शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

राजूर पिटस्च्या पाण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:25 IST

वणी शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राजूर पिटस्चे (खाणीतून निघणारे पाणी) पाणी निर्गुडा नदीत सोडावे, या मागणीसाठी काही नगरसेवकांनी एकत्र येऊन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्दे नगरसेवकांचे आमदारांना निवेदन : पाणी प्रश्नावर नगरपालिकेत दोन मतप्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राजूर पिटस्चे (खाणीतून निघणारे पाणी) पाणी निर्गुडा नदीत सोडावे, या मागणीसाठी काही नगरसेवकांनी एकत्र येऊन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात सोमवारी या नगरसेवकांनी आमदार बोदकुरवार यांना निवेदन दिले.नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन आमदारांनी यासंदर्भात लगेच वेकोलिच्या महाप्रबंधकांशी संपर्क करून राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडणे शक्य आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावर महाप्रबंधकांनी २४ तास राजूर पिटस्चे पाणी देण्याची तयारी दर्शविली. मात्र यासंदर्भात वेकोलिला लेखी पत्र देण्याबाबत सूचविले. आता यावर आमदार काय भूमिका घेतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. वणी नगर पालिकेच्यावतीने रांगणा येथील वर्धा नदीच्या डोहावरून पाणी पुरवठा योजना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र नव्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा पुरवठा सुरू होईस्तोवर राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडावे, अशी १४ नगरसेवकांची मागणी आहे. सध्या वणी शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे आमदारांना दिलेल्या निवेदनात नगरसेवकांनी म्हटले आहे. दरम्यान, पाणी प्रश्नावरून नगरपालिकेत दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. नगराध्यक्ष व काही नगरसेवकांच्या मते राजूर पिटस्चे पाणी पिण्यायोग्य नाही. सदर पाण्यात क्षार व आयर्न मोठ्या प्रमाणात असल्याने ते नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे, तर काही जाणकारांच्या मते हे पाणी पिण्यायोग्य आहे. त्यात क्षार आणि अन्य घटक असतील, परंतु आरोग्याला बाधा होईल, ईतक्या मोठ्या प्रमाणात नसल्याचे या जाणकारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सन २००४ मध्ये वणी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती, त्यावेळी राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले होते. जवळपास एक महिना या पाण्याचा वापर वणीकरांनी केला होता.पाणी पुरवठा योजनेसाठी १५ कोटींचा निधी मंजूरवर्धा नदीच्या रांगणा डोहावरून वणी पाणी आणण्यासाठी वणी नगरपालिकेने नळयोजना प्रस्तावित केली आहे. या अनुषंगाने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी निधीसाठी वारंवार पत्र व्यवहार केला. तसेच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे त्यांनी निधीची मागणी केली. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पाठविले आहे.योजनेचा प्रस्ताव रवानावर्धा नदीवरून नळयोजना घेण्याबाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात काही त्रुटी असल्याने तो प्रस्ताव परत नगरपालिकेकडे आला होता. सोमवारी या प्रस्तावातील त्रुटी दूर करून मंगळवारी सदर प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.