शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
4
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
5
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
6
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
7
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
8
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
9
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
10
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
11
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
12
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
13
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
14
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
15
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
16
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
17
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
18
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
19
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
20
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS

जुन्या पेन्शनसाठी एकत्र लढा उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:25 IST

जुन्या पेन्शन योजनेसाठी नव्या आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभे केले तरच कर्मचाºयांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र देशमुख यांनी केले. येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.

ठळक मुद्देकर्मचारी मेळाव्यात आवाहन : सरकारच्या वेळकाढू धोरणावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जुन्या पेन्शन योजनेसाठी नव्या आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभे केले तरच कर्मचाºयांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र देशमुख यांनी केले. येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.यावेळी मंचावर डाक कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव सुनील रोहणकर, महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष सी.डी. भोयर, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगेश वैद्य, सरचिटणिस नंदू बुटे, चंदहास सुटे, देविदास पवार, अशोक दगडे, नदीम पटेल, अ‍ॅड. रमेश पिंपळशेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.आमदार आणि खासदारांची पेन्शन रद्द करण्यासाठी लढा उभा करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी डॉ.देशमुख यांनी नोंदविले.अ‍ॅड. रमेश पिंपळशेंडे म्हणाले, या देशाची लूट लोकप्रतिनिधींनी केली. आमदारांना प्रश्न विचारले पाहिजे. आपली जात, धर्म, प्रश्न एकच आहे. संघटितपणे पुढे आले तरच प्रश्न सुटेल, असे ते म्हणाले. यावेळी मान्यवरांनी सरकारच्या वेळकाढू धोरणावर सडकून टीका केली. जुन्या पेन्शन योजनेसाठी मोठा लढा लढण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.संपाची रणनीती मुंबईत ठरणारराज्य सरकारी आणि निमशासकीय १९ लाख कर्मचारी ७, ८ व ९ आॅगस्ट असे तीन दिवस संपावर आहे. या संपकाळातील रणनीती ठरविण्यासाठी सोमवार ६ आॅगस्टला मुंबई येथे बैठक बोलविण्यात आली. यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.५४ दिवस संपात सहभागीतांचा सत्कार१९७७-७८ मध्ये राज्य कर्मचाऱ्यांनी ५४ दिवसांचा संप केला होता. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांना कारागृहात टाकण्यात आले होते. यानंतरही संप यशस्वी झाला. या संपात त्यावेळी सहभागी झालेले वसंत कासार यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.