शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

ऐन पावसाळ्यात तापले ग्रामीण वातावरण

By admin | Updated: June 28, 2015 00:08 IST

दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची माहिती मिळताच ऐन पावसाळ्यातच गावोगावचे वातावरण तापले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक : गावोगावी २५ जुलैला मतदानवणी : दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची माहिती मिळताच ऐन पावसाळ्यातच गावोगावचे वातावरण तापले आहे. काही गावांतील सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असल्याने तेथील पुरूषांचे गणीत मात्र बिघडले आहे.वणी तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहेत. पहिल्या टप्प्यात ४० ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात ४२ गावांमध्ये निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात २१ गावांमध्ये महिला सरपंचपदी आरूढ झाल्या. तत्पूर्वी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरपंच पद आरक्षणाची सोडत झाली होती. सन २०२० पर्यंतसाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी यापूर्वीच आरक्षण जाहीर झाले. आता दुसऱ्या टप्प्यात गोवारी, मोहदा, कृष्णानपूर, राजूर (कॉलरी), शिवणी, येनक, झोला, वडगाव, टाकळी, चिखली, परमडोह, चनाखा, नांदेपेरा, कळमना (खु.), निळापूर, तेजापूर, मुंगोली, साखरा-कोलगाव, निंबाळा (बु.), ढाकोरी, नेरड (पुरड), कुर्ली, वांजरी, बोरगाव, कोना, शेलू (खु.), चिलई, निंबाळा (खु.), कुंड्रा, भांदेवाडा, माथोली, पळसोनी, बाबापूर, पठारपूर, डोर्ली, गोवारी, बोरी, मजरा, खांदला आणि भुरकी येथे २५ जुलैला मतदान होणार आहे. या गावांपैकी राजूर (कॉलरी), पठारपूर, नांदेपेरा, मोहदा, तेजापूर, नेरड, भादेवाडा आदी गावांतील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पठारपूर हे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे मूळ गाव आहे. तेजापूर, राजूर ही तालुक्यातील मोठी गावे आहेत. त्यामुळे तेथील निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष असते. यासोबत इतर १४ ग्रामपंचायतींमधील २७ रिक्त पदांसाठीही २५ जुलैला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीमुळे काही गावातील सत्ताधाऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली. (कार्यालय प्रतिनिधी)वणी : दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची माहिती मिळताच ऐन पावसाळ्यातच गावोगावचे वातावरण तापले आहे. काही गावांतील सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असल्याने तेथील पुरूषांचे गणीत मात्र बिघडले आहे.वणी तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहेत. पहिल्या टप्प्यात ४० ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात ४२ गावांमध्ये निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात २१ गावांमध्ये महिला सरपंचपदी आरूढ झाल्या. तत्पूर्वी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरपंच पद आरक्षणाची सोडत झाली होती. सन २०२० पर्यंतसाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी यापूर्वीच आरक्षण जाहीर झाले. आता दुसऱ्या टप्प्यात गोवारी, मोहदा, कृष्णानपूर, राजूर (कॉलरी), शिवणी, येनक, झोला, वडगाव, टाकळी, चिखली, परमडोह, चनाखा, नांदेपेरा, कळमना (खु.), निळापूर, तेजापूर, मुंगोली, साखरा-कोलगाव, निंबाळा (बु.), ढाकोरी, नेरड (पुरड), कुर्ली, वांजरी, बोरगाव, कोना, शेलू (खु.), चिलई, निंबाळा (खु.), कुंड्रा, भांदेवाडा, माथोली, पळसोनी, बाबापूर, पठारपूर, डोर्ली, गोवारी, बोरी, मजरा, खांदला आणि भुरकी येथे २५ जुलैला मतदान होणार आहे. या गावांपैकी राजूर (कॉलरी), पठारपूर, नांदेपेरा, मोहदा, तेजापूर, नेरड, भादेवाडा आदी गावांतील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पठारपूर हे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे मूळ गाव आहे. तेजापूर, राजूर ही तालुक्यातील मोठी गावे आहेत. त्यामुळे तेथील निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष असते. यासोबत इतर १४ ग्रामपंचायतींमधील २७ रिक्त पदांसाठीही २५ जुलैला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीमुळे काही गावातील सत्ताधाऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली. (कार्यालय प्रतिनिधी)मारेगाव तालुक्यात चार महिला सरपंच होणारमारेगाव तालुक्यात ११ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यात आकापूर, आपटी, दांडगाव, हिवरा (मजरा), करणवाडी, मांगरूळ, कोलगाव, टाकळखेडा, टाकळी, कुंभा, इंदिराग्राम (नवीन) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यात करणवाडी येथील सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी इंदिराग्रामचे सरपंच पद आरक्षित आहे. आकापूर, टाकळखेडा येथील सरपंच पद सामान्य प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. मांगरूळ, दांडगाव, कुंभा येथील सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. अनुसूचित जमातीसाठी आपटी, कोलगाव, हिवरा-मजरा, तर टाकळी येथील सरपंच पद सर्वसाधारण आहे. आता पावसाळा सुरू झाला असताना ११ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी गटा-तटात विभागलेली गावे आता कुठे पूर्वपदावर आली. त्यातच पुन्हा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे पुन्हा गावा-गावात गटा-तटाचे राजकारण सुरू झाले आहे. सरपंच पदाचे आरक्षण आधीच जाहीरदुसऱ्या टप्प्यातील भांदेवाडा येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. टाकळी, पळसोनी, खांदला येथील सरपंचपद अनुसूचित जमाती महिला उमेदवारासाठी, तर झोला, बोरगाव येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. गोवारी-कोना, कुंड्रा, परमडोह, बोरी, निंबाळा (बु.) येथील सरपंचपद मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. कुर्ली, नेरड (पुरड), पठारपूर, ढाकोरी, नांदेपेरा, राजूर (कॉलरी), शेलू (खु.), मजरा, पुरड-पुनवट, चिलई, साखरा-कोलगाव येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे.