शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

राळेगाववासीयांच्या अपेक्षांवर फेरले पाणी

By admin | Updated: June 15, 2014 23:48 IST

पाणीटंचाईने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेने चार कोटी २९ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला. यात राळेगाव तालुक्याचा कृती आराखडा केवळ सात लाख चार हजार रुपयांचा आहे.

के.एस. वर्मा - राळेगावपाणीटंचाईने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेने चार कोटी २९ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला. यात राळेगाव तालुक्याचा कृती आराखडा केवळ सात लाख चार हजार रुपयांचा आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यात जिल्ह्याच्या सर्व सोळाही तालुक्याचा विचार करता किमान १६ टक्के निधीची पाणीटंचाई कृती आराखड्यात तरतूद होईल, अशी अपेक्षा असताना झालेली तरतूद पावणेदोन टक्केही नाही. त्यामुळे राळेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तीन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, चार पंचायत समिती सदस्य, या भागातून भरपूर लीड मिळालेले खासदार, येथील आमदार विधानसभा उपाध्यक्ष असतानाही इतकी कमी तरतूद झाल्याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. राळेगाव शहरात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. येथे आठ-दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. काही ठोस पावले उचलण्यासाठी येथे भरपूर तरतूद आराखड्यात राहील, अशी अपेक्षा असताना केवळ दोन खासगी विहिरीच्या अधिग्रहणावर दोन लाख रुपये खर्चच आराखड्यात दर्शविण्यात आला आहे. सरासरी २७ लाख रुपयांची कामे प्रत्येक तालुक्यात अपेक्षित असताना येथे केवळ सात लाखांचा आराखडा दिल्याने २० लाखांची कामे कमी होणार आहे. आता तर जून महिना सुरू झाला आहे. आगामी दिवसात पावसाळा सुरू होवून पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार आहे. पण प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मात्र या शहराची आणि तालुक्याची फार मोठी निराशा केली आहे.