शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सेनंद येथील युवकावर रानडुकराचा हल्ला

By admin | Updated: May 19, 2017 01:56 IST

यावर्षी उन्हाळा सध्या चांगलाच तापत असून, त्यामुळे जंगलांमधील जलसाठे हे कोरडे पडलेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : यावर्षी उन्हाळा सध्या चांगलाच तापत असून, त्यामुळे जंगलांमधील जलसाठे हे कोरडे पडलेले आहेत. वन्यप्राण्यांना जंगलात पाणीच मिळत नसल्याने ते पाण्याच्या शोधात शेतशिवारात व गावांकडे धाव घेत आहेत. अशातच शेतात गेलेल्या सेनंद येथील एका युवकावर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यामुळे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुसद येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गोपाल जाधव (२१) असे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. गोपाल शेतात काम करण्यासाइी गेला असताना पाठीमागून रानडुकराने अचानक त्याच्यावर हल्ला केला. बोटाला व अंगाला जोरदार चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या एका युवकाने आरडाओरडा केल्याने शेजारी असलेल्या शेतातील लोक धावून आले. त्यांनी कसेबसे गोपालला रानडुकराच्या तावडीतून सोडविले. आणि गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तालुक्यातील सेनंद या गावाला लागून चौफेर घनदाट जंगल आहे. या जंगलातील जलसाठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात पानवठे त्वरित तयार करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून तीव्रतेने होताना दिसत आहे.