शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस काढणार विधानभवनावर मोर्चा

By admin | Updated: November 27, 2014 23:42 IST

राज्यात अल्पमतात असलेल्या भाजप सरकारने दुष्काळी स्थितीसाठी कुठल्याही विशेष उपाययोजना केल्या नाही. कमी उत्पादन होवूनही शेतमालाचे भाव वाढलेले नाही. दिलेल्या एकाही

यवतमाळ : राज्यात अल्पमतात असलेल्या भाजप सरकारने दुष्काळी स्थितीसाठी कुठल्याही विशेष उपाययोजना केल्या नाही. कमी उत्पादन होवूनही शेतमालाचे भाव वाढलेले नाही. दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता भाजप सरकारने केली नाही. यासह विविध मुद्यांना घेवून काँग्रेस नागपूरच्या विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. या आंदोलनाची सुरुवात १ ते ८ डिसेंबर दरम्यान केली जाणार आहे, अशी माहिती मोर्चाचे संयोजक डॉ. नितीन राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली. १९७२ नंतर भीषण दुष्काळी स्थिती राज्यात उद्भवली आहे. दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला तातडीने कोरडवाहूसाठी हेक्टरी २५ हजार रुपये आणि बागायतीसाठी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राज्यात पाणी, चारा याची गंभीर समस्या आहे. केवळ हमी भावात ५० रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. धानाचेही दर दोन हजार २०० रुपयांवरून एक हजार ७०० रुपयांवर आणले आहे. सरासरी उत्पन्नात ५० टक्केपेक्षा अधिक घट झाल्यानंतरही सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार नाही. आजही १५१ आमदार त्यांच्या विरोधात आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सूचना केली होती. मात्र प्रत्यक्ष सभागृहात पोलची मागणी करूनही मतदान घेण्यात आले नाही. आवाजी मतदानाच्या काळात सभागृहात झालेले चित्रिकरण सरकारने सार्वजनिक केल्यास त्यांचे पितळ उघडे पडणार आहे. त्यामुळे त्यांनी मागणी करूनही या चित्रिकरणाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या नाही. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक पॅकेज द्यावे, सरकारने पुन्हा एकदा आपले बहुमत सिद्ध करावे, जवखेडा येथील हत्याकांडाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. याची सुरुवात १ डिसेंबर रोजी धरणे देवून केली जाणार आहे. ४ डिसेंबरला सर्वत्र लाक्षणिक रास्ता रोको केला जाणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबरला नागपूर येथील विधानभवनावर एक लाखांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे या मोर्चाचे निमंत्रक विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.पत्रपरिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार, विजय खडसे, तातू देशमुख, राहुल ठाकरे, देवानंद पवार, अनिल गायकवाड, अरुण राऊत आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)