्याने कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले होते. अखेर विश्वजितने आपल्या गावी बोरगाव येथे शेतात राबण्यास सुरूवात केली.कापूस वेचणीपासून त्याने शेतातील कामास सुरूवात केली. नंतर गावात मिळेल ती कामे तो करू लागला. चार ते पाच वर्ष दुसºयाकडे शेतीची कामे केली. नंतर दुसऱ्यांची शेती भाडेतत्त्वावर करण्यास सुरूवात केली. त्यात कपाशीची पेरणी करून चांगले उत्पन्न घेतले. कापूस आर्णीत आणून विकला. सोबतच दुसºया शेतकºयांचा कापूसही विक्रीस आणू लागला. यातून त्याचे व्यापाºयांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण झाले. मग विश्वजितने स्वत:च कापूस खरेदीचा व्यवसाय सुरू केला.या दरम्यान, मोठा भाऊ रंजितचे शिक्षण पूर्ण करून तो पुण्याला नोकरीच्या शोधात गेला. तेथे माहेश्वरी मंडळात त्याल्या नोकरी मिळाली. त्या नोकरीच्या पगारात भागत नसल्यामुळे तो यवतमाळला परत आला. एका फायनान्स कंपनीत काम करू लागला. तेथे तीन-चार वर्षे काम केल्यानंतर रंजितने लहान भाऊ विश्वजित बरोबर काम करायचा निर्णय घेतला.या भावंडांनी कापूस खरेदीचा व्यवसाय वाढवला. त्यातून शेतकºयांची मने जिंकली. नंतर बोरगाव येथेच जिनिंग टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र जागा उपलब्ध नसल्याने स्वप्न साकार होईल की नाही, या काळजीत असताना त्यांना नानाजी लिंगावार, दीपक शामराव पाटील यांनी जागेचा प्रश्न सोडविला. तरुण राठोड बंधूंना त्यांनी उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा दिली. त्या जागी जिनिंगची वास्तू उभी करून राठोड बंधूंनी गावातच कापूस खरेदी सुरु केली. जिनिंगसाठी लागणारी यंत्रे महागडी असल्याने त्यांनी प्रथम भंगारात विकलेल्या मशीन उपयोगात आणल्या.अंगभूत क्षमतांची जाणीवअनेक उद्योग उभारण्याची क्षमता आपल्या अंगी असल्याचे ओळखून राठोड बंधूंनी २०१८ मध्ये गावातच मानुदास आॅइल मिलची सुरुवात केली. या मिलमधून जवळपास ३00 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. एकेकाळी दुसºयाच्या चहा टपरीवर काम करणाºया राठोड बंधूंनी गावातच स्वत:चा उद्योग उभारून इतरांच्या रोजगाराचा प्रश्न मिटविला. सध्या हे भाऊ ३00 कुटुंबाचे पोषणकर्ते बनले आहे.

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प