शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

राजूर पिटस्च्या पाण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:25 IST

वणी शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राजूर पिटस्चे (खाणीतून निघणारे पाणी) पाणी निर्गुडा नदीत सोडावे, या मागणीसाठी काही नगरसेवकांनी एकत्र येऊन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्दे नगरसेवकांचे आमदारांना निवेदन : पाणी प्रश्नावर नगरपालिकेत दोन मतप्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राजूर पिटस्चे (खाणीतून निघणारे पाणी) पाणी निर्गुडा नदीत सोडावे, या मागणीसाठी काही नगरसेवकांनी एकत्र येऊन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात सोमवारी या नगरसेवकांनी आमदार बोदकुरवार यांना निवेदन दिले.नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन आमदारांनी यासंदर्भात लगेच वेकोलिच्या महाप्रबंधकांशी संपर्क करून राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडणे शक्य आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावर महाप्रबंधकांनी २४ तास राजूर पिटस्चे पाणी देण्याची तयारी दर्शविली. मात्र यासंदर्भात वेकोलिला लेखी पत्र देण्याबाबत सूचविले. आता यावर आमदार काय भूमिका घेतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. वणी नगर पालिकेच्यावतीने रांगणा येथील वर्धा नदीच्या डोहावरून पाणी पुरवठा योजना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र नव्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा पुरवठा सुरू होईस्तोवर राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडावे, अशी १४ नगरसेवकांची मागणी आहे. सध्या वणी शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे आमदारांना दिलेल्या निवेदनात नगरसेवकांनी म्हटले आहे. दरम्यान, पाणी प्रश्नावरून नगरपालिकेत दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. नगराध्यक्ष व काही नगरसेवकांच्या मते राजूर पिटस्चे पाणी पिण्यायोग्य नाही. सदर पाण्यात क्षार व आयर्न मोठ्या प्रमाणात असल्याने ते नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे, तर काही जाणकारांच्या मते हे पाणी पिण्यायोग्य आहे. त्यात क्षार आणि अन्य घटक असतील, परंतु आरोग्याला बाधा होईल, ईतक्या मोठ्या प्रमाणात नसल्याचे या जाणकारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सन २००४ मध्ये वणी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती, त्यावेळी राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले होते. जवळपास एक महिना या पाण्याचा वापर वणीकरांनी केला होता.पाणी पुरवठा योजनेसाठी १५ कोटींचा निधी मंजूरवर्धा नदीच्या रांगणा डोहावरून वणी पाणी आणण्यासाठी वणी नगरपालिकेने नळयोजना प्रस्तावित केली आहे. या अनुषंगाने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी निधीसाठी वारंवार पत्र व्यवहार केला. तसेच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे त्यांनी निधीची मागणी केली. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पाठविले आहे.योजनेचा प्रस्ताव रवानावर्धा नदीवरून नळयोजना घेण्याबाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात काही त्रुटी असल्याने तो प्रस्ताव परत नगरपालिकेकडे आला होता. सोमवारी या प्रस्तावातील त्रुटी दूर करून मंगळवारी सदर प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.