शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

राळेगावचे सभापती, उपसभापती ईश्वरचिठ्ठीवर!

By admin | Updated: February 25, 2017 01:01 IST

पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागी भाजप, तर तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निर्वाचित झाले.

पंचायत समिती : भाजप-काँग्रेसकडे तीन-तीन दावेदार, एकत्र बसून तोडगा शोधण्याची शक्यता कमी के.एस. वर्मा   राळेगाव पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागी भाजप, तर तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निर्वाचित झाले. आता सभापती व उपसभापतीपदी कोणत्या पक्षाचे उमेदवार येतील, हा निर्णय ‘टाय’ झाला आहे. सभापतीपद खुले आहे. सहा पैकी कुणाचेही वर्णी लागू शकते. निवडीच्या दिवशी दोनही पक्षांचे नेते एकत्र येवून तोडगा काढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीनेच ही दोनही पदे ठरविली जातील, असे चित्र दिसत आहे. झाडगाव सामान्य व वाढोणाबाजार या इतर मागास प्रवर्गात भाजप, सेना, काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली. प्रशांत तायडे यांनी ३६०५ मते घेतली, तर सेनेचे तालुका प्रमुख विनोद काकडे यांनी २२३७ मते घेतली. तायडे १३६८ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे अरविंद राडे यांना केवळ १९३० मते मिळाल्याने काँग्रेसची परंपरागत व जोडलेली मते त्यांना मिळाली नाही. ही मते दुसरीकडे वळविण्यात आल्याची चर्चा मतदान काळात रंगली होती. घरात मोठे वडील स्व. डॉ. पुरुषोत्तम इंगोले, आई शुभम इंगोले हे दोन सदस्य जिल्हा परिषदेचे पाच-पाच वर्षे अध्यक्ष राहिले होते. तरी काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही. म्हणून तृषित इंगोले यांनी काँग्रेसविरुद्ध बंडखोरी करून निवडणूक लढविली. १००४ मते घेवून ते पडल्याने काँग्रेसला संकटात टाकले. वाढोणाबाजार गणात प्रवीण कोकाटे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून ४२३५ मते घेतली. भाजपच्या ज्ञानेश्वर मांडवकर यांना ३७७३ मते मिळाली. ४६२ मतांनी त्यांचा पराभव झाला. धानोरा गणात भाजपच्या स्नेहा विजय येनोरकर यांनी ३३५४ मते घेतली. काँग्रेसच्या मंगला राजू ठाकरे यांना २७५४ मते मिळाली. ६०० मतांनी येथे काँग्रेसचा पराभव झाला. येथे काँग्रेसची उमेदवारी चुकल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. त्यातच सीमा तेलंगे यांना जळका गटाची दिलेली उमेदवारी त्यांची निष्क्रिय कामगिरी, वादग्रस्त कारकिर्द, यजमान व भावाची कामात लुडबुड, ठेकेदारी, यवतमाळचे वास्तव्य, मतदारांशी संपर्क नसणे आदी बाबींचा फटका धानोरा व जळका येथे काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. जळक्यात माजी उपसभापती नलिनी पराते यांनाही त्यांची निष्क्रिय कामगिरी यजमानाची लुडबुड, बदललेला मतदारसंघ यांचा फटका बसला. त्यांना केवळ २०७७ मते मिळाली. भाजपच्या शीला मारोती सलाम यांना ३७५१ मते मिळाली व १६७४ इतक्या प्रचंड मतांनी विजय झाला. वरधमध्ये काँग्रेसच्या ज्योती रवींद्र खैरकार यांनी २६२७ मते घेत २२८९ मते घेणाऱ्या भाजपच्या सीमा धोटेचा ३३८ मतांनी पराभव केला. वरधमध्ये काँग्रेसच्या नीलेश रोडे यांनी भाजपच्या रामकृष्ण आत्राम यांचा ६०४ मतांनी पराभव केला. कोलाम समाजाचे बाहुल्य रोडे यांना तारणारे ठरले. आता मतदारांचे लक्ष सभापती, उपसभापतीपद कुणाला मिळते याकडे लागले आहे.