शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

रॅलीला विलंब अन् नामांकनाचा मुहूर्त हुकला

By admin | Updated: October 8, 2015 02:11 IST

नगरपंचायती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेली रॅली विलंबाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचल्याने भाजपाच्या उमेदवारांना .....

राळेगावातील प्रकार : भाजपाच्या इच्छुक उमेदवारांना लागली हुरहूर राळेगाव : नगरपंचायती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेली रॅली विलंबाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचल्याने भाजपाच्या उमेदवारांना मंगळवारी नामांकन अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहावे लागले. शुभमुहूर्त हुकल्याने उमेदवारांमध्ये हुरहूर दिसत होती. मात्र नामांकनाला दोन दिवस असल्याने दिलासा मिळाला. राळेगाव येथे नगरपंचायतीच्या निवडणुकीने वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्ष शक्ती प्रदर्शन करीत आहे. भारतीय जनता पक्षानेही शक्तिप्रदर्शन करीत नामांकन दाखल करण्यासाठी रॅलीचे मंगळवारी आयोजन केले होते. तत्पूर्वी येथील विठ्ठल मंदिर सभागृहात कार्यकर्ते आणि उमेदवारांची सभा आयोजित केली होती. या सभेला भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, प्रफुल्ल चव्हाण, मनोज इंगोले, सुरेश पोटदुखे, भालचंद्र कविश्वर आदी उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्ते व उमेदवारांना मान्यवरांनी संबोधित केले. त्यानंतर नामनिर्देशन पत्र निवडणूक कार्यालयात दाखल करण्याकरिता शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली निघाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घर, दुकान आणि प्रतिष्ठानातील नागरिकांना अभिवादन करीत ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचली. भाजपाच्या अनेक उमेदवारांनी आपले नामांकन दाखल करण्यासाठी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांंना देण्याची तयारी केली. परंतु उपस्थित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ संपल्याचे कारण सांगत अर्ज स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे उमेदवार, कार्यकर्ते, नेते नाराज होऊन माघारी परतले. यातील अनेक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शुभमुहूर्त काढून ठेवला होता. विलंब झाल्याने त्यांचा शुभमुहूर्तही हुकला. त्यामुळे अनेक उमेदवार हुरहूर व्यक्त करीत होते. काही कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्याची वेळ ५ वाजेपर्यंत असल्याचा गैरसमज असल्याने उशीर झाल्याचे सांगून वेळ मारुन नेली. त्यानंतर यातील बहुतांश उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. गुरुवार शेवटचा दिवस असून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सायंकाळी ५.३० पर्यंत वेळ वाढवून दिला असल्याचे उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी जे.आर. विधाते यांंनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)जिल्ह्यात ३०६ नामांकन दाखल जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी ३०६ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यात सर्वाधिक नामांकन राळेगाव येथे ९५ आहे. या निवडणुकीसाठी झरीजामणी येथे १८, कळंब ५३, मारेगाव ७४, महागाव ३८ आणि बाभूळगाव येथे २८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची ८ आॅक्टोबर ही शेवटची तारीख असून गुरुवारी एकाच दिवशी उमेदवारांची प्रचंड गर्दी होणार आहे. त्यातच नामांकन आॅनलाईन भरावे लागत असल्याने लिंकही मिळत नसल्याची ओरड होत आहे. नामांकन दाखल करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत असून प्रशासन शेवटच्या दिवशी काय उपाययोजना करते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.