शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राळेगावचे सभापती, उपसभापती ईश्वरचिठ्ठीवर!

By admin | Updated: February 25, 2017 01:01 IST

पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागी भाजप, तर तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निर्वाचित झाले.

पंचायत समिती : भाजप-काँग्रेसकडे तीन-तीन दावेदार, एकत्र बसून तोडगा शोधण्याची शक्यता कमी के.एस. वर्मा   राळेगाव पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागी भाजप, तर तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निर्वाचित झाले. आता सभापती व उपसभापतीपदी कोणत्या पक्षाचे उमेदवार येतील, हा निर्णय ‘टाय’ झाला आहे. सभापतीपद खुले आहे. सहा पैकी कुणाचेही वर्णी लागू शकते. निवडीच्या दिवशी दोनही पक्षांचे नेते एकत्र येवून तोडगा काढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीनेच ही दोनही पदे ठरविली जातील, असे चित्र दिसत आहे. झाडगाव सामान्य व वाढोणाबाजार या इतर मागास प्रवर्गात भाजप, सेना, काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली. प्रशांत तायडे यांनी ३६०५ मते घेतली, तर सेनेचे तालुका प्रमुख विनोद काकडे यांनी २२३७ मते घेतली. तायडे १३६८ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे अरविंद राडे यांना केवळ १९३० मते मिळाल्याने काँग्रेसची परंपरागत व जोडलेली मते त्यांना मिळाली नाही. ही मते दुसरीकडे वळविण्यात आल्याची चर्चा मतदान काळात रंगली होती. घरात मोठे वडील स्व. डॉ. पुरुषोत्तम इंगोले, आई शुभम इंगोले हे दोन सदस्य जिल्हा परिषदेचे पाच-पाच वर्षे अध्यक्ष राहिले होते. तरी काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही. म्हणून तृषित इंगोले यांनी काँग्रेसविरुद्ध बंडखोरी करून निवडणूक लढविली. १००४ मते घेवून ते पडल्याने काँग्रेसला संकटात टाकले. वाढोणाबाजार गणात प्रवीण कोकाटे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून ४२३५ मते घेतली. भाजपच्या ज्ञानेश्वर मांडवकर यांना ३७७३ मते मिळाली. ४६२ मतांनी त्यांचा पराभव झाला. धानोरा गणात भाजपच्या स्नेहा विजय येनोरकर यांनी ३३५४ मते घेतली. काँग्रेसच्या मंगला राजू ठाकरे यांना २७५४ मते मिळाली. ६०० मतांनी येथे काँग्रेसचा पराभव झाला. येथे काँग्रेसची उमेदवारी चुकल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. त्यातच सीमा तेलंगे यांना जळका गटाची दिलेली उमेदवारी त्यांची निष्क्रिय कामगिरी, वादग्रस्त कारकिर्द, यजमान व भावाची कामात लुडबुड, ठेकेदारी, यवतमाळचे वास्तव्य, मतदारांशी संपर्क नसणे आदी बाबींचा फटका धानोरा व जळका येथे काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. जळक्यात माजी उपसभापती नलिनी पराते यांनाही त्यांची निष्क्रिय कामगिरी यजमानाची लुडबुड, बदललेला मतदारसंघ यांचा फटका बसला. त्यांना केवळ २०७७ मते मिळाली. भाजपच्या शीला मारोती सलाम यांना ३७५१ मते मिळाली व १६७४ इतक्या प्रचंड मतांनी विजय झाला. वरधमध्ये काँग्रेसच्या ज्योती रवींद्र खैरकार यांनी २६२७ मते घेत २२८९ मते घेणाऱ्या भाजपच्या सीमा धोटेचा ३३८ मतांनी पराभव केला. वरधमध्ये काँग्रेसच्या नीलेश रोडे यांनी भाजपच्या रामकृष्ण आत्राम यांचा ६०४ मतांनी पराभव केला. कोलाम समाजाचे बाहुल्य रोडे यांना तारणारे ठरले. आता मतदारांचे लक्ष सभापती, उपसभापतीपद कुणाला मिळते याकडे लागले आहे.