शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

राजूर पिटस्च्या पाण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:25 IST

वणी शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राजूर पिटस्चे (खाणीतून निघणारे पाणी) पाणी निर्गुडा नदीत सोडावे, या मागणीसाठी काही नगरसेवकांनी एकत्र येऊन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्दे नगरसेवकांचे आमदारांना निवेदन : पाणी प्रश्नावर नगरपालिकेत दोन मतप्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राजूर पिटस्चे (खाणीतून निघणारे पाणी) पाणी निर्गुडा नदीत सोडावे, या मागणीसाठी काही नगरसेवकांनी एकत्र येऊन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात सोमवारी या नगरसेवकांनी आमदार बोदकुरवार यांना निवेदन दिले.नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन आमदारांनी यासंदर्भात लगेच वेकोलिच्या महाप्रबंधकांशी संपर्क करून राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडणे शक्य आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावर महाप्रबंधकांनी २४ तास राजूर पिटस्चे पाणी देण्याची तयारी दर्शविली. मात्र यासंदर्भात वेकोलिला लेखी पत्र देण्याबाबत सूचविले. आता यावर आमदार काय भूमिका घेतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. वणी नगर पालिकेच्यावतीने रांगणा येथील वर्धा नदीच्या डोहावरून पाणी पुरवठा योजना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र नव्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा पुरवठा सुरू होईस्तोवर राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडावे, अशी १४ नगरसेवकांची मागणी आहे. सध्या वणी शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे आमदारांना दिलेल्या निवेदनात नगरसेवकांनी म्हटले आहे. दरम्यान, पाणी प्रश्नावरून नगरपालिकेत दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. नगराध्यक्ष व काही नगरसेवकांच्या मते राजूर पिटस्चे पाणी पिण्यायोग्य नाही. सदर पाण्यात क्षार व आयर्न मोठ्या प्रमाणात असल्याने ते नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे, तर काही जाणकारांच्या मते हे पाणी पिण्यायोग्य आहे. त्यात क्षार आणि अन्य घटक असतील, परंतु आरोग्याला बाधा होईल, ईतक्या मोठ्या प्रमाणात नसल्याचे या जाणकारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सन २००४ मध्ये वणी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती, त्यावेळी राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले होते. जवळपास एक महिना या पाण्याचा वापर वणीकरांनी केला होता.पाणी पुरवठा योजनेसाठी १५ कोटींचा निधी मंजूरवर्धा नदीच्या रांगणा डोहावरून वणी पाणी आणण्यासाठी वणी नगरपालिकेने नळयोजना प्रस्तावित केली आहे. या अनुषंगाने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी निधीसाठी वारंवार पत्र व्यवहार केला. तसेच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे त्यांनी निधीची मागणी केली. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पाठविले आहे.योजनेचा प्रस्ताव रवानावर्धा नदीवरून नळयोजना घेण्याबाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात काही त्रुटी असल्याने तो प्रस्ताव परत नगरपालिकेकडे आला होता. सोमवारी या प्रस्तावातील त्रुटी दूर करून मंगळवारी सदर प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.