शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

लोकसंख्या वाढीचा दर हळूहळू घटतोय

By admin | Updated: July 11, 2015 00:19 IST

गेल्या अर्धशतकात जिल्ह्याची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे.

दरहजारी पुरुषांमागे ९५० महिला१८ टक्के अक्षरशत्रू  सर्वांची धाव शहराकडेच  महाविद्यालयांच्या आवाक्याबाहेर विद्यार्थिसंख्यारोजगाराच्या प्रतीक्षेत कामगार चौकयवतमाळ : गेल्या अर्धशतकात जिल्ह्याची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रभावी जनजागृतीमुळे लोकसंख्या वाढीच्या वेगाला ‘ब्रेक’ लागल्याचे दिसते. परंतु, अद्यापही उपलब्ध सोयीसुविधा, साधनसामुग्री व नैसर्गिक संसाधनांच्या तुलनेत जिल्ह्याला लोकसंख्येचा भार पेलवण्यापलिकडे गेला आहे. वाढती लोेकसंख्या कायमच चिंतेचा विषय. ताज्या जनगणनेनुसार, जिल्ह्याची लोकसंख्या २७ लाख ७२ हजार ३४८ इतकी अफाट आहे. हा आकडा महाराष्ट्रातील एकूण लोकसंखेच्या २.६ टक्के आहे. जिल्ह्यातील लोकसंख्यावाढीचे प्रमाण १९४१ ते १९७१ पर्यंत प्रचंड होते. वाढत्या लोकसंख्येला नंतरच्या काळात थोडा बे्रक लागला. आज लोकसंख्यावाढीचा वेग हळूहळू कमी होत आहे. गत ५० वर्षांत जिल्ह्याची लोकसंख्या १७ लाखाने वाढली. वाढत्या लोकसंख्येनुसार गरजाही वाढल्या. मात्र, सेवा-सुविधा पुरविण्यात प्रशासनासह लोकप्रतिनिधींना अपयश आले. परिणामी, आजही प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी जनसामान्यांना धडपड करावी लागत आहे.यवतमाळ जिल्हा हा सह्याद्री पर्वतरांगांच्या शेवटच्या टोकावर आहे. जिल्ह्यात २०४० गावे आहेत. या गावांचे प्रशासन सांभाळण्यासाठी १२०७ ग्रामपंचायती आणि गटग्रामपंचायती आहेत. गाव, वाड्या, वस्त्या आणि पोड यात जिल्ह्याची लोकसंख्या विखुरली आहे. काही वस्त्या टेकड्यांवर तर काही दऱ्या खोऱ्यात वसल्या आहेत. काही भागांत रस्ते झालेत. मात्र, अनेक गावे अजूनही रस्त्याविना तुटलेपण भोगत आहेत. सर्वच गावांमध्ये प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था आहे. मात्र, त्यानंतरच्या शिक्षणासाठी शहराकडेच धाव घ्यावी लागते. शिक्षण आणि रोजगार या दोन प्रमुख कारणांसाठी शहराकडे नागरिकांचा लोंढा वाढला आहे. शहराच्या मर्यादित क्षेत्रावर नागरिकांचा अतिरिक्त भार वाढल्याने संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. (शहर वार्ताहर) सर्वाधिक लोकसंख्या ग्रामीण भागात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी ७८.४२ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. तर २१.२८ टक्के लोकसंख्या शहरी भागात स्थिरावली आहे. नागरी लोकसंख्या शहरासह ग्रामीण भागात विखुरली आहे. यामध्ये जिल्हा मुुख्यालय असलेले यवतमाळ, पांढरकवडा, घाटंजी, वणी, पुसद, उमरखेड, दारव्हा, दिग्रस आणि नेर या नऊ तालुक्यांचा समावेश आहे. या शहरांचा भार वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, देवगिरी, श्रीरामपूर, उमरसरा आणि राजूर या नागरी भागात वाढला आहे. सर्वाधिक लोकसंख्या यवतमाळ तहसीलमधील वडगाव आणि वाघापूरमध्ये आहे. महिलांचा जन्मदर वाढतोयगेल्या काही काळापासून कन्याभ्रूणहत्येविरुद्ध मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. शिवाय, अनेकांवर कारवाईदेखील झाली. या सर्वांचा परिणाम म्हणजे जिल्ह्यात महिलांचा जन्मदर काहीसा वाढताना दिसतो. १९९१ ते २००१ या कालावधीत दर हजारी पुरुषामागे महिलांचे प्रमाण ९४२ होते. ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण ९४४ होते. तर शहरी भागात हे प्रमाण ९३६ होते. जनजागृतीनंतर २००१ ते २०११ या कालावधीत दर हजारी पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९५२ झाले. ग्रामीण भागात दर हजारी परुषांमागे महिलांचे प्रमाण ९५० आहे. तर शहरी भागात महिलांचे प्रमाण ९६२ आहे.१८ टक्के नागरिक अक्षरशत्रूजिल्ह्यात ८२.८२ टक्के नागरिक साक्षर आहेत. ८९.४१ टक्के पुरुष, तर ७५.७३ टक्के स्त्रिया साक्षर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक साक्षर नागरिक यवतमाळात आहेत. या तालुक्यात ८८ टक्के नागरिक साक्षर आहेत. सर्वात कमी साक्षरता झरी तालुक्यात आहे. तेथे साक्षरतेचे प्रमाण ७७.७० टक्के आहे. ग्रामीण भागातील साक्षरता ८०.४७ टक्के आहे. तर शहरी भागातील साक्षरता ९१.२४ टक्के आहे.शहरात मजूर प्रतीक्षेत; खेड्यात मजुरांची प्रतीक्षाखेड्यांकडे परत चला, असा नारा महात्मा गांधींनी दिला होता. मात्र, आज त्याच्या अगदी उलट चित्र आहे. रोजगाराच्या शोधात दररोज शेकडो कामगार शहरात येतात. यातून मजूर चौकच तयार झाला आहे. या ठिकाणी मजूर येतात. कामावर पाहिजे ते ठेकेदार मजूर घेऊन जातात. प्रत्येकाला रोजगार मिळेल याची शाश्वती नाही. याउलट चित्र ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागात कामासाठी रोजदार शोधावा लागतो. पैसा देऊनही मजूर उपलब्ध होत नाही.